जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती आंदोलनास…या दोन पक्षांचा पाठिंबा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूकपूर्व संपूर्ण कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसला जावा,दुधास चाळीस रुपयांचा दर तर दुधाचे थकित अनुदान देण्यात यावे,शेतकऱ्यांच्या शेतीमालास एम.एस.पी.प्रमाणे दर द्यावे,आदी मागण्यासाठी शेतकरी संघटनेने पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना काल प्रदेश काँग्रेस कमिटीने तर आज सकाळी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसने आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.त्यामुळे या आंदोलनास मोठे बळ मिळाले असल्याचे मानले जात आहे.त्यानिर्णयाबाबत शेतकरी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

रघुनाथ दादा पाटील अध्यक्ष,शेतकरी संघटना.

 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर आधी प्रदेश काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष स.का.पाटील यांनी या शेतकरी संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ऍड.संदीप वर्पे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही चर्चा करून त्यांचा लेखी पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामुळे या आंदोलनास राज्य पातळीवर आणखी वजन वाढले आहे.

   भारतातील शेतकरी आत्महत्या म्हणजे १९७० च्या दशकापासून भारतात आत्महत्या करून मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या घटना,ज्यांचे मुख्यतः खाजगी जमीनदार आणि बँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थता असल्याने होतात.भारत हा एक कृषीप्रधान देश आहे जिथे ग्रामीण भागातील सुमारे ७०% लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे.२०२३ मध्ये या क्षेत्राचा भारताच्या अर्थव्यवस्थेत १५% वाटा होता,आणि NSSO नुसार २०२२ मध्ये देशातील सुमारे ४५.५% कामगार दल शेतीशी संबंधित होते. कार्यकर्ते आणि विद्वानांनी शेतकरी आत्महत्यांसाठी अनेक परस्परविरोधी कारणे दिली आहेत,त्यात शेतकरी विरोधी कायदे,कर्जाचा मोठा बोजा,सरकारी धोरणांचा अभाव, अनुदानातील भ्रष्टाचार,पीक अपयश,मानसिक आरोग्य,वैयक्तिक समस्या आणि कौटुंबिक समस्या आदींचा समावेश होता.

ऍड.अजित काळे,उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.


   राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीनुसार १९९५ ते २०१४ दरम्यान २९६,४३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तर २०१४ ते २०२२ दरम्यानच्या नऊ वर्षांत ही संख्या १००,४७४ होती.२०२२ मध्ये भारतात शेती क्षेत्रातील एकूण ११,२९० व्यक्तींनी (५,२०७ शेतकरी आणि ६,०८३ शेतमजूर) आत्महत्या केल्या आहेत,जे देशातील एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी ६.६% आहे.

  

शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत राज्ये फेरफार करत असल्याचा आरोप आहे,त्यामुळे खरी आकडेवारी आणखी जास्त असू शकते.अशीच एक घटना ताजी असून येथील शेतकरी हा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील असून त्याने राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी हा पुरस्कार पटकवला होता त्या कैलास नागरे यांनी आत्महत्या केली ती मनाला चटका लावणारी आहे.

  यापूर्वी,सरकारने वेगवेगळ्या आकडेवारीचा अहवाल दिला होता २०१४ मध्ये ५,६५० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या ते २००४ मध्ये १८,२४१ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या.२००५ ते २००५ या १० वर्षांच्या कालावधीत भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा दर १,००,००० लोकसंख्येमागे १.४ ते १.८ दरम्यान होता.तथापि,२०१७ आणि २०१८ मधील आकडेवारीनुसार दररोज सरासरी १० पेक्षा जास्त आत्महत्या किंवा दरवर्षी ५७६० आत्महत्या झाल्याचे दिसून आले.शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत राज्ये फेरफार करत असल्याचा आरोप आहे,त्यामुळे खरी आकडेवारी आणखी जास्त असू शकते.अशीच एक घटना ताजी असून येथील शेतकरी हा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील असून त्याने राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी हा पुरस्कार पटकवला होता.त्याचे नाव कैलास अर्जुन नागरे असून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १३ मार्चच्या सकाळी समोर आली आहे.आपल्या शेतात विषारी औषध घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

   या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूकपूर्व संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली होती.त्याप्रमाणे सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसला जावा,दुधास ४० रुपयांचा दर तर दुधाचे थकित अनुदान देण्यात यावे,शेतकऱ्यांच्या शेतीमालास एम.एस.पी.प्रमाणे दर द्यावे,सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाणी नगर-नाशिकसह मराठवाड्यात देण्यास यावे आदी मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली आगामी बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयास घेराव घालणार असून त्याची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे.त्यासाठी उद्या शेतकरी थेट पुण्याकडे कूच करणार आहे.

    या पार्श्वभूमीवर आधी प्रदेश काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष स.का.पाटील यांनी या शेतकरी संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ऍड.संदीप वर्पे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही चर्चा करून त्यांचा लेखी पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामुळे या आंदोलनास राज्य पातळीवर आणखी वजन वाढले आहे.त्यासाठी शेतकरी उद्या पहाटे राज्यातून पुण्याकडे कूच करणार असल्याची माहिती राज्याचे प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी दिली आहे.या पाठिंब्याबाबत शेतकरी संघटनेनं स्वागत केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close