सहकार
सरकारने शेतकरी प्रश्नावर सकारात्मक भूमिका घ्यावी-…या नेत्याची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान काळात शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली असून खरीप पिके वाया गेली असून शेतमाल पिकला त्याला भाव नाही,शेती सिंचनाची अवस्था वाईट झाली असून तीन वर्षात दुष्काळ पाचवीला पुजलेला असून सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहाणे गरजेचे असल्याने प्रतिपादन धामोरी येथील जेष्ठ नेते चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले आहे.

“केंद्र आणि राज्य सरकार आता सहकारी संस्था बाबत सकारात्मक निर्णय घेत असून पुढील काळात सहकारी संस्थांनी पोटनियमात दुरुस्ती करून यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे १५१ व्यवसाय सुरू करावे”-नामदेव ठोंबळ,सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या धामोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.धामोरी या संस्थेच्या,’आपले सरकार सेवा केंद्र'(सी.एस.सी.)केंद्राचा शुभारंभ नुकताच सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांचे हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला आहे त्यावेळी ते अध्यक्षस्थानारून बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”केंद्र शासनाचे सहकार,इलेक्ट्रॉनिक,आय.टी. मंत्रालय व नाबार्ड यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारान्वये धामोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत चालु होत असलेल्या या सी.एस.सी. सेंटर मधुन पिक विमा,७/१२,८अ,उत्पन्नाचा दाखला,प्रतिज्ञापत्र,वीज बिल भरणा,विविध प्रकारचे विमे, नॉन क्रिमीलियर दाखला,पोलिस भरती,मिलीटरी भरती,स्पर्धा परीक्षा फॉर्म अशा विविध प्रकारच्या सुमारे ३०० सेवा नागरिकांना अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सभासदांचा नेतृत्वावर विश्वास असल्याने ४० वर्षांपासून संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे.३० वर्षांपासून सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप केला जातो.सरकारने शेतकर्यांच्या वीज,पाणी,रस्ता,खते,कर्ज वाटप,वसुली धोरण,पिक विमा,नुकसान भरपाई अशा मुलभूत प्रश्नावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे असेही कुलकर्णी यांनी शेवटी म्हटले आहे.
सदर प्रसंगी सहाय्यक निबंधक श्री.ठोंबळ यांनी संस्थेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त करुन सीएससी सेंटर व जेनेरीक मेडिकल सुरू करण्यात संस्था पुढाकार घेत असल्याबाबत संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आहे.सहकारी संस्थांनी पोटनियमात दुरुस्ती करून यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे १५१ व्यवसाय सुरू करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
यावेळी सहकार अधिकारी संदीप नेरे,सी.एस.सी.सेंटर कोपरगांव तालुका समन्वयक सुदाम थोरात,अध्यक्ष अरुण नरहरी भाकरे,उपाध्यक्ष संदीप भगवान जगझाप,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक नारायण पा.मांजरे,ज्ञानदेव मांजरे,सुनील मांजरे,मनोज जगझाप,श्रीकृष्ण गाडे,गौतम सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष पुंडलीक माळी,शरदराव पवार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुदाम गाडे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास माळी,विलास जगझाप,अशोक भाकरे,के.बी.रोहमारे महाविद्यालय,चासनळीचे प्राचार्य,नारायण बारे,न्यु इंग्लिश स्कूल,धामोरी स्थानिक स्कुल कमेटीचे सदस्य रामराव माळी,संस्थेचे आजी माजी संचालक चैतन्य कुलकर्णी,बाबुराव दरेकर,दिलीप माळी,भास्कर वाघ,भाऊसाहेब खिलारी,भाऊसाहेब माळी ,कैलास बारे,माणिक सोमासे,राजेंद्र वाघ,सतिश कोळपे,दत्तात्रय माळी,शरद वाघ,सदाशिव जगझाप,पंडितराव कुलकर्णी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वाईकर,उपाध्यक्ष सुनील जगझाप,शामराव माळी,रविंद्र माळी,बबन वाणी,रामदास भाकरे,प्रकाश लव्हाटे,सोमनाथ सोमवंशी,बाळासाहेब घुले,निवृत्ती शिंदे,मुन्नाभाई शेख,संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी,दिलीप खिलारी,प्रशांत कदम,चेतनकुमार माळी,दिपक आहेर,सागर वाघ,संस्थेचे सभासद,परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माधवराव खिलारी यांनी प्रास्ताविक केले आहे.तर सुत्रसंचालन प्रा.नारायण बारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामराव माळी यांनी मानले आहे.