जलसंपदा विभाग
पूर पाण्यातून…या तालुक्यातील ओढेनाले खळखळणार !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी,खु.,मढी बु.,देर्डे चांदवड,घारी,चांदेकसारे,डाऊच बु.,डाऊच खु.,या सात गावांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या उमरावती नदीवरीलq सातही गावातील सर्व बंधारे भरले जाणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी जाधव यांनी दिली आहे.

“दोन वर्षापूर्वी आ.आशुतोष काळे यांनी या उमरावती नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून घेतले आहे.पावसाळ्यात सातत्याने हि नदी वाहती असल्यामुळे नागरीकांना आगामी काळात पाण्याची टंचाई जाणवणार नाही”-शिवाजी जाधव,कार्यकर्ते,राष्ट्रवादी अजित पवार गट.
गेले काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक मधील दारणा धरण ६० व त्यापेक्षा अधिक टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी गोदावरी नदी आणि कालव्यातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे.तसेच गंगापूर धरणही ४८ टक्के भरले आहे.३२२८ वरून ४,८४२ क्यूसिक्स वेगाने पाणी प्रवाहित होत आहे.नांदूर माध्यमेश्वर धरणात पाणीसाठा वाढल्याने विसर्गात वाढ झाली आहे.हे सर्व प्रवाहीत पाणीलवकरच पोहचण्याची शक्यताआहे.यामुळे समन्यायी धोरणानुसार मराठवाड्यातील जायकवाडीचे पुरेसे ६५ पाणी साठल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कमी होणार आहे.परिणामी जलसंपदा खाते उदार झाले आहे.त्यांनी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडायला नको म्हणून थेट काळजी सुरू केली आहे.परिणामी विविध ओढेनाले यांचे ‘ एस्केप”ची कवाडे मोकळी केली आहे.त्यामुळे अन्य नदीनाल्यांप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील अनेक छोट्या नद्या आणि ओढे यांचे दरवाजे खुले केली आहे.अमरावती नदी त्याला अपवाद नाही.परिणामी मढी खु.,मढी बु.,देर्डे चांदवड,घारी, चांदेकसारे, डाऊच बु.,डाऊच खु.,या सात गावात अनेक बंधारे भरले जाणार आहेत.परिणामी त्यामुळे या सातही गावातील भूजलपातळी वाढली जावून नागरीकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.