जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’ आंदोलनाचा नागरिकांना फटका,आंदोलन सुरूच…!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी असलेल्या धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा सहकारी सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी लाच घेताना पकडले असताना लाच लुचपत विभागाने सदर गुन्हा हा सदोष दाखल केला असल्याचा आरोप करत आज तालुका तलाठी संघटनेने काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज सात दिवस उलटूनही त्यावर कोणताच तोडगा दृष्टिपथात न आल्याने सदर आंदोलनामुळे तालुक्यातील नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहे.त्यामुळे या प्रश्नावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  

दरम्यान या आरोपात फरार असलेला तलाठी धनंजय पऱ्हाड याने अटक पूर्व जमीन मिळावा म्हणून कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो न्यायालयाने काही अटी आणि शर्ती वर मंजूर केला असल्याची माहिती हाती आली आहे.

   कोपरगाव तालुक्यातील आपला वाळू चोरीतील ट्रॅक्टर सोडविण्यासाठी फिर्यदिकडे लाच मागितली असताना त्याची खबर अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी केलेल्या कारवाईत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा सहकारी सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी यांना आठ दिवसापूर्वी लाच घेताना पकडले होते.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.त्यानंतर तलाठी संघटनेने आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालून सदर गुन्हा हा सदोष असून सदर कारवाई चुकीची झाली असल्याचा दावा करून थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.त्याला आता सात दिवस उलटले असून अद्यापही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येऊन भेट दिलेली नाही हे विशेष ! त्यामुळे आगामी काळात शाळा,महाविद्यालय प्रवेश सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रे गोळा करण्याचे काम पालकांनी सुरू केले असून त्यांची मोठी ससेहोलपट होताना दिसत आहे.त्याबरोबर विविध शासकीय कामे महसुली कार्यालयाचे स्वाधीन असल्याने त्यावर विपरीत परिणाम झाला आहे.अनेक नागरिक गत आठवड्यापासून तहसील कार्यालयात चकरा मारताना दिसून येत असून या आंदोलनामुळे डोक्याला हात लावून घेत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी,शिर्डी अपर जिल्हाधिकारी,प्रांत आदी वरिष्ठ अधिकारी यांनी हा पेच लवकर सोडवांवा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

   दरम्यान या आरोपात फरार असलेला तलाठी धनंजय पऱ्हाड याने अटक पूर्व जमीन मिळावा म्हणून कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता अशी माहिती प्राप्त झाली असून न्यायालयाने काही अटी आणि शर्तीवर तो मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यात गुन्हा घडला त्यावेळी सदर मूळ फिर्यादी आणि सागर चौधरी यांचा मिलाफ असल्याचा दावा केला आहे.तसेच गुन्हा दाखल झालेला आरोपी तलाठी धनजंय पऱ्हाड हा त्यांच्या वरिष्ठ पोलीस आणि अधिकारी तसेच सहकाऱ्यांबरोबर गौण खनिज उत्खनन पंचनामा करत असल्याचा दावा केला आहे.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा आणि सत्र न्यायालयाने काही अटी शर्तीवर तो मंजूर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close