निवड
…यांची ‘ग्रीड इंडिया’ कंपनीच्या संचालक पदी निवड

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव येथील ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व भारत संचार निगमचे संचालक ऍड.रवींद्र बोरावके यांची केंद्र सरकारच्या देश पातळीवर कार्यरत असलेल्या व सर्व राज्यांना वीज पुरविण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या,’ग्रीड इंडिया’ या कंपनीच्या संचालक पदी नियुक्ती केली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान या आधी ऍड.रवींद्र बोरावके यांनी बी.एस.एन.एल.या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.आता त्याची भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दखल घेऊन पुन्हा एकदा देशपातळीवर काम करण्याची संधी दिली असल्याचे मानले जात आहे.त्यांच्या निवडीचे सर्वात्र अभिनंदन होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”ग्रीड इंडिया’ ही पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची एक शाखा आहे,जी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मालकीखाली आहे.ही कंपनी मुख्यतः वीज प्रेषण आणि वितरण प्रणालींशी संबंधित आहे,जी वीज निर्मिती केंद्रांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचवते.पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना २३ ऑक्टोबर १९८९ रोजी कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत ५,००० कोटी रुपयांच्या अधिकृत भागभांडवलासह (नंतर २००७-०८ च्या आर्थिक वर्षात १०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवली गेली) एक सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून करण्यात आली, जी ३१ डिसेंबर २०२० रोजी कंपनीत ५१.३४% हिस्सा असलेली आणि देशासाठी प्रमुख विद्युत ऊर्जा प्रसारण कंपनी म्हणून पूर्णतः भारत सरकारच्या मालकीची होती.तिचे मूळ नाव “नॅशनल पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड” होते, ज्यावर देशातील उच्च-व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टमचे नियोजन,अंमलबजावणी,मालकी,संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी होती.८ नोव्हेंबर १९९० रोजी, फर्मला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र मिळाले.त्यानंतर २३ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांचे नाव पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असे बदलण्यात आले आहे.
या कंपनीच्या कामगिरीच्या आधारे,ऑक्टोबर १९९८ मध्ये या फर्मला मिनी-रत्न श्रेणी-१ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.तर मे २००८ मध्ये भारत सरकारने तिला “नवरत्न” आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये “महारत्न” दर्जा प्रदान केला आहे यामुळे तिचे महत्व अधोरेखित होते.या कंपनीवर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळण्याची कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्याला प्रथमच संधी मिळाली आहे.त्यामुळे ऍड.रवींद्र बोरावके यांचे राज्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान या आधी ऍड.बोरावके यांनी ठेवीदारांचा विश्वास संपादन करून नगर जिल्ह्यात सहकारात अग्रणी असलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेला नावारूपास आणले आहे.त्यानंतर बी.एस.एन.एल या सार्वजनिक कंपनीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.आता त्याची भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दखल घेऊन पुन्हा एकदा देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे मानले जात आहे.