जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,गाय-वासरू दगावले !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
   

   कोपरगाव शहरातील सुभद्रानगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास विजेच्या खांबास वीज प्रवाह उतरल्याने त्यात एक गावरान गाय आणि तिचे वासरू जागीच ठार झाले असून याबाबत महावितरण कंपनीने घटनास्थळी पंचनामा केला असल्याची माहिती आहे.मात्र महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारासह मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

छायाचित्रात मयत गाय आणि तिचे वासरू दिसत आहे.

कोपरगाव शहरात महावितरण कंपनीचा बेजबाबदार कामाचा एक नमुना उघड झाला असून यात निवारा परिसरात असलेल्या सुभद्रानगर गणपती मंदिराजवळ असलेल्या पश्चिम कॉर्नर जवळ असलेल्या विद्युतवाहक पोलला रात्री दोन वाजेच्या वीज प्रवाह उतरला असल्याने त्याचा तीव्र धक्का बसल्याने त्यात एक गावरान गाय आणि तिचे वासरू असे दोघांचे प्राण गेले आहे.

   कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे शहरात अनेक अपघात घडत आहे.अनेकांना आपले हात पाय गमवावे लागत आहे.तर काहींची मोठी आर्थिक हानी होत आहे.मात्र दुर्दैवाने नगरपरिषदेचे या बाबीकडे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे या घटनांत वाढ होताना दिसत आहे.ते कमी की काय वर्तमानात अवकाळी पावसाने ठाण मांडले असून कोपरगाव शहरात दिनांक ०६ मे पासून पावसाने दोन वेळी चांगलेच झोडपून काढले आहे.अद्यापही पावसाचे वातावरण आहे.

कोपरगाव शहरात मोकाट जनावरे दिसत आहे.(संकल्पित छायाचित्र)

दरम्यान कोपरगाव महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराचा कोपरगाव मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीचे कार्यालयासमोर जावून आरती करून प्रतीकात्मक आंदोलन केले असल्याचे समजले आहे.



   दरम्यान यात महावितरण कंपनीच्या भोंगळ आणि ढिसाळ कारभाराचे नमुने उघड होत असून बरेच वेळा पाऊस लांब असतानाच वीज गायब होताना दिसत आहे.वादळी पाऊस आला तर विचारायला नको.तासनतास वीज गायब असते.परिणामी अनेक नागरिकांना मोठा उकाडा सहन करावा लागत आहे.व्यापारी आणि छोटया उद्योगांना त्याचा फटका बसत आहे.असाच महावितरण कंपनीचा बेजबाबदार कामाचा एक नमुना उघड झाला असून यात निवारा परिसरात असलेल्या सुभद्रानगर गणपती मंदिराजवळ असलेल्या पश्चिम कॉर्नर जवळ असलेल्या विद्युतवाहक पोलला रात्री दोन वाजेच्या वीज प्रवाह उतरला असल्याने त्याचा तीव्र धक्का बसल्याने त्यात एक गावरान गाय आणि तिचे वासरू असे दोघांचे प्राण गेले आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   या प्रकरणी महावितरण कंपनीने स्थळपंचनामा करून सदर गायीची विल्हेवाट नगरपरिषदेने लावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सदर गाय आणि वासरू हे कोपरगाव बाजार समिती नजिक असलेल्या राहुल थोरात यांची असल्याचे नागरिकांकडून समजत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close