सहकार
श्रीरामपुरात ऊस परिषद नियोजन बैठक

न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथे होत असलेल्या भव्य उस परिषदच्या नियोजनसाठी शनिवार दि.०९ एप्रिल रोजी श्रीरामपुरात कृषी उत्पन्न बाजार समिती नजीक असलेल्या अड.अजित काळे यांच्या सोनमुक्ता अग्रो या कार्यालयात आगामी ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर येथे सकाळीं ११ वाजता बैठक आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संघटक रुपेंद्र काले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या बैठकीस श्रीरामपूर व परिसरातील कार्यकर्ते यांनी बहू संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
“या परिषदेमध्ये प्रामुख्याने दोन कारखाने व दोन इथेनॉल कारखान्यामधील हवाई अंतराची २५ कि.मी.ची अट रद्द करावी अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.या खेरीज फेब्रुवारीनंतर तुटलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी २५ हजार रुपये प्रतिटन नुकसान भरपाई मिळावी, गाळप अभावी शिल्लक राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या करण्यात येणार आहे”-अड.अजित काळे,उपाध्यक्ष,शेतकरी संघटना .
महाराष्ट्र राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक कारखान्याने गाळप क्षेमतेपेक्षा अतिरिक्त उसाची नोंद घेतली आहे. आज कारखाने बहुतेक उसाचे गाळप करू शकले नाही. या संकटाच महावितरणने वीज तोडणी केली होती.या शासनाने निर्माण केलेल्या सुलतानी संकटाच्या पार्श्वभूमीवर आगामी १६ एप्रिल रोजी,श्रीरामपूर येथील” लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय” या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता ऊस परिषदेचे आयोजन केले आहे.
सदर परिषद मध्ये काही महत्वाच्या मागण्यांवर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे उपथीत राहून मार्गदर्शन करणार आहे.
या परिषदेमध्ये प्रामुख्याने दोन कारखाने व दोन इथेनॉल कारखान्यामधील हवाई अंतराची २५ कि.मी.ची अट रद्द करावी अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.या खेरीज फेब्रुवारीनंतर तुटलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी २५ हजार रुपये प्रतिटन नुकसान भरपाई मिळावी, गाळप अभावी शिल्लक राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी,स्व.गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार विकास महामंडळाची शेतकऱ्यांच्या बिलातून दहा हजार रुपये होणारी कपात रद्द करावी,सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल पाटबंधारे पाणी पट्टी बिल कर्जमाफी मिळावी आदी महत्वपूर्ण मागण्या करण्यात येणार आहेत.शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हा लढा असून सर्व शेतकरी बांधवांनी या भव्य ऊस परिषद साठी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अड.अजित काळे पाटील यांनी शेवटी केले आहे.