जाहिरात-9423439946
दुष्काळ

शेतकऱ्यांना खरिपाची सरसकट नुसान भरपाई द्या-… या संघटनेची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)   

कोपरगाव तालुक्यातील खरिपाची होळी झाली असून शेतकरी हैराण झाला असून त्यांना वाचविण्यासाठी आता सरकारला पावले उचलण्याची गरज निर्माण झाली असून खरीप नूकसानीसाठी शासकीय पातळीवरून तातडीने हालचाल करणे गरजेचे बनले असून आता सरकारने कुठल्याही पंचनामा न करता व अटी-शर्ती न लावता सरसकट प्रथम पंचवीस टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी महत्वपूर्ण  मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते तुषार विध्वंस यांच्यासह शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

गोदावरी कालव्याच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या करंजीच्या खालच्या भागात शेतकऱ्यांना अद्याप शेती सिंचनासाठी पाणी मिळाले नाही मात्र मंत्रालयात असलेल्या उपसचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याने आपला दुरध्वनी खर्च करून जलसंपदा विभागातील कोपरगाव येथील एका अधिकाऱ्यास आदेश दिल्याने करंजीच्या वरच्या भागात पाणी सोडले असल्याची जोरदार वदंता असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील खरी पिकांची होळी झाली आहे.शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.आगामी कालखंड अत्यंत कठीण जाणार असून शेतकऱ्यांना पिण्यासह शेतीची चिंता पडली आहे.जनावरांचा चारा कसा उपलब्ध करायचा याची चिंता लागून राहिली आहे.अनेकांनी कर्ज उचलून खरिपाची पिकांची उभारणी केली असताना त्याची परतफेड कशी करायची याची भ्रांत लागून राहिली आहे.कोपरगाव तालुक्यातील गोदावरी कालव्यांना पाणी असूनही ते शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले नाही.त्याबाबत शेतकऱ्यांनी टाकळी येथे ‘कुलूप तोडो आंदोलन’ करूनही त्याचा जलसंपदा विभाग आणि त्यांच्या अधिकारी वर्गावर काडीचा परिणाम झालेला नाही.त्यामुळे डोळ्यादेखत पाणी वाहत असताना पिके जळताना पाहण्याचा,’न भूतो’ असा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे.त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग धास्तावला गेला आहे.आता केवळ आपले पशुधन कसे वाचवायचे याची चिंता त्यांना लागून राहिली आहे.या पार्श्वभूमीवर  कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने हि मागणी केली आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”राज्य सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळी संकटातून वाचविण्यासाठी एक रुपयांत शेतकऱ्यांना विमा काढण्याचे कौतुकास्पद काम केले आहे.त्याचा मोठ्या प्रमाणावर उदोउदो केला आहे.यात सरासरी सात वर्षाच्या उत्पादनाच्या आकडेवारीनुसार पिकनिहाय व मंडळ निहाय विंम्याची २५  टक्के आगाऊ पीक विमा रक्कम देण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी पुणे यांना आदेश केले आहे.परंतु परिस्थिती या पेक्षा वाईट असून ऑगष्ट महिन्यात तब्बल महिनाभर पाऊस गायब होता.त्यामुळे सगळी पिके उध्वस्त झाली आहेत.त्यातून कुठलेही उत्पादन शक्य नाही.त्यामुळे त्याचा खर्च निघणे अवघड बनले आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ८० टक्के उत्पादकता घटणार आहे.मात्र त्यात पूर्ण तथ्य नाही शेतकऱ्याला झालेला खर्च निघणे अवघड आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळणे गरजेचे आहे.सरकारी खाक्या हा पंचनामा करण्यासाठी सहा महिने थांबण्याचा असतो.तो वर्तमानात परवडणारा नाही त्यामुळे शेतकऱ्यास विमा रक्कम मिळण्यास उशीर होतो.त्यामुळे कुठलाही पंचनामा न करता सरकारने कुठल्याही अटी शर्ती न लावता सरसकट हेक्टरी सत्तर हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी  तुषार विध्वंस यांचेसह पद्मकांत कुदळे,प्रवीण शिंदे,संतोष गंगवाल,अड्.नितीन पोळ,अनिल शेवते,नरेंद्र गिरमे,सदाशिव रासकर,नंदकुमार बोरावके आदींनी शेवटी केली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील गोदावरी कालव्याच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या करंजीच्या खालच्या भागात शेतकऱ्यांना अद्याप शेती सिंचनासाठी पाणी मिळाले नसताना पाणी बंद केले असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात मंत्रालयात असलेल्या उपसचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याने आपला दुरध्वनी खर्च करून जलसंपदा विभागातील कोपरगाव येथील एका अधिकाऱ्यास आदेश दिल्याने करंजीच्या वरच्या भागात पाणी  सोडले असून  खालचा भाग तसाच वंचित ठेवला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी नाराजी पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close