अपघात
तरुणाचा मृत्यू,घात की अपघात चर्चा

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नगर-दौंड मार्गावर असलेल्या खिर्डी गणेश शिवारात रेल्वे रुळाच्या बाजूला एका अंदाजे वय वर्षे ३० असलेल्या तरुणाचा मृतदेह कोपरगाव तालुका पोलिसांना सापडला असून सदर तरुण नगर वरून बसला असल्याचे दिसून येत असून तो उत्तर प्रदेशातील झांशी येथे चालला असल्याचे त्याचे तिकिटावरून समजत असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे त्याचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे अशी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांत याची खबर शहर पोलिसांना कळवली होती.त्यानुसार त्या ठिकाणी शहर पोलिसांनी धाव घेतली होती.प्रकरणी उलट सुलट चर्चा सुरू आहे.
कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड मा रेल्वे मार्ग जात असून आता तो दुहेरी झाला आहे.त्याचे विद्युतीकरण झाले आहे.त्यामुळे या मार्गावरून रेल्वे गाड्यांची अवाक जावक वाढली आहे.त्याच प्रमाणात अपघात वाढले असल्याचे दिसत आहे.अशीच घटना दिनाक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजेपूर्वी कोपरगाव तालुक्यातील खीर्डी-गणेश शिवारात उघड झाली आहे.
या प्रकरणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांत याची खबर शहर पोलिसांना कळवली होती.त्यानुसार त्या ठिकाणी शहर पोलिसांनी धाव घेतली होती.सदर युवकास ताब्यात घेतले असता व त्यास उपचारर्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन भेट दिली आहे व स्थळ पंचनामा केला आहे.याबाबत नागरिक उलट सुलट चर्चा करत आहेत.
सदर तरुणाच्या अंगावर काळा शर्ट असून त्यास खुरटी दाढी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान या प्रकरणी खबर देणार वैद्यकीय अधिकारी डॉ.उंबरकर यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी भारतीय नागरी सुरक्षा संहिता सन २०२३ चे गुन्हा क्रं.१२/२०२४चे कलम १९४ नुसार नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस ना.ए.एस.वलवे या करत आहेत.