न्यायिक वृत्त
वकील संघाच्या अडचणी यापुढेही सोडवू -…यांचे आश्वासन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव वकील संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले असून त्या प्रयत्नातून न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर असून राहिलेल्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

“कोपरगाव शहराच्या न्यायिक व सामाजिक प्रगतीचा महत्त्वाचा स्तंभ आहे.नागरिकांमध्ये न्यायाविषयी विश्वास निर्माण करणे,ही काळाची गरज आहे आणि यासाठी वकील बांधवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजासाठी, सामान्य माणसासाठी आणि न्यायासाठी आपण सतत झटत रहावे”-आ.आशुतोष काळे, कोपरगाव.
कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ.काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. शरद गुजर,उपाध्यक्ष अॅड. महेश भिडे, महिला उपाध्यक्ष अॅड.सविता कदम (पोळ), सेक्रेटरी अॅड.परेश डागा,सह सेक्रेटरी अॅड. महेश जाधव,खजिनदार अॅड.नितीन गिरमे, माजी अध्यक्ष अॅड.अशोकराव वहाडणे, अॅड.भास्करराव गंगावणे,अॅड.एम.एस.खिलारी,अॅड.पी.एस.चांदगुडे,अॅड. एस.जी. जामदार,अॅड.चारुशीला धोंडे,अॅड. देशमुख, अॅड.एस.डी. रक्ताटे,अॅड.डी.डी.उगले, अॅड.आतिश आगवन,अॅड.मनोज कडू, अॅड.एस.बी.लोहकणे, अॅड. एम.पी.येवले, अॅड.एस.पी.खामकर,अॅड. डी.डी. पोळ, अॅड.आर.एन. पिंगळे,अॅड. सुयोग जगताप,अॅड. जी.एम.गुरसळ,अॅड. व्ही.जी. काजळे,अॅड. प्रताप निंबाळकर,अॅड.एस.एम. मोकळ आदींसह वकील बांधव उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वकिल न्यायव्यवस्थेचा कणा असून हा कणा मजबूत ठेवण्यासाठी व वकील संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. कोपरगाव बार असोसिएशनची उत्कृष्ट परंपरा आहे.ही केवळ वकिलांची संघटना नसून ती कोपरगाव शहराच्या न्यायिक व सामाजिक प्रगतीचा महत्त्वाचा स्तंभ आहे.नागरिकांमध्ये न्यायाविषयी विश्वास निर्माण करणे,ही काळाची गरज आहे आणि यासाठी वकील बांधवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजासाठी, सामान्य माणसासाठी आणि न्यायासाठी आपण सतत झटत रहावे.कोपरगाव बार असोसिएशन ही न्याय व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून नवीन पदाधिकारी बार असोसिएशनच्या सामाजिक जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडतील असा विश्वास यावेळी आ.काळे यांनी व्यक्त केला.