जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

पाणी तर नाहीच उलट शेतकऱ्यांवर गुन्हे,उलट्या काळजाचे सरकार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
  
   निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुसऱ्या आवर्तनाचे पाणी सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना नदी मार्गाने मिळावे या मागणीसाठी मुंबईनागपूर समृद्धी महामार्गावर नुकतेच.’रास्ता रोको’ आंदोलन करणाऱ्या सुमारे १०० आंदोलक शेतकऱ्यांविरोधात विविध कलमाद्वारे सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे सरकारची दुहेरी नीती उघड झाली असल्याचे बोलले जात आहे.

   

दरम्यान या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नगरसेवक भागवत आरोटे,डॉ.विजय शिंदे,पंडित चासकर,सायाळे सरपंच विकास शेंडगे,चिंटू लांडगे,शिवाजी चासकर,सुभाष चासकर,सोमा लांडगे,बाळासाहेब मोटे,प्रकाश जाधव,शिवाजी शिंदे,वामन शिंदे , दिलीप चासकर,संतोष शिंदे,संजय कोरडे,सुभाष शिंदे,अशोक मोटे,नवनाथ शेंडगे,संजय जाधव,हरीश गोसावी,सोनू चासकर सर्व रा.सायाळे ता.सिन्नर,अण्णा गेठे,शिवाजी हलवर,नारायण गेठे,विठ्ठल गेठे सर्व रा.मलढोण,भगीरथ वाणी,सुनील चिने रा.वारेगाव,कैलास रहाणे,गंगाधर रहाणे,बहादरपूर सरपंच गोपीनाथ रहाणे रा.बहादरपूर ता.कोपरगाव,ज्ञानेश्वर मुंगसे,राजेंद्र कहांडळ रा.देवकवठे ता.संगमनेर यांचे सह ९० ते १०० ग्रामस्थ यांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीचे पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत काले यांनीं उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.डाव्या कालव्यांची दुसरी चाचणी गत दोन महिन्यापासून सुरु आहे.त्यातच वर्तमानात मोठा दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकांना व पिण्यास पाणी शिल्लक नाही.चारा पिकांना पाणी उपलब्ध नाही.त्यामुळे आत्ताच माय लेकराला धरेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.दुसऱ्या आवर्तनात किमान बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,शहापूर,सायाळे पाझर तलावाच्या खालील भाग आदीसह पुंच्छ भागातील वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी आदी तलावात निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडलेले नाही.

दुष्काळी शेतकऱ्यांनी पाणी मागूनही ते दिले नाही उलट आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणे हि बाब निश्चितच निंदनीय आहे.त्याचा निळवंडे कालवा कृती समिती जाहीर निषेध व्यक्त करत आहे.व सदर गुन्हे जिल्हाधिकारी नाशिक यांनी तत्काळ मागे घेण्याची मागणी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष सोन्याबापू उऱ्हे,सचिव कैलास गव्हाणे,अशोक गांडोळे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,संघटक नानासाहेब गाढवे,रमेश दिघे,कौसर सय्यद,तानाजी शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,आप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,दौलत दिघे,बाबासाहेब गव्हाणे,सोमनाथ दरंदले,सचिन मोमले,भाऊसाहेब गव्हाणे आदींनी केली आहे.

