जाहिरात-9423439946
सहकार

डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बचावासाठी…या संघटनेचा पुढाकार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

राहुरी-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्ह्यातील ऐके काळी आर्थिक दृष्ट्या भरभराटीला असलेला राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेला डॉ.बाबुराव दादा तनपुरे हा सहकारी साखर कारखाना आज शेवटच्या घटका मोजत आहे तो शेतकरी हितासाठी वाचविणे गरजेचे आहे.त्यामुळे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२२ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केले आहे.

डॉ.तनपुरे कामगारांच्या व सभासद शेतकऱ्याच्या हितरक्षणार्थ औरंगाबाद खंडपीठाचे नामवंत विधीज्ञ अजित काळे यांनी भक्कमपणे बाजू मांडली आहे.या न्यायालयीन लढ्यासाठी अमृतराव धुमाळ व अरुण पा.कडू यांनीही कामधेनू वाचविण्यासाठी मोठा लढा दिला आहे.शनिवार दि.२२ ऑक्टोबर रोजी डॉ.बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ,अरुण कडू,पंढरीनाथ पवार,राजाभाऊ शेटे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचे वतीने जाहीर मेळावा आयोजित केला आहे”-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना.

त्यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”सदर कारखान्यावर अनेक वेळा सत्तांतारे झाली.सभासदांनीही आलटून पालटून वेळोवेळी भूलथापा मारणाऱ्या नेत्यावर विश्वास टाकला.परंतु विश्वास टाकलेल्या व्यवस्थापन मंडळाने कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्याचा विश्वासघात केला आहे.मुळा धरण कार्यक्षेत्रात एकट्या राहुरी तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रात २० लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे.सदर मुबलक ऊसाची उपलब्धता ही विस कि.मी.च्या परिघाच्या आत आहे.आज रोजी कारखान्यावर अशोक,प्रवरा,अगस्ती,कुकडी आदी सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीने कर्ज असून.कारखान्याकडे जिल्ह्यात क्रमांक १ चा आसवनी प्रकल्प असून सुद्धा गेल्या विस वर्षापासून वेळोवेळी बदललेल्या संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्याचा विश्वासघात केल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे.मागील गाळप हंगामात विना परवाना गाळप केल्यामुळे साखर आयुक्त यांनी कारखान्यास १८ कोटी रु.दंड ठोठवला आहे.परंतु सदर दंड रक्कम विद्यमान संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे सोसावी लागत आहे.याबाबत न्यायालयात कृती समिती दाद मागणार आहे.दिवसेंदिवस तोटा वाढ झाल्यामुळे त्यामध्ये कारखाना कामगारांचे,तोडणी कामगारांचे,वाहतूकदाराचे व ऊस उत्पादकाचे पैसे थकविले.सदर देणी देणी देण्याचा बहाण्याने विद्यमान संचालक मंडळाने कारखाना मालकीच्या जमिनी विक्रीची वेळ आणली आहे,परंतु सदर थकीत देणे देणेसाठी किमती जमिनी कमीभावात आपल्या जवळच्या लोकांना विकण्याचा इरादा विद्यमान संचालक मंडळाचा दिसून येत आहे.संबंधित जमिनीवर ऐकेकाळी कारखान्याचे बेणे प्लॉट होते परंतु तेथील मुरुम विकून खाणी तयार झाल्या आहे.याबाबद उच्च न्यायालयात याचिकाकर्ते अमृत धुमाळ यांनी आक्षेप घेतला आहे.
सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून उच्च न्यायालय औरंगाबाद येथे कामगारांच्या व सभासद शेतकऱ्याच्या हितरक्षणार्थ शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे नामवंत विधीज्ञ अजित काळे यांनी भक्कमपणे बाजू मांडली आहे.या न्यायालयीन लढ्यासाठी अमृतराव धुमाळ व अरुण पा.कडू यांनीही कामधेनू वाचविण्यासाठी मोठा लढा दिला आहे.तरी शनिवार दि.२२ ऑक्टोबर रोजी डॉ.बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ,अरुण कडू,पंढरीनाथ पवार,राजाभाऊ शेटे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचे वतीने जाहीर मेळावा आयोजित केला आहे.

सदर मेळाव्यास शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे कायदेशीर मार्गदर्शन करणार आहे.राहुरी तालुक्याची कामधेनू व जिल्ह्याचे वैभव टिकण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थहीत राहण्याचे आव्हाहन जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना अनिल औताडे व राहुरी तालुकाध्यक्ष नारायण टेकाळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close