जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

राखे खालील निखारा-स्व.बबनराव काळे

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)

   “जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे.प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला.पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात.एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो.ज्या दिवशी हे लक्षात आले,त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार
झालेली ही बचत लुटून न्यायला सुरुवात झाली.आज पर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची आहे असे ज्यांनी लिहून ठेवले आहे ते शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व.शरद जोशी हे होते आणि त्यात आजही बारा वर्षानंतर ही तसूभरही फरक पडलेला दिसत नाही.शरद जोशी आणि त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ हा एक अभूतपूर्व झंझावात होता.१९८० सालच्या ऊस आंदोलनात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३० हजार शेतकरी एका वेळी तुरुंगात होते,तर १९८६ सालच्या कापूस आंदोलनात विदर्भ व मराठवाड्यात मिळून ९० हजार शेतकरी एका वेळी तुरुंगात होते.लोकांचा इतका प्रचंड सहभाग लाभलेली चळवळ स्वातंत्र्योत्तर भारतात दुसरी कुठलीच झालेली नाही.आज ही चळवळ अनेक तुकड्यात विभागली गेली असे दिसत असले तरी त्यांच्या निधनाचे आधी एक महिना त्यांची दै.लोकसत्ता या वृत्तपत्रात त्यांची एक पानभर मुलाखत प्रसिद्ध झाली होती त्याचे कात्रण आजही माझ्या दप्तरी आहे.त्यांच्या मुलाखतीचे शेवटच्या टप्प्यात मुलाखतकाराने त्यांना प्रश्न विचारला होता की,’ तुमचा वैचारिक वारसा चालवणारा दुसऱ्या फळीतील नेता कोण आहे ? त्यावेळी शरद जोशी यांनी चटदिशी उत्तर दिले होते,’ रघुनाथ दादा पाटील’.आज त्यांच्या सारखा त्यागी नेता दुसरा नाही हे जसे खरे आहे तसे त्यांना तोलामोलाची साथ देणारे सहकारी लाभले होते त्यातील अग्रणी नेत्याचे नाव होते स्व.बबनराव मुक्ताजी काळे.

  

स्व.बबनराव काळे यांचा स्वाभिमान इतका की स्वतःची मारुती-ओमणी ही गाडी शेवटपर्यंत त्यांनी बदलली नाही.मुलगा ऍड.अजित काळे हे उच्च न्यायालयात मोठे वकिल म्हणून प्रसिद्ध असताना व मोठी गाडी घेऊन देत असताना या स्वाभिमानी माणसाने ती नाकारली इतकेच नाही तर त्या गाडीत शेतकरी हितासाठी प्रवास करताना इंधनही स्वतःच्या कष्टार्जित पेन्शन मधूनच टाकले होते.

  आजही त्यांच्या पश्चात त्यागी भावनेनं काम करणारा अन्य नेता नाही हे खरेच पण शेतकऱ्यांच्या दुःखाचा पारावर न राहिल्याने आपल्या नोकरीचा तात्काळ राजीनामा देऊ केला होता.शेतकरी चळवळीत स्वतःला झोकून देणारे नेते म्हणून आपण त्यांचे एक आंदोलन सन-२०१२ साली संजीवनी सहकारी कारखान्यावर ऐन उन्हाळ्यात अनुभवले होते.हाताला बँडेज बांधलेले होते आणि त्याही स्थितीत त्यांच्या उत्साहात कोणतीही उणीव दिसत नव्हती.एक पत्रकार म्हणून आपण गावकरी या वृत्तपत्रासाठी ते वार्तांकन केले होते.त्यावेळी चौकशी करता आपल्याला त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती मिळाली होती की आदल्या दिवशी राहुरी तालुक्यात आंदोलन केल्याने त्यांच्यावर पोलिसाकडून लाठी हल्ला झाला होता त्यात ते जखमी झाले होते.तरीही दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहात त्यांनी उशिरा का होईना हजेरी लावून आपले शेतकऱ्यांपर्यंत दायित्व सिद्ध केले होते.आज ते आठविण्याचे कारण इतकेच आज त्यांना जावून १० वर्षे लोटली आहेत.त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित शिर्डीत रघुनाथ दादा पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे अधिवेशन व एक जंगली महाराज आश्रमात एक साप्ताहिक कार्यशाळा भरवली होती.त्यांच्या कार्याप्रित्यर्थ एक पुस्तिका प्रकाशित केली होती.त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेड चे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखीले,शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले आदींनी स्व.बबनराव काळे यांच्या कार्याची दखल घेऊन मोठे योगदान दिले होते ते उगीच नाही.