बहादरपूर येथील शेतकऱ्यांनी सुमारे १३ लाख रुपये खर्चून चारी खोदली असून त्यात अद्याप एक पाण्याचा थेंब गेलेला नाही.या शिवाय अद्याप या लढ्यात निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून योगदान देणारी गावे व कार्यकर्ते,शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घेऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे डावा कालवा संपूर्ण लाभक्षेत्रातील किमान पाझर तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून पिण्याच्या पाण्यासाठी व चारा पिकांना वंचित गावांना तातडीने पाणी उपलब्ध करणे व सर्व बंधारे भरे पर्यंत आवर्तन बंद करू नये या परिसरातील सायाळे,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,पुंच्छ भागातील वाकडी,धनगरवाडी आदी पाझर तलावात व के.टी.वेअर मध्ये निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी शिर्डी,तहसीलदार,गटविकास अधिकारी आदींकडे केली होती.त्यास ऊर्ध्व प्रवरा कालवा प्रकल्प-०२ या जलसंपदा विभागाने लेखी होकार दिला होता.मात्र त्यास कृतीची जोड दिली नव्हती.त्यामुळे धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांत संताप होता.त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष आहे.त्याची खदखद नुकतीच समृद्धी महामार्गावर सायाळे हद्दीत नुकतीच,’रास्ता रोको आंदोलना’च्या माध्यमातून बाहेर पडली होती.मात्र त्याचे प्रत्यंतर उलट घडले असून या प्रकरणी जलसंपदा अधिकाऱ्यांनी व वावी पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण समजूतदारपणे घेणे गरजेचे असतांना उलट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आततायीपणा केला आहे.त्यामुळे आता निळवंडेचे श्रेय घेणारे उंदीर कोणत्या बिळात दडले आहे असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.

   

निळवंडेच्या दुष्काळी भागातील सायाळे,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,पुंच्छ भागातील वाकडी,धनगरवाडी आदी पाझर तलावात व के.टी.वेअर मध्ये निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी शिर्डी,तहसीलदार,गटविकास अधिकारी आदींकडे केली होती.त्यास ऊर्ध्व प्रवरा कालवा प्रकल्प-०२ या जलसंपदा विभागाने लेखी होकार दिला होता.मात्र त्यास कृतीची जोड दिली नव्हती.

यात ऊर्ध्व प्रवरा कालवा प्रकल्पाचे जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता (पालखेड कालवा उपविभाग,तळेगाव दिघे) यांचे फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम ३४१,१४३,१४५,१४७,१४९,५०४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिन्नर येथील पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पारस वाघमोडे या प्रकरणी पुढील  तपास करीत आहेत.हि बाब निश्चितच निंदनीय व वेदनादायी आहे.त्याचा निळवंडे कालवा कृती समिती जाहीर निषेध व्यक्त करत आहे.व सदर गुन्हे जिल्हाधिकारी नाशिक यांनी तत्काळ मागे घेण्याची मागणी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष सोन्याबापू उऱ्हे,सचिव कैलास गव्हाणे,अशोक गांडोळे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,संघटक नानासाहेब गाढवे,रमेश दिघे,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,दौलत दिघे,बाबासाहेब गव्हाणे,सोमनाथ दरंदले,सचिन मोमले,भाऊसाहेब गव्हाणे आदींनी केली आहे.

     …या कार्यकर्त्यांविरोधात दाखल झाला गुन्हा !

   नाशिक महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक भागवत आरोटे,डॉ.विजय शिंदे,पंडित चासकर,सायाळे सरपंच विकास शेंडगे,चिंटू लांडगे,शिवाजी चासकर,सुभाष चासकर,सोमा लांडगे,बाळासाहेब मोटे,प्रकाश जाधव,शिवाजी शिंदे,वामन शिंदे , दिलीप चासकर,संतोष शिंदे,संजय कोरडे,सुभाष शिंदे,अशोक मोटे,नवनाथ शेंडगे,संजय जाधव,हरीश गोसावी,सोनू चासकर सर्व रा.सायाळे ता.सिन्नर,अण्णा गेठे,शिवाजी हलवर,नारायण गेठे,विठ्ठल गेठे सर्व रा.मलढोण,भगीरथ वाणी,सुनील चिने रा.वारेगाव,कैलास रहाणे,गंगाधर रहाणे,बहादरपूर सरपंच गोपीनाथ रहाणे रा.बहादरपूर ता.कोपरगाव,ज्ञानेश्वर मुंगसे,राजेंद्र कहांडळ रा.देवकवठे ता.संगमनेर यांचे सह ९० ते १०० ग्रामस्थ यांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे

आरोप काय …
   सदर प्रसंगी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ तसेच घोषणाबाजी केली.समृद्धी महामार्गावर बेकायदेशीर प्रवेश करत शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील वेठीस धरले असे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close