शैक्षणिक
मळेकर यांच्या सारख्या चारित्र्यवान शिक्षकाची समाजाला उणीव भासेल-मराडे महाराज

न्युजसेवा
बीड-(प्रतिनिधी)
डोंगराळ भागातील शिक्षक अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड देत असतात.त्यांना प्रवासाच्या समस्या,शिक्षणाचा अभाव,आरोग्य सुविधांचा अभाव असताना विद्यार्थी घडवणे हे अत्यंत अवघड काम असताना हे जिल्हा परिषद शिक्षक लक्ष्मण मळेकर यांनी कर्तव्य अत्यंत चोखपणे पाडल्याने आज ते विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते शिक्षक झाले असून समाजाला त्यांच्या सारख्या शिक्षकांची आगामी काळात गरज भासणार असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.परशुराम महाराज मराडे यांनी बीड येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण मळेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून डोंगराळ भागातील विद्यार्थ्याना पायी जावून शिक्षण दिले व खुंडरस सारख्या रस्ता नसणाऱ्या गावात ८५ टक्के विद्यार्थी घडवले आहे.आज त्यांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या पदावर जावून आपले मनोगते व्यक्त करून गुरूऋण दर्शवले असून मळेकर यांचे योगदान दाखवून दिले आहे”-परशराम महाराज मराडे,बीड.
बीड येथील देवराई ग्रुपच्या वतीने आपल्या शैक्षणिक सेवेची ३६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षक लक्ष्मण मळेकर यांचा सेवागौरव सोहळा बीड येथील,’हॉटेल ग्रँड यशोदा’ या ठिकाणी नुकताच आयोजित केला होता.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ह.भ.प.परशुराम मराडे महाराज हे बोलत होते.

दरम्यान सत्काराला उत्तर देताना शिक्षक लक्ष्मण मळेकर यांनी आपल्या आजवरच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचे श्रेय आपले ज्येष्ठ बंधू निवृत्ती मळेकर,हरिभाऊ मळेकर,भगिनी गीताबाई चव्हाण,अंबिका औताडे,पत्नी चारुलता मळेकर आणि परिवाराचे असल्याचे नम्रपणे कबूल केले आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख व पत्रकार नानासाहेब जवरे,पत्रकार संघटनेचे माजी तालुका प्रमुख शिवाजीराव गायकवाड,पत्रकार किसनराव पवार,माजी उपशिक्षणाधिकारी प्रल्हाद घोडके,शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीराम बहिर,सुधाकर महाराज शिंदे,संतोष पडोळे,रोटरीचे अध्यक्ष नितीन,प्रा.पंजाबराव येडे,लक्ष्मण काटे,रामप्रभू शेळके,केदारनाथ बहिरमल,रमेश मुलगीर,रामेश्वर राऊत,सुधाकर शिंदे,चारुलता मळेकर,विलास अनवने,सखारामपंत नखाते,मळेकर याचे ज्येष्ठ बंधू निवृत्ती मळेकर,हरिभाऊ मळेकर,भगिनी गीताबाई चव्हाण,अंबिका औताडे,अनुराग मळेकर,राज्यभरातून विविध मित्र परिवार उपस्थित होता.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”लक्ष्मण मळेकर यांचे सारखे शिक्षक हे डोंगरकिन्ही सारख्या दुष्काळी व अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे आले होते.म्हणूनच त्यानी त्या प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून डोंगराळ भागातील विद्यार्थ्याना पायी जावून शिक्षण दिले व खुंडरस सारख्या रस्ता नसणाऱ्या गावात ८५ टक्के विद्यार्थी घडवले आहे.आज त्यांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या पदावर जावून आपले मनोगते व्यक्त करून गुरूऋण दर्शवले असून मळेकर यांचे योगदान दाखवून दिले आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,”सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण मळेकर यांनी आडगाव,खुंडरस या ठिकाणी सर्वाधिक काळ सेवा त्यानंतर रेखानाईक पाडा,नित्रुड,आदी ठिकाणी आपली सर्वाधिक सेवा दिली आहे.त्यातून त्यांनी अनेक ग्रामीण विद्यार्थी यशो शिखवरावर पोहचवले आहे.त्यांनी शिक्षणाच्या गंगेसोबत विद्यार्थ्याना शिस्त,व्यसनमुक्त जीवन,उच्च चारित्र्य,निस्वार्थीपणा,प्रामाणिपणा,मेहनतीला पर्याय नाही हाच धडा शिकवला आहे.त्यामुळेच त्याचे विद्यार्थी आज मोठ्या पदावर पोहचले आहे.राज्यातल्या काही ग्रामीण आणि डोंगराळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळाना विद्यार्थी नाहीत,काही भागात शिक्षक यायला तयार नाही,असं सांगत बंद पाडल्या गेल्या.एकीकडे हे चित्र असताना त्यानी आपले विद्यार्थी घडवत हे ऋषितुल्य काम केले आहे.आपल्या शिक्षणाच्या सेवेबरोबरच आपले ट्रेकिंगचा,योग,विनोदाचा छंद जोपासला आहे हे विषेश ! त्यांनी आगामी काळात आपले आवडते क्षेत्र निवडून त्यात आपला आनंद शोधावा,असे आवाहन करून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते असे सांगून त्यांनी त्यांच्या यशात त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती चारुलता मळेकर यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले आहे.ते सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना सरकार प्रत्येक पाच वर्षांनी पेन्शन वाढ देणार असून शंभर वर्षे पूर्ण केल्यावर ती डबल करणार आहे.त्यानी आपली शंभरी पूर्ण करावी अशी अपेक्षा शेवटी विविध संस्कृत श्लोकांचा उल्लेख करत ह.भ.प.परशुराम मराडे यांनी व्यक्त केली आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक संतोष पडोळे सर यांनी केले आहे.त्यावेळी जिल्हा शिक्षक पतसंस्था अध्यक्ष श्रीराम बहिर,श्री घोडके सर,रोटरीचे अध्यक्ष नितीन गोपण,विद्यार्थी विशाल बर्वे,नवनाथ हटवटे,आदित्य महाजन,सुदर्शन हटवटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन संतोष महाराज डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री कृष्ण उबाळे यांनी मानले आहे.