जाहिरात-9423439946
निवडणूक

आमच्या उमेदवारांना निवडून द्या,शहर विकास करुन दाखवू -आश्वासन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या शहराच्या विकासाचे कोणतेच पायाभूत सुविधा पूर्ण करू असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

   पुण्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या असून ज्या नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या त्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून त्याची निवडणूक आता आगामी २० डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.परिणामी राज्यात नगरपरीषद निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा नव्या दमाने सुरू झाली असून त्याचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यात प्रचार वेगाने होत असताना दिसुन येत आहे.त्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या शहराच्या विविध ठिकाणी प्रचारासाठी कॉर्नर सभा संपन्न होत असून शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.

   सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे तसेच प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार व प्रभागातील मान्यवर उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण पाच क्रमांकाच्या तलावाचे काम मार्गी लावले आहे.शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली आहेत.त्याचबरोबर स्वच्छता,भूमिगत गटारी,शहर सुशोभिकरण अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित शिल्लक असलेल्या सर्व मुलभूत प्रश्नांवर येत्या तीन वर्षांत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल.देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके पूर्ण होत असतांना त्यापैकी तब्बल चाळीस वर्षे विरोधकांच्या हातात सत्ता होती.या चाळीस वर्षात कोपरगावचा विकास वेगाने व्हायला हवा होता,मात्र विरोधकांनी जाणीव पूर्वक कोपरगावच्या विकासाची गंगा अडवण्याचे काम केले. नागरिकांच्या समस्या सुटल्या तर राजकारण कशावर करणार,या मानसिकतेतून कोपरगावकरांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आले असल्याचा दावा केला आहे.चाळीस वर्षे सत्ता हातात असतांना विकासाचा एकही प्रश्न शिल्लक राहायला नको होता,परंतु विकास हे कधीच त्यांचे उद्दिष्ट नव्हते,त्यामुळेच कोपरगाव विकासाच्या बाबतीत मागे पडले होते.ज्या प्रमाणे पवित्र गोदावरी नदी कोपरगावमधून वाहते,त्याचप्रमाणे आगामी काळात विकास दिसून येईल असा दावा केला आहे.त्यासाठी कोपरगाव शहरातील जाणकार मतदारांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन शेवटी आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले आहे.

   दरम्यान प्रभाग ०४ मध्ये प्रचार फेरी सुरु असतांना अनेक महिलांनी ओमप्रकाश कोयटे यांचे औक्षण केले आहे.त्यावेळी कोयटे यांनी शहरातील नागरिकांना आपण नक्की निवडून येणार असल्याचा विश्वास असल्याचा त्यांनी दावा केला आहे.यावेळी त्यांनी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून पुन्हा विकासाच्या वाटेवर आणले असल्याचे म्हटले आहे.यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराला विकसित शहराच्या यादीत कोपरगाव शहराला नेवून बसवायचे आहे.कोपरगाव शहराचा विकास हा एकच ध्यास घेऊन कोपरगावकरांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याचे काका कोयटे यांनी यावेळी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close