व्यक्ती विशेष
लोकप्रियतेच्या शिखरावरील कामाचा माणूस…!

न्युजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज वाढदिवस नगर जिल्ह्यातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून त्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे.वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांच्या समर्थकांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती.त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा हा आढावा…

शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.गेली वीस वर्षे जनतेचा बळी घेणाऱ्या नगर-मनमाड रस्त्याला लोकसभेत वाचा फोडली व ०२ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.या रस्त्याबाबत उत्तर नगर जिल्ह्यातील लायकी स्पष्टवक्ते केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार दाखवून दिली आहेच.
भारत किंवा भारतीय प्रजासत्ताक हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे.हा देश क्षेत्रफळाने जगातील ७ वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे,अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली.भाषा,ज्ञान, अध्यात्म,कला,धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे.उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते.अनेक भाषा,अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो.मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारताच्या मानवी अस्तित्त्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत.पुराणतज्ञांनुसार,सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला.

सन-२०२४ मधील तत्कालीन मुख्यमंत्री आणि सरकारने प्रचंड आर्थिक आणि अन्य जोराची ताकद लावूनही शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे मताधिक्य केवळ कमी करू शकले मात्र त्यांना हरवू शकले नाही.त्याला कारण त्यांनी आपल्या पहिल्या सन-२००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर केलेली विकासकामे म्हणजे खासदार म्हणजे काय असतो याचा वस्तुपाठच दाखवून दिला होता तो आजही आणि या पुढेही अनेकांना प्रेरणादायी राहील यात शंका नाही.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत.भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला.कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली.काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता.तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो.भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता.दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील चोल साम्राज्य,विजयनगरचे साम्राज्य,महाराष्ट्रातील सातवाहन,या काळातील कला,स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते.अजिंठा-वेरूळची लेणी,वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर,दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशापर्यंत पोहोचला होता.तदनंतर ११ व्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीम ने सिंध प्रांतात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली.त्यानंतर या देशाची मोठी आर्थिक लूट झाली होती.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उदयानंतर मोगलांचा अस्ताची सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा भारताला स्वर्ण युग येत येता पानिपत चा लढाईत नंतर ते राहून गेले.दुर्बल ठरलेल्या मराठ्यांना इंग्रजांनी बरोबर हेरले आणि त्यांनी आपली शस्त्रे आणि बुद्धिमत्ता,चातुर्य,मुत्सद्दीपणा,फुटीच्या बळावर या साम्राज्याचा अस्त केला.इंग्रजांना शेवटी १५ ऑगस्ट रोजी विविध नेत्यांच्या आंदोलनाची धग बसल्याने येथून बिऱ्हाड गुंडाळावे लागले.त्यानंतर लोकशाहीची पहाट उगवली असून आता जनतेने ही जबाबदारी आता खासदार आणि आमदार यांच्या शिरावर दिली आहे.त्यामुळे यांची जबाबदारीने ही पेलणे ही गंभीर बाब बनली आहे.मात्र किती जण ती पेलताना दिसतात हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे.बोटावर मोजली इतके प्रामाणिक खासदार आपल्याला दिसत आहे.मात्र यातील बहुधा आपली तुंबडी भरण्याची कामे इमाने इतबारे करताना दिसत आहे ही मोठी शोकांतिका आहे.गत दहा वर्षाचा अनुभव पहा याचे उत्तर मिळून जाईल.आणि पाहिले पाच वर्षाची तुलना पाहिली तर गतवर्षीच्या निवडणुकीत लोकांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचा जिरेटोप भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माथी का दिला आहे.याचे उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही.लोकलाटेवर निवडून आल्यावर त्याचे परिणाम मतदारांना कळल्याने आता ती चूक मतदारांच्या लक्षात आली म्हंटले तर ते वावगे
ठरणार नाही.

