जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या शहराच्या उपनगरात सांडपाण्याचा तलाव,संतप्त नागरिकांचा मोर्चा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
   कोपरगाव शहरात तीन दिवसापूर्वी संपन्न झालेल्या जनता दरबारात अंबिकानगर येथील नागरिकांनी पिण्याचे दूषित पाणी आणि गटारीचा प्रश्न ऐरणीवर आणला होता मात्र तीन दिवस उलटूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने संतापलेल्या नागरिकांनी आज मुख्याधिकारी कार्यालयावर आपला मोर्चा वळवला होता व या प्रकरणी ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

वरील छायाचित्रात हेच ते अंबिकानगर येथील सांडपाण्याचे गटार व डासांचे उद्भवस्थान.

सदर प्रसंगी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी लवकरच या ठिकाणी भेट देऊन या समस्येवर मार्ग काढू असे आश्वासन दिले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे हा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणार का असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

  

पाण्याच्या उद्भवाजवळ निर्माण झालेली गटार दिसत आहे.

  गतवर्षी लोकसभा निवडणुका आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या असून त्या कमी की काय पालिकेत गेली साडेतीन वर्षे सातत्याने प्रशासन राज असल्याने कारभार अनियंत्रित झाला असल्याचे वारंवार उघड होत आहे.केवळ बिले आणि कमिशन यावर अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित होत असल्याचे नागरिकांचे आरोप आहे.परिणामी जनतेच्या समस्या जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पालिकेच्या साठवण तलावात पाणी असूनही ते न मिळणे यासह अंबिकानगर येथील नागरिकांना त्या भागात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असून त्या ठिकाणी संड पाण्याचा तलाव निर्माण झाल्याने त्या भागात डासांचे उद्भवस्थान निर्माण झाले आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा समस्या गंभीर बनल्या आहेत.परिणामी अनेक साथी उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  दरम्यान आधीच अकोले तालुक्यातील राजूर याठिकाणी काविळीची साथ उद्भवली असून अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत.त्याबाबत जिल्ह्यात सगळीकडे सावधानता घेतली जात असताना कोपरगाव नगरपरिषद अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.त्यामुळे या नागरिकांच्या भाळी काय लिहून ठेवले आहे हे समजायला अजून पंधरा दिवसांनी पावसाळा सुरू झाल्यावर उघड होणार आहे.तीन दिवसापूर्वी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेऊन त्या ठिकाणी नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधून घेऊनही काही उपयोग न झाल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा आज अंत झाल्याने त्यांनी आज नगरपरिषद कार्यालयावर आज मोर्चा काढला होता.त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या छायाचित्रात अंबिकानगर परिसरात निर्माण झालेली दुर्गंधी दिसत आहे.

   त्यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी लवकरच या ठिकाणी भेट देऊन या समस्येवर मार्ग काढू असे आश्वासन दिले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे हा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणार का असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close