जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

शैक्षणिक दाखल्यांचे वितरण तात्काळ तासात करा-सूचना

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यापासून चोवीस तासाच्या आत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांचे वितरण करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी नुकत्याच कोपरगाव तालुक्यातील सेतू चालकांना एका बैठकीत दिल्या आहेत.

कोपरगाव शहरातील विविध बँकेसह जवळपास दहा आधार केंद्रे कार्यरत असताना यातील केवळ दोन आधार केंद्रे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे.यावर तहसीलदार महेश सावंत यांना विचारणा केल्यावर एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.

   महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.राज्यातील सर्व नागरिकांना सुलभ,तत्पर आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देणे हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे.राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नागरिकांना महसुल विभागाने आपल्या सर्व सेवा ऑनलाईन द्याव्यां असे निर्देश दिले असताना नगर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून आपल्या विभागांतर्गत सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात,असे निर्देश अहील्यानगर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले आहे.या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव महसूल विभागाची बैठक आज सकाळी तहसील कार्यालयात आयोजित केली होती.त्यावेळी हे निर्देश दिले आहे.

  सदर प्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,संजय गांधी योजनेचे श्री चौरे,सेतू चालक संघटनेचे एस.एल.शिंदे,सतीश कदम,वैभव चव्हाण,पराग खंडीझोड,दिपक कांबळे,दिपक पूरकर,दिपक पानगव्हाणे,श्री.लामखडे आदीसह बहुसंख्येने सेतूचालक उपस्थित होते.यांनी मुरादे,
 
  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगांव तालुक्यातील अर्जदारांना दाखल्यासंदर्भात कुठलाही ञास होता कामा नये,सर्व सेतूकेंद्र चालकांनी प्रमाणपत्रांसाठीची फी दर्शविणार फलक दर्शनी भागात लावावेत,लवकरच तालुक्यातील सर्व सेतूच्या कामकाजाची तपासणी करणार‌ असल्याचे जाहीर करताना त्यांनी सेतूकेंद्रात अर्ज दाखल झाल्यावर त्याच दिवशी तो ऑनलाईन पोर्टलला अपलोड झालाच पाहिजे अशा कडक सूचना दिल्या आहेत.यावेळी उपस्थितांचे आभार श्री मुरादे यांनी मानले आहे.
 
   दरम्यान कोपरगाव शहरातील विविध बँकेसह जवळपास दहा आधार केंद्रे कार्यरत असताना यातील जवळपास आठ आधार केंद्रे बंद पडली असून केवळ दोन आधार केंद्रे सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत असल्याची माहिती हाती आली आहे.यावर तहसीलदार महेश सावंत यांनी स्वतंत्र बैठक लावणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close