जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

…या संस्थेच्या चौकशीसाठी उद्या कोपरगावात पथक !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड अंतर्गत शेतमाल खरेदी करताना ७० रुपयांची हमाली,तोलाई शेतकऱ्यांच्या माथी लादली गेली असताना व शेतकऱ्याची ६५ हजाराच्या सोयाबीनची चोरी होऊनही त्याचा गुन्हा न दाखल करण्याचा उद्योग केला असताना कामाचा ठेका मिळण्यासाठी टक्का न दिल्याने दिलेला त्रास समोर आला असताना या कृषी उत्पन्न बाजार समितीची उद्या सकाळी ११ वाजता या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नाशिक सहकार आयुक्तांचे एक पथक येत असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

   

दरम्यान दीड वर्षापूर्वीच गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे विरुध्द काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि संजीवनीचे विवेक कोल्हे यांच्या गटाने एकत्र येत निवडणूक लढवली होती.विशेष म्हणजे ही नैसर्गिक युती नसताना त्यात त्यांना यशही मिळाले आहे.मात्र आता ही युती कोपरगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रणांगणात ३६ चा आकडा बनली आहे.त्यामुळे संगमनेरी किल्ल्यावरून आदेश आल्यावर ही लढत रंगणार की रेवड्याची ठरणार याकडे कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

   कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड अंतर्गत शेतमाल खरेदी करताना ७० रुपयांची हमाली,तोलाई शेतकऱ्यांच्या माथी लादल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट झाल्याचे उघड झाले असताना या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्याने हमी भावाने विक्रीसाठी आपल्या रिक्षातून आणलेल्या १३.५ क्विंटल सोयाबीनची चोरी झाली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून समितीची अब्रू वाचवण्यासाठी समितीच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्याऐवजी ६५ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या (की बाजार समितीच्या ?) खिशातून संबधित शेतकऱ्याला भरून दिली असल्याची घटना उघड झाल्याने ही बाजार समिती आहे की शेतकऱ्यांची लूट करण्याचे केंद्र आहे ? असा सवाल निर्माण झाला होता.त्यातच बाजार समितीच्या कारभाऱ्यांचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचा आणखी एक पराक्रम मागील सप्ताहात समोर आला आहे.काम मंजुरीसाठी टक्का न दिल्याने आपल्याला काम नाकारले असल्याची तक्रार एका तरुणाने नगर येथील जिल्हा सहकारी निबंधक यांचेकडे केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.हे कमी की काय आता एका शेतकऱ्याने नव्हे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची चौकशीची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन सहकारी जिल्हा निबंधक यांनी याबाबत चौकशी पाठक नेमले होते.मात्र यात काही काळेबेरे असल्याचा संशय आल्याने व संबधित चौकशी अधिकारी उत्तम नाटक वठवत असल्याचे उघड झाल्याने सदर पथकावर त्यांनी हरकत घेतली होती.परिणाम स्वरूप नाशिक सहकार आयुक्तांनी या चौकशीला नाशिक जिल्ह्यातील पथक नेमावे अशी मागणी तक्रारदार इसमाने केली होती.त्यामुळे या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उद्या सकाळी ११ वाजता नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सहकार विभागाचे पथक येत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्याचा नाशिक जिल्हा सहकारी उपनिबंधक यांचेकडील आदेश पत्र जा.क्रं.३०३८ /पणन/कृ बा. स कोपरगाव/तक्रारदार/त.अ.चौकशी/२०२५, दि.०२ जून २०२५,तर नाशिक येथील आदेश जावक प्रशासन/पणन/कृउबास/कोपरगाव/तक्रारदार/त./अ.चौकशी/कार्यवाही/सन-२०२५/क्रं.८८३/२०२५ दि.१८ जून २०२५ असा आहे.त्या अर्जात तक्रारदार इसमाने बाजार समितीतील सचिव यांना सक्तीचे रजेवर पाठविण्याची मागणी केली आहे.
 
  दरम्यान या चौकशी पथकाचे प्रमुख सहाय्यक निबंधक विजयसिंह राजपूत असल्याची माहिती आहे.त्यासाठी तक्रारदार इसम व कोपरगाव बाजार समितीचे सत्ताधारी भाजप (कोल्हे गटाचे ) सभापती साहेबराव रोहोम,सचिव नानासाहेब रनशुर आदींना सहकार विभागाने कळवले आहे.मागील सप्ताहात एक पथक चौकशी करून गेले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस उपलब्ध झाली असून त्यावेळी बाजार समितीचे सचिव रणशुर यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे ही खरेच चौकशी होणार की हे चौकशी पथक सत्ताधारी गटाची तळी उचलणार हे लवकरच उघड होणार आहे.

  काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने याबाबत दिनाक २३ एप्रिल व ३० एप्रिल २०२५ रोजी लागोपाठ दोन निवेदने देऊन या संस्थेच्या चौकशीची मागणी केली होती.त्यासाठी त्यांनी मूळ तक्रारदार यांना आरोपाच्या चौकशीसाठी संबधित बाजार समितीचे मूळ दस्तावेज घेऊन उपस्थित राहण्यास कळवले आहे.सदर पत्राच्या प्रती विभागीय आयुक्त सहकारी संस्था नाशिक,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक आदींना पाठवल्या असल्याचे दिसून येत आहे.

  दरम्यान दीड वर्षापूर्वीच गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे विरुध्द काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि संजीवनीचे विवेक कोल्हे यांच्या गटाने एकत्र येत निवडणूक लढवली होती.विशेष म्हणजे ही नैसर्गिक युती नसताना त्यात त्यांना यशही मिळाले आहे.मात्र आता ही युती कोपरगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रणांगणात ३६ चा आकडा बनली आहे.त्यामुळे संगमनेरी किल्ल्यावरून आदेश आल्यावर ही लढत होणार की रेवड्याची ठरणार याकडे कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close