जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ आरोपीस अंतरिम जामीन मंजूर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    देशभर देशाचे घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना कोपरगाव शहरात दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री ११.४० वाजेच्या सुमारास दोन गटात चॉपरणे एकमेकावर वार झाले होते यात शुभम साहेबराव शिंदे,(वय-२९) व योगेश संजय शिंदे दोघे रा.सुभाषनगर व विजय भास्कर पाटोळे हे तीन जण जखमी झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल झाला होता.त्यातील एक आरोपी जितेंद्र रणशूर यांनी आज कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे  न्या.अलमले यांचे समोर अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केले असता हजर केले असता न्यायलयाने जितेंद्र रणशुर यांना अंतरिम जामीन मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

सहा दिवसापूर्वी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र रणशूर यांचेसह सर्व आरोपी पोलिसांनी फरार दाखवले होते.मात्र त्यांतील रणशूर यांचे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू होते.त्याचे बाबत जिल्हा न्यायालयाने कोपरगाव शहर पोलिसांना आरोपी रणशूर यास अटक करण्याची गरज आहे किंवा कसे याबाबत नोटीस बजावली आहे.नोटीसचे उत्तर येत नाही तो पर्यंत आरोपी रणशूर यांना शहर पोलिसांनी अटक करू नये असे आदेश कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्री अलमले यांनी दिले आहे.

   कोपरगाव येथे दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना रात्री ११.४० वाजेच्या सुमारास मिरवणूक सुरू असताना फिर्यादी शुभम साहेबराव शिंदे याचा चुलतभाऊ योगेश शिंदे यांस रोहित बाबुराव डोखे,सुमित बाबुराव डोखें,अनिल सुधाकर रन्नवरे,गणेश सुधाकर रन्नवरे संजय साठे सर्व रां.सुभाषनगर यांनी शिवीगाळ केली असून त्यात आरोपींनी सुभाषनगर येथे थेट चॉपरचा वापर केला होता.यात शुभम साहेबराव शिंदे,(वय-२९) व योगेश संजय शिंदे दोघे रा.सुभाषनगर व विजय भास्कर पाटोळे हे तीन जण जखमी झाले होते.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-८३ व ८४/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १०९(१),११५(५),३५२,१८९,(२),१९१(२),१९१(३),१९०,६१(२) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.मात्र आरोपी फरार होते.त्यांचा शोध पोलिस घेत असताना दोन्ही गटांकडून आपण त्यात नव्हेच अशी भूमिका घेऊन पोलिस अधिकाऱ्याना निवेदन दिले होते.त्यामुळे हा प्रश्न कोणामुळे निर्माण झाला असा सवाल निर्माण झाला आहे.त्यातच यातील आर.पी.आय.चे माजी अध्यक्ष जितेंद्र रणशुर यांचेवर त्यांनी या गुन्ह्यात प्रोत्साहन दिले असा विरोधी गटाकडून आरोप करून त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता.तर त्यांचेसह सर्व आरोपी पोलिसांनी फरार दाखवले होते.मात्र त्यांतील जितेंद्र रणशूर यांचे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू होते.त्याचे बाबत जिल्हा न्यायालयाने कोपरगाव शहर पोलिसांना आरोपी रणशूर यास अटक करण्याची गरज आहे किंवा कसे याबाबत नोटीस बजावली आहे.नोटीसचे उत्तर येत नाही तो पर्यंत आरोपी रणशूर यांना शहर पोलिसांनी अटक करू नये असे आदेश कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्री अलमले यांनी दिले आहे.दरम्यान अद्याप तेरा आरोपी अद्याप फरार आस्ल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत पोलिस अधिकारी भगवान मथुरे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता तो होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close