सामान्य प्रशासन
…या संघटनेने घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना पदाधिकारी आदींच्या शिष्टमंडळाने नुकतीच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आनंद भंडारी यांची नियुक्ती झाल्याबद्दल भेट घेऊन स्वागत करत त्यांचा सत्कार केला आहे.

“दरम्यान गेल्या दोन वर्षापासून दिवसापासून प्रलंबित असलेल्या दहा,वीस,तीस वर्षे आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभाचे आदेश काढण्यात यावे अशी विनंती केली आहे.यावेळी आनंद भंडारी यांनी सकारात्मक सहमती दाखवत सदर प्रलंबित विषयाबाबत विषयाबाबतचे आदेश लवकरच निर्गमित येतील असे आश्वासन दिले आहे”-सुनील राजपूत,अहिल्यानगर,जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना.
यावेळी महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच ग्रामपंचायत अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावामध्ये कार्यरत राहून स्थानिक स्वराज्य संस्थेतील शेवटच्या ग्रामपंचायत स्तरामधून विकास कामाबरोबर शासनाच्या विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून लाभ द्यावा व जनतेच्या अडचणी समजून सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अभिलेख अद्यावत ठेवण्याबाबत सूचना दिल्या यावेळी संवर्गाकडून आपण व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील अशी शिष्टमंडळाने आश्वस्त केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान संघटना शिष्टमंडळाने न्यायालयीन निकालावर आधारित संवर्गांच्या वेतन त्रुटी व खुल्लर समितीने केलेल्या शिफारशी बाबत सविस्तर चर्चा केली आहे.या चर्चेदरम्यान महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि.२४ सप्टेंबर २०२४ नुसार व महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील शासन निर्णय दिनांक दि.०२ जून २०२५ सुधारित शासन निर्णय यांची सांगड घालून कालावधी व पात्रतेनुसार दिनाक ०१ जानेवारी २०१६ पासून काल्पनिकरित्या ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर प्रथम लाभ,विस्तार अधिकारी एस-१४ व २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ,सहाय्यक गटविकास अधिकारी एस-१६,३० वर्षाचे सेवेनंतर तिसरा लाभ,गटविकास अधिकारी एस -२०लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान गेल्या दोन वर्षापासून दिवसापासून प्रलंबित असलेल्या दहा,वीस,तीस वर्षे आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभाचे आदेश काढण्यात यावे अशी विनंती केली आहे.यावेळी आनंद भंडारी यांनी सकारात्मक सहमती दाखवत सदर प्रलंबित विषयाबाबत विषयाबाबतचे आदेश लवकरच निर्गमित येतील असे आश्वासन दिले आहे.यावेळी मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला व शासन निर्णयातील तरतुदी बाबत चर्चा करून लागू करण्याबाबत विनंती केली आहे.
सदर प्रसंगी शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्यसचिव हरिश्चंद्र काळे,जिल्हाध्यक्ष सुनील राजपूत,जिल्हा सचिव शशिकांत नरोडे,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष सुरेश सौदागर,छत्रपती शिवाजी राजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय गवळी,पारनेर तालुका अध्यक्ष बळीराम सेटवाड,सचिव शरद गायकवाड,अहिल्यानगर तालुकाध्यक्ष श्रीपाद फलके,सचिव प्रवीण पवार,जेष्ठ ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन साबळे,सुनील शेलार,राजेंद्र विधाटे,सुनील दुधाडे आदी मान्यवर उपस्थित असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव शशी नरोडे यांनी दिली आहे.