जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

संताच्या सहवासाने माणसाच्या आयुष्याचे सोने होते- डॉ.फड

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   ज्याप्रमाणे परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे संत हे देखील परीस आहेत संताच्या सहवासाने माणसाच्या आयुष्याचे सोने होत असल्याने माणसांनी संतांच्या सहवासात राहिले पाहिजे असे प्रतिपादन कीर्तनकार निवृत्त आयएएस अधिकारी ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड यांनी कोळपे वाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करतांना माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,प्रबोधनकार ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड,ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड,मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायण मांजरे,कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे आदी मान्यवर.


  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक संचालक,माजी खा.शंकरराव काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात डॉ.विजयकुमार फड यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

      

आ.काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने यावर्षी १३ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत मतदार संघाच्या सहा गटातील भजनी मंडळांना ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विना,पखवाज,हार्मोनिअम,दहा टाळ व एका सतरंजी हे साहित्य आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध भजनी मंडळांना दिले आहेत.

  सदर प्रसंगी माजीआ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन,उपाध्यक्ष नारायण मांजरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,बाळासाहेब कदम,पद्माकांत कुदळे,धरमचंद बागरेचा,विश्वास आहेर,ज्ञानदेव मांजरे,बाबासाहेब कोते,सिकंदर पटेल,संभाजी काळे,कचरू घुमरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,असी.सेक्रेटरी संदीप शिरसाठ,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य,संलग्न संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भगवद गीतेतील आणि ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर ब्रम्हरस आहे.ज्या ठिकाणी भजन कीर्तन असते त्या ठिकाणी परमेश्वर असतो.जीवनाचा उद्धार करायचा असले तर संताच्या सहवासात या अंतकरणापासून भक्ती करा.संत हे सत्याने व सद्विवेक बुद्धीने वागणारे असतात.ज्याप्रमाणे परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे संत हे देखील परीस आहेत संताच्या सहवासाने आयुष्याचे सोने होईल.ज्ञानेश्वरी,हरिपाठ हे देखील संत आहेत.त्यांचे नियमित वाचन करा.तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.जो माणूस स्वत:वर प्रेम करतो तोच माणूस दुसऱ्यावर प्रेम करू शकतो.कर्म हा गीतेचा आधार आहे आणि जे माणसं जीवनात येवून कर्म करतात कर्माने वीर होतात तीच माणसं कर्मवीर असतात.कर्मवीर शंकरराव काळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम अलौकिक आहे.माझ्या कीर्तनात कधीही कुणाचे नाव कधी घेतले नाही मात्र ज्याप्रमाणे संत समाजासाठी जगतात त्याप्रमाणे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं आणि आपल्या वाट्याला आलेलं सत्कर्म करून गेले.त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य हे संताच्या बरोबरीचे असल्याचे प्रबोधनकार ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड यांनी सांगितले.प्रेरणा,नेतृत्व यांचे उदाहरण असलेले माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांची वारकरी संप्रदायाशी नाळ जुळलेली होती.हा वारसा माजीआ.अशोक काळे यांनी जपला आहे असे ते शेवटी म्हणाले आहे.

   दरम्यान आ.काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने यावर्षी १३ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत मतदार संघाच्या सहा गटातील भजनी मंडळांना ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विना,पखवाज,हार्मोनिअम,दहा टाळ व एका सतरंजी हे साहित्य आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते भैरवनाथ भजनी मंडळ सुरेगाव,साई राघवेश्वर भजनी मंडळ कुंभारी,शिवकृपा भजनी मंडळ कान्हेगाव,नारायणगिरी महाराज भजनी मंडळ आपेगाव,जय हनुमान भजनी मंडळ मल्हारवाडी व सावता महाराज भजनी मंडळ पुणतांबा-रस्तापूर या भजनी मंडळांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close