कोपरगाव तालुका
नगर जिल्हा विभाजन,कोपरगावकरांचे आश्चर्यकारक मौन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
अ.नगर जिल्ह्याचे विभाजन करून नविन जिल्ह्याचे मुख्यालय आपल्याकडेच व्हावे यासाठी श्रीरामपूर,संगमनेर आदी ठिकाणहून मागण्या-बंद-आंदोलने-मोर्चे निवेदने-बातम्यांचा ओघ सुरू असताना कोपरगाव आतालुक्यातील मान्यवर नेत्यांनी याबाबत मात्र सोयीस्कर मौन पाळले आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यामुळे या विषयाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे.
वर्तमानात लोक जितके मूर्खपणात असतील व बायका जितक्या वेड्या असतील तितके या नेत्यांचे पीक अधिक जोमात असते.
दगडास घाम येईल सूर्य पश्चिमेस उगवेल पण वर्तमानातील नेते कधी खरे बोलणार नाही.लोकांचे हित इच्छिने हे नेत्यांचे वतन वृत्तीचे विरुद्ध आहे.याची समज कोपरगाव तालुक्यातील जनतेस येईल तो सुदिन.मात्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होत आहे ते कोण करतो याला महत्व नाही,देर आये,दुरुस्त आये’ म्हणून का होईना पण त्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कौतुक करायला काय हरकत आहे.याचे अप्रूप कोपरगावकरांना वाटायलाच हवे मात्र त्या पातळीवर कोपरगाव तालुक्यात मोठा शुकशुकाट आहे.
अ.नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा.१७ हजार ४१२ चौ.कि.मी.असलेला हा जिल्हा तसा दोन भागात विभागाला आहे.उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा.जसं अ.नगरच्या नामांतरावरुन मागच्या वर्षांपासून राजकारण रंगले असताना राज्य सरकारने दि.३१ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत जामखेड दौऱ्यावर असताना अहिल्यानगर या नवीन नावाची घोषणा करून टाकली आहे.त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अप्पर जिल्हाधिकारी हे पद निर्माण करून याबाबत शिर्डी येथे त्याचे मुख्यालय होणार अशी घोषणा करून त्यासाठी शेती महामंडळाची जमीन देण्याची घोषणा करून टाकली होती.त्याचे शिर्डी करानी स्वागत केले आहे.मात्र कोपरगाव आणि शिर्डी आता नव्याने झालेल्या इंटरचेज मुळे आता एकच झाले असताना त्या बाबत कोपरगावच्या नेत्यांना त्यांचे स्वागत करावेसे वाटले नाही.मात्र त्यावरून प्रथम श्रीरामपूर येथील विविध संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर बंदची घोषणा करून त्याची नूकतीच प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.त्यामुळे संगमनेरकर नागरिक आणि त्यांची जिल्हा कृती समिती आदी मान्यवर जागे झाले असून त्यांनी याबाबत आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.त्या बाबत उत्तर नगर जिल्ह्यात असे वादळ सुरु असताना कोपरगाव शहर आणि तालुक्यातील विविध पक्षांचे नेते मात्र नेहमीप्रमाणे सोयीस्कर मौन पळून बसले आहे.त्याबाबत एकदा काय माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी बातमी दिली होती.त्यानंतर कोणी अधिकृत पदाधिकाऱ्याने याबाबत आपले मौन सोडले नाही.एरवी नको त्या विषयात नाक खुपसणाऱ्या नेत्यांची तालुक्यात कमी नाही.एरव्ही नगरला काही शासकीय कामानिमित्त जायचे म्हटले की,जाण्यायेण्यात माणसांचा दम तुटून जात होता,रस्ता नादुरुस्ती मुळे प्रवासी आणि कार्यकर्त्यांना बांधकाम विभागाच्या गचांड्या मिळायच्या ‘तो’नफा वेगळाच असायचा.त्या दृष्टीने नजीक शिर्डीला जिल्हा कार्यालय होत आहे वेळ आणि पैसा वाचत आहे,की काही साधी बाब नाही.
कोपरगाव तालुक्यात जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्याचे फायदे तोटे समजावून देऊन वारंवार जागृती सभा घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.पी.अन्बलगन यांच्या काळात काकडी येथे विमानतळ मंजूर केले.त्यासाठी कष्ट घेतले तसा ग्रामसभेचा ठराव केलेला आहे.मात्र त्या विमानतळास मात्र नाव शिर्डीचे दिले गेले.त्याबाबत कोपरगाव तालुक्यातील कोणा नेत्याची काहीही तक्रार नव्हती व आजही नाही.त्याच विमानतळाची काकडी ग्रामपंचायतची सुमारे ०६ कोटींची पट्टी थकवली मात्र सदर ग्रामस्थांचा आवाज या नेत्यांच्या जवळपास जात नाही.केवळ विमानतळावर आल्यावर याच ग्रामस्थांकडून हार आणि तुरे घेण्यासाठी या नेत्याना मोठेपणा हवा असतो.
