जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गरीब कुटुंबातील तरुणाचा खून,जबाबदारी कोणाची ? व्यवस्थेस सैनिकाचा सवाल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

    वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्यांच्याकडुन पैसे व मोबाईल काढुन घेण्याचे उद्देशाने त्याला गाडीवर बसवुन तालुक्यातील नांदुर्खी शिवारातील ऊसाच्या शेतात नेऊन त्याला मारहाण करून त्याचा खुन करुन त्याच्या खिशातील मोबाईल काढून तो विक्री केला.याबाबत शिर्डी पोलीसांनी ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली असली तरी यातील ज्या तरुणाचा खून झाला त्या हांडेवाडी ता.कोपरगाव येथील कुटुंबातील सदस्य अद्याप सावरले नसल्याचे दिसून येत आहे.व न्यायाची मागणी करत आहेत.दरम्यान या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन शरद पवार राष्ट्रवादी गटाचे सचिव संदीप वर्पे यांनी केले आहे.व या कुटुंबातील सदस्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करावी अशी मागणी केली आहे.

“आपण चत्तर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली असता भारतीय सैन्यदलात त्रिपुरा येथे हवालदार म्हणून कार्यरत असलेले त्यांचे बंधू दत्तू सखाहारी चत्तर यांनी आम्ही भारताच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून तुमचे संरक्षण करीत असताना अशा घटना घडून आमचे कुटुंब जर उघड्यावर पडत असेल तर ही जबाबदारी कोणाची ? असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारला.शासनाने या घटनेची दखल घेऊन या कुटुंबाला आर्थिक मदत करावी ‘-संदीप वर्पे,सचिव,राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गट.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,’कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील रहिवासी तरुण गणेश सखाहारी चत्तर (वय-४२ ) हा ८ जून पासून घरातून बेपत्ता झाला होता.नांदुर्खी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाचे शेतात एका अज्ञात इसमाचे  बेवारस प्रेत मिळुन आले होते.याबाबत शिर्डी पोलीसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मयत तरुणाच्या पाठीवर धारदार शस्राने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १३ जून रोजी पोलिसांना दिला.बेपत्ता मयत झालेला तरूण हा कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे निष्पन्न झालेहोते त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली होती.यातील मयताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला ४ हजार ५०० रुपयांना विकला व त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवसाची पार्टी करून आपली विकृतीचा नीचांक दाखवून दिला होता.दुकानदारांकडून हा चोरीचा मोबाईल यातील एका मुलाने विकत घेऊन चालू केल्याने ही खुनाची घटना उघडकीस आली होती.
       
   याबत आरोपींनी आम्ही सर्वांनी मिळुन गणेश चतर यांना ऊसाने,हाताने मारहाण करुन त्यातील एकाने गणेश चत्तर यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकु घेऊन त्या चाकुने पाठीवर भोसकुन गंभीर जखमी केले व त्यानंतर त्याचे खिशातील मोबाईल काढुन घेऊन गेलो असल्याची कबुली दिली होती.घटनेनंतर मृतदेह ऊसाच्या शेतात कुजून गेलेल्या अवस्थेत मिळुन आला होता.सदरचा मोबाईल ४ हजार ५०० रुपयांना विकल्याची कबुली व  पैशाच्या उद्देशाने या तरुणाचा खून केल्याची कबुली या घटनेतील मुलांनी पोलिसांना दिली होती.यातील काही अल्पवयीन मुले हे नशेत होते त्यांच्याकडे मद्याच्या क्वार्टर मिळुन आल्याचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले होते.दरम्यान यातील मयत गणेश चत्तर या तरुणाच्या पश्चात बंधू दत्तू चत्तर,हे असून ते त्रिपुरा राज्यात सैन्यात आपले कर्तव्य बजावत आहेत.

   दरम्यान याबाबत आज राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदीप वर्पे यांनी आज या कुटुंबाची भेट घेतली असता या कुटुंबातील अन्य  सदस्य नाराज असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी आपण सैन्यात सेवा बजावत असल्याने घरची जबाबदारी नेमकी कोणाची असा आर्त सवाल उपस्थितांना विचारला आहे.व मयताच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्या कुटुंबास मदत करावी अशी मागणी केली आहे.

   “आपण चत्तर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली असता भारतीय सैन्यदलात त्रिपुरा येथे हवालदार म्हणून कार्यरत असलेले त्यांचे बंधू दत्तू सखाहारी चत्तर यांनी आम्ही भारताच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून तुमचे संरक्षण करीत असताना अशा घटना घडून आमचे कुटुंब जर उघड्यावर पडत असेल तर ही जबाबदारी कोणाची ? असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारला.महाराष्ट्र शासनाने या घटनेची मानवतवादी भूमिकेतून दखल घेऊन कागदी घोडे न नाचवता तात्काळ या कुटुंबाला आर्थिक मदत अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिव संदीप वर्पे,सचिव,यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close