गुन्हे विषयक
दोन गटात हाणामारी,कोपरगावात आठ जणांवर गुन्हा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कैऱ्या आमच्या घराशेजारी का टाकल्या याचा जाबसाल केल्यावरून राग येवून कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे या ठिकाणी दोन गटात हाणामारी होऊन यात दोन गटातील आठ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कल्याण गोकुळ होन आणि द्वारकाबाई विनायक होन यांनी एकमेकांच्या आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे चांदेकसारे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी या द्वारकाबाई विनायक होन या आहेत.त्यांनी आरोपी प्रमिला कल्याण होन,गोकुळ कल्याण होन,विकास चव्हाण रा.विंचूर तालुका निफाड आणि रमेश चव्हाण यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
वर्तमानात आंब्याचा हंगाम सुरू आहे.अनेकजण आपल्या नव्या जावई आणि लेकिस बोलावून आमरस खावू घालत आहे.तर अनेक जण कैऱ्या आणून आपल्याला वर्षभर जेवण रुचकर लागण्यासाठी लोणचे बनविण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.कैऱ्या तोडून,फोडून नंतर त्यापासून लोणचे बनविण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.मात्र उर्वरित भाग टाकून देत आहे.मात्र त्यापासून आपल्याला उपद्रव होतो या एका कारणावरून कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे या गावात दोन गटात चांगलीच जुंपली असल्याचे दिसून आले आहे.यात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कल्याण होन यांनी पहिली फिर्याद दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,आपली पत्नी प्रमिला होन हीने शेजारी टाकून दिल्या होत्या.याचा राग येवून शेजारी असलेल्या द्वारकाबाई होन यांनी त्यास हरकत घेतली होती.त्यातून हे महाभारत घडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्यातून एकमेकास लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली आहे.यात पहिल्या गुन्ह्यात कल्याण गोकुळ होन हे फिर्यादी असून त्यांनी यात द्वारकाबाई होन,आदित्य विनायक होन,विनायक वामन होन,वैष्णवी विनायक होन याचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांनी आपली पत्नी प्रमिला होन आणि आपली मुलगी विद्या होन यांना घाणघाण शिवीगाळ करून हातात लाकडी फळी घेऊन आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे व आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन जखमी केले असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी या द्वारकाबाई विनायक होन या आहेत.त्यांनी आरोपी प्रमिला कल्याण होन,गोकुळ कल्याण होन,विकास चव्हाण रा.विंचूर तालुका निफाड आणि रमेश चव्हाण यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.त्यात आपल्याला आरोपी प्रमिला होन हीने घाणघाण शिवीगाळ केली आणि कल्याण होन याने लाकडी काठीने आपल्याला डोक्यात मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे आपल्या डोक्याला व कानाखाली जखम झाली आहे.आपले या झटापटीत ब्लाऊज फाटले आहे. मनीमंगळसुत्र गहाळ झाले असल्याचा आरोप केला आहे तर आपल्या पतीस विकास चव्हाण व रमेश चव्हाण यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे म्हंटले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१४९,१५०/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम ११८(१),३५२,३५१,(२),(३) प्रमाणे दोन्ही गटाच्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.एस.ए.कुडके हे करीत आहेत.