यापूर्वी राहाता तालुका सन-२००० साली स्वतंत्र झाला आमची काहीही तक्रार नव्हती.नैऋत्येकडील दुष्काळी अकरा गावांनी ठराव करून राहाता तालुका जवळ असताना त्यात समाविष्ट करा म्हणून त्यावेळी जिल्हाधिकारी यांचेकडे ठराव पाठवले नेत्याना अवगत केले मात्र याबाबत तालुक्यातील नेत्यांनी सोयीस्कर डोळेझाक केली.त्या गावांकडे आपली मतपेढी म्हणून केवळ पाहिले त्यावर कोणतीही काकू केली नाही व ते दुष्काळी कसे राहतील याची तजवीज केली.राहाता कृषी ऊत्पन्न बाजार समिती सुखनैव जाऊ दिली व स्वतंत्र होऊ दिली.त्यामुळे कृषी माल व भाजीपाला खरेदीसाठी येणारे संस्थानचे माल खरेदी करणारे कर्मचारी शहरात आणि तालुक्यात येणे बंद झाले त्यामुळे अर्थकारण फिरणे बंद झाले आहे.त्यानंतर अनेक वेळा चासनळी,कोळपेवाडी आणि जवळके आदी ठिकाणी उपबाजार सुरु करा हि मागणी त्यांच्या कानावर कधीच गेली नाही.त्यामुळे अन्य तालुक्यांनीं आघाडी मारली मात्र आम्ही केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.कोपरगाव शहर लोकसंख्येच्या बाबतीत मोठे असतानाही शिर्डी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सहजपणे गेले एक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे वगळले तर कोणाच्या पोटात काही दुखलं नाही.
कोपरगाव तालुक्यात जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्याचे फायदे तोटे समजावून देऊन वारंवार जागृती सभा घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.पी.अन्बलगन यांच्या काळात काकडी येथे विमानतळ मंजूर केले.त्यासाठी कष्ट घेतले तसा ग्रामसभेचा ठराव केलेला आहे.मात्र त्या विमानतळास मात्र नाव शिर्डीचे दिले गेले.त्याबाबत कोपरगाव तालुक्यातील कोणा नेत्याची काहीही तक्रार नव्हती व आजही नाही.त्याच विमानतळाची काकडी ग्रामपंचायतची सुमारे ०६ कोटींची पट्टी थकवली मात्र सदर ग्रामस्थांचा आवाज या नेत्यांच्या जवळपास जात नाही.केवळ विमानतळावर आल्यावर याच ग्रामस्थांकडून हार आणि तुरे घेण्यासाठी या नेत्याना मोठेपणा हवा असतो.
समृद्धी महामार्ग जवळून गेला त्याचा इंटरचेज कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे झाला असताना त्यास शिर्डी नाव दिले आमचे काही गेले नाही.तेथील चौकात आता शिर्डी येथील साईबाबा यांचे शिल्प बसवा अशी राजरोस मागणी करण्यात आली आहे.मात्र कोपरगाव तालुक्याचे भूषण असलेली दैत्यगुरु शुक्राचार्य,संत जनार्दन स्वामी यांचे शिल्प बसवावे अशी मागणी कोणालाही करावी वाटली नाही.त्या बाबत ना कोकमठाण ग्रामस्थांची तक्रार आहे ना तेथील या नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची तक्रार आहे.तशीच अवस्था जिल्हा न्यायालयाची आहे.आता राहाता जिल्हा न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे.सदरचे न्यायालय कधीही राहाता येथे पाखरा सारखे उडून जाईल या नेत्यांना त्याचा थांगपत्ता लागणार नाही असा विकास तालुक्याचा जोरात सुरु आहे.कोपरगाव तालुक्यात साधे रस्ते,पिण्याचे व शेती सिंचनाचे पाणी आहे जे इंग्रजांनी दिलेले व निर्माण केलेले पाणी वर्तमान नेत्यांनी नाशिक महापालिका आणि महाकाय उद्योगांना आपसंमतीने वाटून दिले आहे.तरी नागरिक म्हणून आमची कोणतीही तक्रार नाही.आम्ही व आमचे प्रगतशील नेते शेतकऱ्यांना वीज चोवीस तास देऊ शकत नाही.जाऊद्या दिवसांची बारा तास द्याल की नाही ? मात्र तीही शेतकऱ्यांच्या भाळी नाही.
नगर-मनमाड रस्त्याला दुरुस्तीसाठी १९० कोटींचा निधी मंजूर झाला त्याची विल्हेवाट केवळ राहाता तालुक्यापर्यंत लागली आहे.मात्र सावळीविहिर ते कोपरगाव या रस्त्याला निधी का दिला नाही याचा कोणालाही जाब विचारावा वाटला नाही अनेक नागरिक आणि प्रवाशांचे बळी गेले त्या बाबत कोणाच्या डोळ्याला अश्रू आले नाही.ज्यांचे गेले त्यांना त्याची रग लागली असेल आम्हाला काय त्याचे ? अशी वृत्ती काय कामाची ? आमचे नेते केवळ कॅमेऱ्यासमोर मदत करण्याचे अवसान आणण्यात व फोटो काढण्यास धन्यता मानत आहे.तर सार्वजनिक बांधकाम विभाग याच रस्त्यावर केवळ माती टाकून खड्डे बुजविण्याचे धाडस करत आहे.तर आमचे कोपरगावचे नेते केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी नगर दौऱ्यावर आले तर त्यांना बांधकाम खात्याचा एक साधा अभियंता समजुन खड्डे बुजविण्याचे निवेदन देऊन छायाचित्र काढण्याची हौस भागुन घेत आहे याला काय म्हणणार ? कोपरगावचे भाग्य की दुर्भाग्य ? उत्तर पैसे आणि दारूच्या बाटल्या घेऊन मते मते देणाऱ्यांनी शोधायचे आहे.वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस,यांची किंमत सारखीच असते.याचे भान येथील कार्यकर्ते आणि मतदारांना येईल का खरा सवाल आहे.
संपर्क-९४२३४३९९४६.