  

श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावांच्या शेतकऱ्यांचा ०७ हजार हेक्टर क्षेत्राचा प्रश्न सलग चार वर्षे उच्च न्यायालयात लढा देऊन मार्गी लावला आहे तो क्षण साजरा करताना स्व.बबनराव काळे यांचे सुपुत्र ऍड.अजित काळे.

शेतकरी संघटनेच्या निमित्त वेगवेगळ्या भागात जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी त्यांचा चाहता वर्ग आणि त्यांना मानणारा कार्यकर्ता न भेटला तर नवल.ऐन उमेदीच्या काळात स्व.बबनराव काळे यांनी आपल्या नोकरीवर लाथ मारून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि शरद जोशी यांच्या सारखा शेतकरी सेवेचा वसा घेतला होता.स्वाभिमान इतका की स्वतःची मारुती-ओमणी ही गाडी शेवटपर्यंत त्यांनी बदलली नाही.मुलगा ऍड.अजित काळे हे उच्च न्यायालयात मोठे वकिल म्हणून प्रसिद्ध असताना व मोठी गाडी घेऊन देत असताना या स्वाभिमानी माणसाने ती नाकारली इतकेच नाही तर त्या गाडीत शेतकरी हितासाठी प्रवास करताना इंधनही स्वतःच्या कष्टार्जित पेन्शन मधूनच टाकले होते.


स्व.बबनराव काळे नेहमी म्हणत असतं की,”कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं.पूर्वी भाव पटला नाही तर शेतकरी माल द्यायचा नाही.तो त्याच्या घरी पडून राहत असे.आता असं झालंय की,तो माल विकायला बाजार समितीत न्यायचा आणि तिथे गेल्यावर जो मिळेल तो भाव.तो भाव घेऊनच माल काढून टाकला पाहिजे.नाहीतर माल परत आणणं त्याला परवडणारं नसतं.त्यामुळे तो तिथे पकडल्यासारखा होतो.उंदीर सापळ्यात सापडल्यानंतर जी अवस्था होते ती शेतकऱ्याची बाजार समितीत माल घेऊन आल्यानंतर होते.या समित्या म्हणजे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत.आज दहा वर्षांनी शेतकऱ्याची अवस्था वेगळी नाही हे विशेष !

स्व.बबनराव काळे यांचा खरा वारसा आज त्यांचे पुत्र ऍड.अजित काळे हे चालवत असून उत्तरेतील राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक ५४ वर्षे प्रलंबित ठेवलेला उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प हा न्यायिक लढा त्यांनी निळवंडे कालवा कृती समितीचे कोणतेही मानधन न घेता आजही लढत आहेत.

   ‘शेतकरी संघटना आज पूर्वीइतकी सक्रिय दिसत नसली तरी ती संपली,असे कुणीही समजू नका.वर जी राख दिसते त्याखाली धगधगते निखारे आहेत आणि या निखाऱ्यांमधून पुन्हा ज्वाला उफाळतील’, असा विश्वास शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी व्यक्त केला होता.मारवाडी फाउंडेशनचा (स्व.) प्रबोधनकर ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार गुरुवारी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते जोशी यांना प्रदान करण्यात आला होता त्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले होते ते उगीच नाही याच फळीतील कार्यकर्त्यांवर त्यांचा मोठा विश्वास होता हेच या त्यांच्या वाक्यातून दिसून आल्याशिवाय राहत नाही.असा निखारा म्हणूनच स्व.बबनराव काळे यांची गणना आगामी काळातही होत राहील यात मला तरी शंका वाटत नाही.कारण त्यांनी आणखी एक निखारा आपल्या पोटी जन्माला घालून पुढील पिढीला आणि समाजाला देऊन ठेवला आहे तो म्हणजे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे होय.त्यांचा खरा वारसा आज त्यांचे पुत्र चालवत असून त्यांनी गत ५४ वर्षे प्रलंबित ठेवलेला उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प होय.त्यांनी निळवंडे कालवा कृती समितीचा न्यायिक लढा कोणतेही मानधन न घेता आजही लढत आहेत.याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना युती सरकारने सन-२०१९ साली गुंडाळून ठेवली होती.त्याबाबत जनहित याचिका दाखल करून राज्यातील शेतकऱ्यांना काही हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.

