जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी द्या-…यांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील खडकीसह अनेक उपनगरांमध्ये गाळमिश्रित व दूषित पाणी पुरवठा होत असून कोपरगाव नगरपरिषदेने त्वरित पाईपलाईन दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांचेकडे नुकतीच केली आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याची गांभीर्याने दखल घेवून ज्या पाईप लाईन लिकेज होवून गाळ मिश्रीत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करुन दुषित पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा-शहर राष्ट्रवादी काँग्रेस,कोपरगाव.

त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील खडकीसह अनेक उपनगरातील नागरिकांना काही दिवसांपासून गाळमिश्रित व दूषित पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या बाबीची कोपरगाव नगरपरिषदेने गांभीर्याने दखल घेवून ज्या पाईप लाईन लिकेज होवून गाळ मिश्रीत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करुन दुषित पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा.लवकरच ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होवून अशा अडचणी संपुष्टात येणार आहे.त्यामुळे तोपर्यंत तरी कोपरगाव नगरपरिषदेने नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होईल याची काळजी घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,फकीर कुरेशी,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,डॉ.तुषार गलांडे,संदीप कपिले,गणेश बोरुडे,राजेंद्र जोशी,सलीम पठाण,संतोष शेलार,विकास बेंद्रे,चंद्रकांत धोत्रे आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close