जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या संस्थेने घेतले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगांव येथील कला,सांस्कृतिक व सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या संकल्पना फाउंडेशन या संस्थेने स्व.मंगलाताई तिरमखे व अंबादास सपकाळ यांच्या स्मरणार्थ कोपरगाव बेट भागातील नगरपालिका शाळा क्र ०५ च्या एकूण ६० विद्यार्थ्यांना सर्व शालेय साहित्य भेट देवून संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे पालकत्व घेतले असल्याची माहिती दिली आहे.

   

प्राथमिक स्तरावर शाळेत जायच्या वयातील शाळेत जाणार्‍या मुलांची सरासरी ९५ टक्के असली तरी त्यातील ४४ टक्के मुलेच दहावीपर्यंत पोचतात,ही वस्तुस्थिती आहे.म्हणजे प्रारंभापासून शाळेतच जात नाहीत,अशा मुलांची संख्या खूप कमी म्हणजे ५ टक्केच आहे.गळती होते ती नंतर त्यासाठी उपाय योजनांची खरी गरज आहे.

   शैक्षणिक गळती हा आपल्या देशातील एक खूप जुना आणि तितकाच चघळला गेलेला विषय आहे.शैक्षणिक गळतीची सांगितली जाणारी कारणेही पारंपरिकच आहेत. त्यांपैकी अनेक कारणे आज कालबाह्यही झालेली आहेत.आपल्या देशात सुमारे सहा कोटीच्या वर मुले शाळेबाहेर आहेत.प्राथमिक स्तरावर शाळेत जायच्या वयातील शाळेत जाणार्‍या मुलांची सरासरी ९५ टक्के असली तरी त्यातील ४४ टक्के मुलेच दहावीपर्यंत पोचतात,ही वस्तुस्थिती आहे.म्हणजे प्रारंभापासून शाळेतच जात नाहीत,अशा मुलांची संख्या खूप कमी म्हणजे ५ टक्केच आहे.गळती होते ती नंतर.म्हणूनच शैक्षणिक गळतीची खूप आधीपासून जी कारणे सांगितली जातात,त्यांतील बहुतांश कारणे ही न पटणारी आहेत.परीक्षेत निबंध लिहिण्यासाठी ती ठीक आहेत.यात गरिबी,जवळपास शाळा नसणे,वाहतुकीची व्यवस्था नसणे,आजारपण,अपंगत्व,शाळेत असुरक्षित वाटणे,पालकांचा व शिक्षकांचा परीक्षेत चांगले यश प्राप्त करण्यासाठीचा दबाव,घरकामात व अर्थार्जनात मदत करण्यासाठी मुलांची गरज ही जी शैक्षणिक गळतीची कारणे सांगितली जातात,ती सार्वत्रिक नाहीत.काही ठिकाणी,काहींच्या बाबतीत,काही प्रमाणात ती लागू होतील; परंतु याच कारणांमुळे सगळीकडील मुले शाळा सोडतात,हा दावा ग्राह्य धरता येणार नाही.या समस्येच्या मुळाशी सार्वत्रिक कारणे काय आहेत,याचा विचार केला तरच या समस्येवर काही प्रमाणात तरी उपाययोजना करता येईल.परंतु या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी ती नक्कीच उपयोगी नाहीत.मात्र या विषयावर काही सामाजिक संस्था पुढाकार घेत आहे ही समाधानाची बाब आहे.या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे वीटभट्टी कामगार,मोलमजुरी करणारे असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच मराठी माध्यमाच्या शाळांचा पट टिकून राहावा  हाच यामागील उद्देश आहे असे या संस्थेचे डॉ.मयुर तिरमखे,गणेश सपकाळ यांनी सांगितले आहे.

   यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या,पट्टी,पेन्सिल व खोडरबर,चित्रकला वही,रंगपेटी,ओळखपत्र आदी साहित्य देण्यात आले आहे.वर्षभरात कोणतीही शैक्षणिक मदत लागल्यास संस्था ती देईल असे आश्वासन संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी दिले आहे.

    सदर प्रसंगी मुख्याध्यापक विलास माळी,शाळा व्यस्थापन समिती च्या अध्यक्षा पूनम गगे,विनोद नाईकवाडे,भाऊसाहेब शिंदे,विलास गोंदकर,शिक्षक सुनील रहाणे,उपाध्यापक नसरीन इनामदार,अमोल कडू,संस्थेचे डॉ.आस्था तिरमखे,गायत्री कुलकर्णी,सुमित खरात,चेतन गवळी,प्रमोद सानप,कैलास नाईक,साईश कुलकर्णी,नरेंद्र मगर,कल्पना सपकाळ,मोनिका सपकाळ,देवांश सपकाळ,अंगणवाडी सेविका राधा आव्हाड व अर्चना वाघमारे आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close