जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

उमेदवार अपात्रते बाबत झाला हा निकाल !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजप नगराध्यक्षपदाचे आ.आशुतोष काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे व त्यांचे अन्य ३० नगरसेवक पदाचे उमेदवार यांना अपात्र ठरविण्याबाबत काल दिवसभर व आज सकाळी एक तास सुनावणी संपन्न झाल्यानंतर आज जिल्हा व सत्र न्या.डी.डी. अलमले यांनी आज दुपारी ३.४५ वाजता हे अपात्रतेबाबत प्रकरण फेटाळले असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान या प्रकरणी काळे गटाने जल्लोष केला आहे.तर माजी आ.कोल्हे गटात नाराजीचा सूर उमटला आहे.

 

माजी आ.कोल्हे गटाने राष्ट्रवादी आ.काळे गटाचे सर्व उमेदवार अपात्र करावे अशी जोरदार मागणी करून उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे न्यायालयाचे लक्षात आणून दिले होते.त्यामुळे या निकालाकडे नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होते.तथापि याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले आपला निकाल नुकताच जाहीर केला असून सदर प्रकरण फेटाळले आहे.त्यामुळे आ .काळे गटाने समाधान व्यक्त केले आहे.

    राज्यात एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.तर उमेदवारी मागे घेण्याची २१ नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती.तर ०३ डिसेंबर रोजी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहे.त्यामुळे राज्यातील मतदारांचे या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.कोपरगाव नगरपरिषद हद्दीत बहुरंगी लढत होणार असल्याचे उघड झाले आहे.भाजप निष्ठावान गटाचे अपक्ष उमेदवार व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,वर्तमानात कोल्हे गटाचे उमेदवार पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सपना मोरे,शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदी तर उघड उघड एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेच पण अपक्ष उमेदवार दिपक वाजे यांचा समावेश आहे.

   दरम्यान दुसरीकडे सत्ताधारी आ.आशुतोष काळे गटास पायगुंता घालण्यासाठी माजी आ.कोल्हे गटाने कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एक अपील करून छाननीत घोळ झाला असल्याचा जिल्हा व सत्र न्यायालयात दावा करुन याबाबत अड.जयंत जोशी यांनी काल रविवार असूनही दिवसभर जोरदार युक्तिवाद केला होता. त्यांनी,”प्रतिवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे व त्यांचे अन्य तीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी दिनाक 15 नोव्हेंबर रोजी ऍड.विद्यासागर शिंदे यांचे समोर जे शपथ पत्र दाखल केले आहे त्या शपथपत्राचे शेवटी सह्या केलेल्या नाही.दाखल शपथ पत्रात शेवटी सह्याच केलेल्या नाही,सर्व मजकूर भरला नव्हता तो नंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी कायद्याविरूध्द जावून भरला असल्याचा आरोप करून त्यावर हरकत घेतली होती,शपथ पत्र भरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुसऱ्या दिवशी त्यात बदल अथवा खाडाखोड करता येत नाही.मात्र नेमकी तीच घटना घडल्याने ते अर्ज बाद करण्याची गरज होती.मात्र त्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला होता.पुढे त्यांनी ,”त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने निवडणूक आयोगाला तसे नियम बनवायला भाग पाडले आहे.मात्र त्यांची निवडणूक अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नसल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले होते.या प्रक्रियेत केवळ पराग संधान व राजेंद्र झावरे या दोन उमेदवारांचे अर्ज वगळता अन्य उमेदवारांसह अर्ज सदोष आहे.ते अपात्र ठरवणे गरजचे होते.मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.निवडणूक छाननीत आक्षेप नसताना ते अपात्र ठरवणे अधिकाऱ्यांचे काम होते.ते कर्तव्य त्यांनी चोख पार पाडले नाही.ज्या उमेदवाराच्या सह्या नाही असे शपथपत्र अपात्र करणे गरजेचे असताना ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले नाही असा युक्तिवाद केला आहे.व नगराध्यक्ष उमेदवार ओमप्रकाश कोयटे आणि त्यांचे अन्य सहकारी नगरसेवक पदाचे तीस उमेदवार आदींचे अर्ज बाद करावे असे मुद्दे न्यायालयासमोर उपस्थित केले होते.

  दरम्यान प्रतिवादी राष्ट्रवादीच्या वतीने छ.संभाजीनगर येथून खास सुनावणीसाठी निमंत्रित केलेले ज्येष्ठ वकील कातनेश्र्वर गाडे यांनी काम पाहिले असल्याची माहिती आहे या प्रकरणी सुनावणी काल सायंकाळ पर्यंत पूर्ण झाली असल्याची माहिती हाती आली होती.तरी आज सकाळी कोल्हे गटाचे वकील जयंत जोशी व एस.एम.वाघ यांनी पुन्हा एक तास जोरदार युक्तिवाद केला होता.व हे सर्व उमेदवार अपात्र करावे अशी जोरदार मागणी करून उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे न्यायालयाचे लक्षात आणून दिले होते.त्यामुळे या निकालाकडे नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होते.तथापि याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले आपला निकाल नुकताच जाहीर केला असून सदर प्रकरण फेटाळले आहे.त्यामुळे आ .काळे गटाने समाधान व्यक्त केले आहे.

   दरम्यान या प्रकरणी सरकारी पक्षाचे वतीने अभियोक्ता ऍड.अशोक वहाडणे,प्रदीप रणधीर यांनी काम पाहिले आहे.तर प्रतिवादी विरूध्द ऍड.जयंत जोशी, ॲड.एस.एम.वाघ यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close