आंदोलन
…’त्या’ आंदोलनाला कोपरगाव तालुक्यातून पाठिंबा !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे माजी आ.बच्चू कडू हे ८ जून पासून गुरुकुंज मोझरी,तालुका तिवसा येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज माफीसह दिव्यांग विधवा महिलांच्या प्रश्नाबाबत तसेच सर्वसामान्य नागरिक महिला शेतमजूर युवक यांच्या हितासाठी मागील सात दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला बसलेले असून त्याला कोपरगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा दिला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष,शरदचंद्र पवार पक्ष वकील संघ कोपरगाव आदि पक्षाच्या समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती,बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता,अखेर सातव्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असल्याची माहिती आहे.त्यापूर्वी शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती.यावेळी बोलताना फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल,या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील,या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं.मात्र त्यानंतरही बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम होते ? समिती कधी स्थापन करणार हे जाहीर करावं,अशी त्यांची मागणी होती.त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली.उदय सामंत हे पत्र घेऊन आले होते.
दरम्यान या कर्जमाफीसंदर्भात येत्या पंधरा दिवसांच्या आता उच्चस्तरिय समिती नेमली जाईल,त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल.बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन आपण आलो आहे.आपण यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे.कर्जमाफीसाठी येत्या पंधरा दिवसांच्या आत उच्चस्तरिय समिती नेमली जाईल,असं यावेळी उदय सामंत यांनी शेवटी म्हटलं आहे.
दरम्यान यानंतर बच्चू कडू यांनी अखेर सातव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.मात्र उपोषण मागे घेतानाच त्यांनी आता कर्जमाफी संदर्भात सरकारला नवी डेडलाईन दिली आहे. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगावी अन्यथा मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
दरम्यान या उपोषणाला कोपरगाव तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला होता.त्या साठी त्यांनी तहसील कोपरगाव येथे उपोषण जाहीर केले होते.व गेली तीन दिवस ते सुरू होते.त्याला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता.त्या आंदोलनात तालुका अध्यक्ष संदीप बाबासाहेब क्षीरसागर,युवा प्रहार तालुका प्रमुख दत्तात्रय गंगाधर भोसले आदींचा समावेश होता.
प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष संजय शिंदे,सागर अहिरे,प्रहार तालुका कार्याध्यक्ष बद्रीनाथ शिंदे,तालुका उपाध्यक्ष विलास परजणे,कुनाल गवळी,प्रहार शेतकरी तालुका अध्यक्ष अस्लम सैय्यद,दिव्यांग हरीशचंद्र शिंदे,पढेगाव दिव्यांग शितल शिंदे,शरद खिलारी,प्रविन भुजाडे,अरुण वाघमारे,अफजल खान मौलाना आदि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त कोपरगाव तहसील येथे उपस्थित होते.
दरम्यान त्यांनी राज्यातील शेतकरी बेरोजगार वंचित विद्यार्थी व सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत हक्कासाठी त्यांच्या १४ प्रमुख मागण्यांमध्ये दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन देण्यात यावे,शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे,पेरणी व कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे हमीभाव देण्यात यावा तसेच फळ पिकांवर ३.५ रेपो लावून दुग्ध व्यवसायाला देखील एमएसपी ला जोडण्यात यावे.तेलंगणाच्या धर्तीवर एकरी १० हजार रुपयांची मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा,सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे,मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, मनरेगा मधील मजुरी ३१२ रुपयावरून ५०० रुपये करण्यात यावी,निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे,दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायीच्या दुधासाठी बेस रेट रुपये ५० रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रुपये ६० प्रति लिटर मिळावा,कांद्याचे दर स्थिर राहावे आदी मागण्या केल्या आहेत.
दरम्यान आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष,शरदचंद्र पवार पक्ष वकील संघ कोपरगाव आदि पक्षाच्या समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.