निळवंडे प्रकल्पास खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता आपल्या पहिल्या टर्म मध्ये मिळवून दिल्या आहेत.त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावता आले आणि १८२ गावातील दुष्काळी जनतेला शेतीला पाणी देता आले आहे.त्यात खा.वाकचौरे यांच्या खेरीज उच्च न्यायालयाचे वकील ऍड.अजित काळे यांनी समितीला मोफत विधी सहाय्य केले त्या शिवाय माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे आदींचे मोठे योगदान लाभलेच पण प्रारंभी काही काळ तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांची मदत झाली हे विसरता येणार नाही.
सन-२०२४ मधील तत्कालीन मुख्यमंत्री आणि सरकारने प्रचंड आर्थिक आणि अन्य जोराची ताकद लावूनही खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे मताधिक्य केवळ कमी करू शकले मात्र त्यांना हरवू शकले नाही.त्याला कारण त्यांनी आपल्या पहिल्या सन-२००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर केलेली विकासकामे म्हणजे खासदार म्हणजे काय असतो याचा वस्तुपाठच दाखवून दिला होता.आज मंदिरे त्यांचे सभागृह,रस्ते,स्वतःचे मानधन वाटप आदी त्यांचे कामाचे रेकॉर्ड अद्यापही कोणालाही मोडता आलेले नाही हे विशेष ! त्यांच्या पहिल्या सत्रातील कामाचा आवाका पाहून काहींना ते डोळ्यात सलू लागले होते व आपले दुकान साधार बंद पडणार याची त्यांना कुणकुण लागली होती.त्यामुळे त्यांनी येनकेन मार्गाने खा.वाकचौरे यांना पक्षांतर करायला भाग पाडले होते.त्यासाठी रात्री बेरात्री त्यांनी डोक्यावर घेतल्या हे लपून राहिले नाही आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षांतर करायला भाग पाडून आपले कळसूत्री बाहुली सत्तेवर आणून आपली पोळी शेकवली होती.मात्र दहा वर्षानंतर मतदार संघातील मतदारांना ही चूक लक्षात आली आहे.त्यांनी त्यांना त्यांची योग्य जागा दाखवली आहे.त्याचा चटका त्यांना दक्षिणेत बसला हे वेगळे सांगायची गरज नाही.ईश्वराच्या काठीचा आवाज येत नाही म्हणतात तो असा.वाम मार्गाचा पैसा हा एक घटक सोडला तर या मंडळींकडे बाकी नाही.आपल्या दुष्काळी जनतेच्या तोंडातील पाणी काढून याच मंडळीनी आपल्या दारू कारखान्यांसाठी वापरले हि बाब निळवंडे कालवा कृती समितीने वेळोवेळी दाखवून दिली आहे.पिण्याचे पाणी पळविण्यात कोणतीही कसर सोडली नाही.त्यातच यांच्या जगण्यात किती राम आहे हे उघड झाले आहे.ज्यांनी ज्यांनी या निळवंडे प्रकल्पास विरोध केला त्यांना त्या त्या मतदार संघातील मतदारांनी जागा दाखवून दिली आहे.याला गेल्या दहा वर्षांतील इतिहास पुरावा आहे.
निळवंडे प्रकल्पास खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता आपल्या पहिल्या टर्म मध्ये मिळवून दिल्या आहेत.त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावता आले आणि १८२ गावातील दुष्काळी जनतेला शेतीला पाणी देता आले आहे.त्यात खा.वाकचौरे यांच्या खेरीज उच्च न्यायालयाचे वकील ऍड.अजित काळे यांनी समितीला मोफत विधी सहाय्य केले त्या शिवाय माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे आदींचे मोठे योगदान लाभलेच पण प्रारंभी काही काळ तत्कालीन मंत्री गिरीश महाजन आदींनी प्रारंभी चांगली मदत केल्याने हा प्रकल्प मार्गी लागला आहे.मात्र उत्तरेतील काही नेते केवळ एका खान्देशी म्हणी प्रमाणे ,’मले पहा आणि पान फुले वहा’ छाप नेत्यांनी केवळ आपण,’ जलदुत आणि ‘ जलनायक’ उपाध्या लावून स्वतःच्याच अंगाला शेंदूर फासून घेण्याचे आश्र्लाघ्य कृत्य केले आहे.त्यांना जनता कधीही माफ करणार नाही.याची दाहक प्रचिती त्यांना आली आहेच.
मात्र खा.वाकचौरे यांचेसह वरील नेत्यांचे ऋण जनता कधीही विसरणार नाही.मागील एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना डोक्यवर घेऊन पुन्हा एकदा जबाबदारी टाकली असून ते त्यास नक्कीच उत्तीर्ण होतील यात शंकाच नाही.त्यांनी लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.गेली वीस वर्षे जनतेचा बळी घेणाऱ्या नगर-मनमाड रस्त्याला लोकसभेत वाचा फोडली व ०२ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.या रस्त्याबाबत उत्तर नगर जिल्ह्यातील लायकी स्पष्टवक्ते केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार दाखवून दिली आहे.हा रस्ता नेहमी कमिशन आणि नालायक नेत्यांच्या कृत्याचा बळी ठरला आहे हे सांगण्यास उत्तर नगर जिह्यातील नागरिक कोणीही अजिबात कचरणार नाही.तरीही ही मंडळी,’गिरे तो भी टांग उपर’ या शैलीत आपला देखावा करतात तेंव्हा कोणाही सुज्ञाची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही.आज याची आठवण येण्याचे कारण आज विद्यमान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा वाढदिवस आहे.आणि सामान्य मतदारांना विशेषतः वीना पैशाचे मतदान करणाऱ्या पवित्र मतदारांना त्यांचेकडून खूप खूप अपेक्षा आहे.ते नक्कीच या अपेक्षांना पुरून उरतील याच कोणाच्याही मनात शंका येणार नाही.त्यांना,’न्युजसेवा वेबपोर्टल’च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!
मो.9423 43 9946.