पणन
बाजार समितीत ६५ हजारांची चोरी,गुन्हा नाहीच; उलट भरपाई ?

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड अंतर्गत शेतमाल खरेदी करताना ७० रुपयांची हमाली,तोलाई शेतकऱ्यांच्या माथी लादल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट झाल्याचे उघड झाले असताना या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्याने हमी भावाने विक्रीसाठी आणलेल्या १३.५ क्विंटल सोयाबीनची चोरी झाली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून समितीची अब्रू वाचवण्यासाठी समितीच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्याऐवजी ६५ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या खिशातून संबधित शेतकऱ्याला भरून दिली असल्याची घटना उघड झाल्याने ही बाजार समिती आहे की शेतकऱ्यांची लूट करण्याचे केंद्र आहे असा सवाल निर्माण झाला आहे.

बाजार समितीत झालेल्या ६५ हजाराच्या सोयाबीन चोरीबाबत वास्तविक कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल होणे गरजेचे होते.मात्र झाले उलट.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सी.सी.टी.व्हि.कॅमेरे व दोन्ही प्रवेशद्वारात सुरक्षा रक्षक असताना संचालक मंडळाच्या व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी ही जब्बर चोरी केली होती.त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.चोरट्यांनी याबाबत मेहरबान झालेल्या संचालक मंडळाच्या या कारभाराबाबत आपल्या डोक्याला नक्कीच हात लावला असेल.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा (APMC) स्थापन करण्याचा सरकारचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळवून देणे,तसेच त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे.मोठा व्यापारी वर्ग (किरकोळ विक्रेता) शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणात शोषण करत होता.बाजार समिती यातून शेतकऱ्यांचे संरक्षण करते आणि ते त्यांच्या मालाची विक्री योग्य दरात करू शकतात.शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी एकच ठिकाण उपलब्ध करून देणे,ज्यामुळे त्यांना वेळ आणि खर्च वाचतो.या शिवाय व्यापा-यांना खरेदीसाठी एकच ठिकाण उपलब्ध करून देणे,ज्यामुळे त्यांना मालाची उपलब्धता आणि दर्जा तपासणे सोपे होते.बाजार समितीच्या माध्यमातून शेती ते किरकोळ किंमत श्रेणीतील फरक कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो,ज्यामुळे ग्राहकांनाही योग्य किंमतीत माल उपलब्ध होतो.बाजार समित्यांमध्ये वजन करणे,प्रतवारी करणे व गोदामाच्या माध्यमातून साठवणूक करणे,इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.मात्र कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत याच्या उलट अनुभव येत असून समितीचे संचालक केवळ ईशान्य आणि पश्चिम गडाचे शोभेचे बाहुले असल्याचे वारंवार उघड होत आहे.अशीच घटना आमच्या प्रतिनिधीने नुकतीच उघड केली असताना त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेकडील चासनळी परिसरारील एक शेतकरी ज्याचे पिताश्री विसाव्या शतकाच्या अखेरीस समितीच्या महत्वाच्या पदावर विराजमान होते.पुढे त्यांचे निधन झाले आहे.ते ईशान्य गडाचे आजन्म समर्थक राहिले आहे.त्यांच्या जवळच्या नातेवकाने दोन महिन्यापूर्वी आपली १३.५ क्विंटल सोयाबीन हमी भावाने विक्रीसाठी आणली होती व ती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवली होती.दुसऱ्या दिवशी त्याची खरेदी होणार होती.मात्र आदल्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ती समितीच्या आवारातून चोरून नेली आहे.त्याचे बाजार मूल्य हे जवळ जवळ ६५ हजार इतके होते.त्याबाबत मोठी वाच्यता झाल्यावर याबाबत समितीच्या संचालक मंडळात मोठे वादळ निर्माण झाले होते.त्याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल होणे गरजेचे होते.मात्र झाले उलट.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सी.सी.टी.व्हि.कॅमेरे व दोन्ही प्रवेशद्वारात सुरक्षा रक्षक असताना संचालक मंडळाच्या व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी ही जब्बर चोरी केली होती.त्यामुळे मोठी खळबळ उडाली खरी पण यात ईशान्य गड आणि पश्चिम गड आणि अन्य बिनविरोध निवडणूक करणाऱ्या सहाय्यक दोन गटांनी याबाबत सोयिस्कर मौन पाळले होते हे विशेष ! मात्र याबाबत जबाबदारी निश्चित होत आहे हे पाहून प्रशासनातील एका जबाबदार अधिकाऱ्यानं याबाबत स्वतःच्या खिशाला चाट लावून सुमारे ६५ हजार रुपयांची रक्कम संबधित शेतकऱ्याला भरून दिली असल्याची माहिती आहे.त्यामुळे जनतेने बिन विरोध निवडून दिलेले संचालक आणि पदाधिकारी,प्रशासन किती निष्ठेने शेतकऱ्यांचे कोटकल्याण करत आहे हे उघड झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी डोक्याला हात मारून घेतला आहे.याची कोपरगाव,राहाता आणि नगर जिल्ह्यात जोरदार उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपण कोणाला बिनविरोध निवडून देत आहोत या निमित्ताने उघड झाले आहे.आणि डोक्याला हात मारून घेतला आहे.