जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या तालुक्यात वाळूमुळे घरकुलांचे काम ठप्प!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    घरकुल बांधकामासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार असल्याची राणा भीमदेवी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्तेत येताच केली व याबाबतचे निर्देश मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिले असले तरी या आदेशाला हरताळ फासण्याचे काम कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी करतात की काय अशी शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  

“कोपरगाव तालुक्यात सन २०२४-२५ मध्ये तालुक्यात एकूण ०५ हजार घरकुले मंजूर झाली असून चालू वित्तीय वर्षात ०१ हजार २०७ घरकुले मंजूर झाली असून एकूण दोन वर्षात ०६  हजार २०७ घरकुले मंजूर झाली आहे.तथापि यातील ०२ हजार ६०३ घरकुल लाभार्थ्यांनी वाळू नेली असून त्यातील काहींनी पन्नास टक्के तर काहींनी पूर्ण वाळू नेली आहे.मात्र यातील  बहुतांशी कामे अर्धवट असून त्यांना वाळूची आवश्यकता आहे”- संदीप दळवी,गटविकास अधिकारी,पंचायत समिती,कोपरगाव.

    घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.१४ मे २०२५ रोजी दिले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात राज्यासाठी ३० लाख घरकुले दिली आहेत.या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे.मात्र,या घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.यासाठी तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व घरकुल लाभार्थींना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहच करणे आवश्यक आहे.त्याची नोंदही ठेवण्यात यावी.यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसोबत तर तहसिलदारांनी आमदारांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागणीनुसार वाळूची निर्गती करणे आवश्यक आहे.आगामी पावसाळी अधिवेशनात एकही तक्रार येता कामा नये असे सांगूनही त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत असून कोपरगाव तालुक्यात घरकुले बांधण्याचे काम मोठ्या जोरात सुरू आहे.यातील कामे बहुतांशी अंतिम टप्प्यात असल्याचे समजत आहे.मात्र त्या कामांना अंतिम टप्प्यात वाळू मिळत नाही अशा तक्रारी आल्या आहेत.त्यामुळे देशाच्या पंतप्रधानाचे स्वप्न कसे पूर्ण होणार ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.याबाबत ताबडतोब कोपरगाव तालुक्यातील घरकुलाना वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी घरकुल धारकांनी केली आहे.

वाळूमुळे अर्धवट घरकुल दिसत आहे.

“आपल्याला राज्य सरकारकडून दोन लाखांचे घरकुल मंजूर झालं असून त्याचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले आहे.मात्र एक महिन्यापासून त्यासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने काम ठप्प झाले आहे.तातडीने त्यासाठी वाळू उपलब्ध होणे गरजेचे आहे”-एकनाथ थोरात,घरकुल लाभार्थी,जवळके ग्रामपंचायत,तालुका कोपरगाव.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यात सन २०२४-२५ मध्ये तालुक्यात एकूण ०५ हजार घरकुले मंजूर झाली असून चालू वित्तीय वर्षात ०१ हजार २०७ घरकुले मंजूर झाली असून एकूण दोन वर्षात ०६  हजार २०७ घरकुले मंजूर झाली असल्याची माहिती दिली आहे.तथापि यातील ०२ हजार ६०३ घरकुल लाभार्थ्यांनी वाळू नेली असून त्यातील काहींनी पन्नास टक्के तर काहींनी पूर्ण वाळू नेली आहे.मात्र यातील  बहुतांशी कामे अर्धवट असून त्यांना वाळूची आवश्यकता आहे.परिणामी त्यांची कामे गेली दोन आठवड्यापासून बंद असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.याबाबत शिर्डी येथील प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी तातडीने लक्ष घालण्याची वेळ आली असल्याची मागणी या घरकुल धारकांनी केली आहे.याबाबत आता त्यांच्या आदेशाकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांचेशी संपर्क साधला असता वाळू वर्तमानात बंद असली तरी गोदावरी नदीतून जवळपास ०८ हजार ब्रास वाळू घरकुलासाठी राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती दिली असून त्याबाबत परवानगी घेण्यासाठी प्रांत कार्यालयात कागदपत्रे पाठवली असून त्यास लवकरच परवानगी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close