जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

दर्जेदार कामासाठी सावध रहा-…या नेत्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव मतदार संघात मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे व हि विकास कामे करून घेण्याची जबाबदारी नागरीकाचीही असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव शहरात रु.१.५५ कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करतांना समाधान वाटत आहे.या विकास कामांना मागील वर्षीच मंजुरी मिळाली होती परंतु निवडणूक कार्यक्रम असल्यामुळे या कामांना निधी मिळण्यास काहीसा उशीर होवून कामे सुरु होण्यास देखील उशीर झाला असल्याची कबुली आ.काळे यांनी दिली आहे.

  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे येत्या ५ ऑगस्टला नाशिक येथे आढावा घेणार आहेत.यावेळी वाघमारे हे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीची माहिती घेणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या नाशिक दौऱ्यासाठी जिल्हा निवडणूक शाखा व ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडून तालुका पातळीवरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आवश्यक असणारी माहिती संकलित करत आहे.तर दुसरीकडे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आदींनी आपल्या मतांची बेगमी करण्यासाठी आपल्या भात्यात बाण भरण्याचे काम सुरू केले आहे.त्याची प्रचिती कोपरगाव तालुक्यात येऊ लागली आहे.

   त्यासाठी कोपरगाव शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्र.०१ मध्ये साई सिटी ते शांतीनगर चर ते आहेर घर सी.डी.वर्कसह रस्ता करणे (५० लक्ष), गिरमे घर ते कोपरे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे (२० लक्ष) व कृष्णा आवारे घर ते गुंजाळ घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (३० लक्ष), प्रभाग क्र.९ मध्ये गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे (३० लक्ष) व प्रभाग क्र.१४ मध्ये गजानननगर-गोरोबानगर रस्त्यावरील सी.डी. वर्क करणे (२५ लक्ष) अशा एकूण १.५५ कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहरात रु.१.५५ कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करतांना समाधान वाटत आहे.या विकास कामांना मागील वर्षीच मंजुरी मिळाली होती परंतु निवडणूक कार्यक्रम असल्यामुळे या कामांना निधी मिळण्यास काहीसा उशीर होवून कामे सुरु होण्यास देखील उशीर झाला मात्र यापुढे पुन्हा नियमितपणे विकासकामे सुरु राहतील.यापुढील काळात कोपरगावच्या विकासासाठी अजून निधी मंजूर करून आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.शहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा,नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात हे माझं ध्येय असून शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी मी कटिबद्ध आहे.त्यामुळे होणाऱ्या विकास कामांचा दर्जा गुणवत्तापूर्ण असावा.कामाच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड चालणार नाही. नागरीकांनी देखील सुरु असलेल्या विकासकामात हलगर्जीपणा होत असेल तर आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरीकांची देखील जबाबदारी आहे.त्यामुळे तुम्ही देखील सुरु असलेल्या विकासकामांवर लक्ष ठेवा.नागरिकांच्या गरजा ओळखून विविध विकासकामांना सुरुवात होत असल्याचा दावा केला आहे.पुढील काळातही अशाच प्रकारे विकासकामे करून कोपरगावला एक आधुनिक व सुविधायुक्त शहर बनवण्याचा माझा प्रयत्न सुरूच राहील असे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

  सदर प्रभागातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामांना आ.काळेंच्या प्रयत्नातून मुहूर्त लागल्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close