जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात एकाची आत्महत्या,पोलिसांत नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या निवृत्ती विठ्ठल खैरनार (वय-३५) याने आज सकाळी ०६ वाजेपुर्वी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.त्याला उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.

आता १५ ते २५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे.या वयोगटात अभ्यासाचा ताण,परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत.आणखी एक म्हणजे जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.सामाजिकदृष्टय़ा दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात.

रागीट, आततायी,हट्टी,टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते.मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते.याचे सर्वात जास्त प्रमाण नैराश्यात असते.ज्या व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात,ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात त्यांच्यात आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते.अशीच घटना सोनेवाडी येथे घडली असून मयत निवृत्ती खैरनार याने आज पहाटे केंव्हा तरी हा गळफास लावून घेतला आहे.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे आदींनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०७/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close