   या शिवाय त्यांनी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव,मुठे वाडगाव,माळ वाडगाव,खानापूर,ब्राम्हणगाव वेताळ,शिरसगाव,उंदीरगाव,निमगाव,खैरी आदी ०९ गावांची जमीन गॅझेट क्रं.७८८४ दि.०१ ऑगष्ट १९१८ अन्वये जमीन सुधारणा करून शेतकऱ्यांना पुन्हा परत करण्याच्या उद्देशाने विना मोबदला भूसंपादन केली होती व ती पुढे भंडारदरा धरण झाल्यावर बेलापूर सिंडिकेट कंपनीस सन-१९२० च्या करारानुसार सुपूर्त केली होती.मात्र सदर कंपनी अवसायनात गेल्याने ती ०७ हजार एकर जमीन बेलापूर कंपनीस वर्ग केली होती.ती पुढे सरकारने सदर शेतकऱ्यांना परत केलीच नाही.त्या साठी आजतागायत शेतकऱ्यांचा लढा सुरु होता.नऊ आकरी पडीत शेतकऱ्यांचा ०७ हजार हेक्टर क्षेत्राचा प्रश्न सलग चार वर्षे उच्च न्यायालयात लढा देऊन मार्गी लावला आहे.

   ऍड.अजित काळे यांनी या शिवाय सन- २०१८ साली भाजप ने घोषणा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमाफी योजना सरकारने आपले पोर्टल बंद करून गुंडाळून ठेवली होती.त्या बाबत उच्च न्यायालयाच्या छ्त्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून राज्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळवून देऊन न्याय दिला आहे. याशिवाय त्यांनी तीन वर्षापूर्वी अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून सुमारे साडेचार हजार मते मिळवून सत्ताधाऱ्यांना,’दे माय धरणी ठाव’ अशी अवस्था करून ठेवली होती.

  त्या शिवाय पश्चिम घाट माथ्याचे पाणी पूर्वेस वळविण्याचा चंग बांधला असून त्यासाठी पत्रकार नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल केली आहे.या खेरीज त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला आहे.त्यामुळे शरद जोशी यांनी विदित केल्याप्रमाणे आजही राखे खालील निखारे खऱ्या अर्थाने धगधगत असल्याचे दिसून येत आहे.उद्योग आणि शेती यांच्या दरातील फरक हा जाणीवपूर्वक ठेवला जाईल,अशीच राज्य संस्थेची भू्मिका आहे आणि हे राज्य संस्थेचे धोरण चालू ठेवणे नेहरूंच्या काळापासून सुरू होते.म्हणून शेतमालाला उत्पन्नाच्या खर्चावर आधारित किंमत मिळावी,असा साधा आणि सोपा एक कलमी कार्यक्रम समोर मांडण्यामध्ये शरद जोशी यांचे फार मोठे द्रष्टेपण होते.ते आजही त्यांचे खरे वैचारिक वारसदार असलेले स्व.बबनराव काळे व त्यांचे सुपुत्र ऍड.अजित काळे हे खऱ्या अर्थाने चालवीत आहेत.त्यांचे बरोबर दहा वर्षापूर्वी आपल्या गाडीचे जात असताना एक अपघात झाला होता आणि त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यातच बरोबर दहा वर्षापूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले होते.शेतकरी संघटनेचे स्व.बबनराव काळे यांना त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरणा निमित्त प्रदेश शेतकरी संघटना,निळवंडे कालवा कृती समिती यांचे वतीने निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली….

नानासाहेब जवरे,प्रदेश प्रसिध्दी प्रमुख,शेतकरी संघटना,महाराष्ट्र राज्य.मो.9423 43 9946.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close