जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

सरपंच देशमुखांच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे पण अन्य आरोपींचे काय-रघुनाथ दादा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.त्यामुळे यातील प्रमुख आरोपी यांना शिक्षा झाली पाहिजे पण या पूर्वी अत्याचाराला बळी पडलेले विचारवंत नरेंद्र दाभोलकर,लेखक गोविंद पानसरे,पत्रकार कार्यकर्त्या गौरी लांकेश,एम.एम.कलबुर्गी यांच्या आरोपींना शासन शिक्षा कधी करणार असा कडवा सवाल शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी सरकारला विचारला आहे.

   

‘सरपंच संतोष देशमुख यांच्या गुन्ह्यात सरकारने जी तत्परता दाखवली आहे ती राज्यातील विचारवंत आणि हिंदुत्वाचे टीकाकार आणि अंधश्रद्धा आणि रूढीवादाच्या विरोधात प्रचार करणारे नरेंद्र दाभोलकर (ऑगस्ट २०१३ मध्ये हत्या),गोविंद पानसरे (फेब्रुवारी २०१५) आणि एमएम कलबुर्गी (ऑगस्ट २०१५) गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये दाखवली नाही ती सरकारने दाखवावी”-रघुनाथ दादा पाटील,अध्यक्ष सिफा व शेतकरी संघटना.

   बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.संतोष देशमुख यांची हत्या करताना,त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडीओ,फोटो समोर आले.या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.या हत्येच्या कटात सहभाग असलेले विष्णू चाटे,सुदर्शन घुले,प्रतीक घुले,सुधीर सांगळे,महेश केदार,जयराम चाटे,कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे.संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानतंर आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला असून परिणामी आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल,असे म्हटले जात असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी संतोष देशमुख सह राज्यातील विचारवंत प्रमुख बुद्धिवादी आणि हिंदुत्वाचे टीकाकार आणि अंधश्रद्धा आणि रूढीवादाच्या विरोधात प्रचार करणारे नरेंद्र दाभोलकर (ऑगस्ट २०१३ मध्ये हत्या),गोविंद पानसरे (फेब्रुवारी २०१५) आणि एमएम कलबुर्गी (ऑगस्ट २०१५) यांच्या हत्येमध्ये तपास पातळीवर इतकी तत्परता दिसून आलेली नाही असा जाबसाल रघुनाथ दादा पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

  याबाबत बोलताना त्यांनी म्हंटले आहे की,”पत्नीसह प्रभातफेरीसाठी गेलेल्या पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या.त्यानंतर,चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.प्रकरणाचा तपास सुरूवातीला कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिसांतर्फे केला जात होता.नंतर प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखालील विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला.एस.आय.टी.ने १२ पैकी दहा आरोपींना अटक केली व चार आरोपपत्र दाखल केली.मात्र,एस.आय.टी.मुख्य सूत्रधारांना आणि पानसरे यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना शोधण्यात अपयशी ठरल्याचा दावा केला असून आजही अशा हत्या राज्यात सुरू आहे हे चिंताजनक असल्याचे रघुनाथ दादा पाटील यांनी म्हंटले आहे.

   भारतासारख्या देशात जिथे गुन्हेगारी हाच बरेचदा राजकारणाचा मजबूत पाया असतो तिथे गुन्ह्यांचे अनेकविध प्रकार असू शकतात.कायद्यानुसार केलेले गुन्हे,कायदा वगळून गेलेले गुन्हे,गरजेनुसार कायद्याची व्याख्या बदलून केलेले गुन्हे,कायद्याच्या संरक्षणासाठी केले गेलेले गुन्हे असे अनेकविध प्रकार गुन्ह्यांचे असतात.हेच प्रकार धर्माच्या राज्यालाही तंतोतंत लागू होतात.धर्माच्या राज्यात याचे स्वरूप हुकूमशाही किंवा लोकशाहीपेक्षा भयानक असते.पुरातन काळातल्या धर्मग्रंथांमध्ये ईश्वरादी शक्तींनीही धर्माच्या रक्षणासाठी गुन्हे केल्याचे उल्लेख आहेत,मात्र या धर्माची व्याख्या कशी,कोणी करायची ? हा प्रश्नही कायम असतो.अशा वेळी गुन्ह्यापेक्षा गुन्ह्याचे उदात्तीकरण धोकादायक असते.सत्ता मिळवणे,टिकवण्यासाठी गुन्ह्यांचे नवनवे डोंगर उभारले जातात.न्यायालयाच्या निकालावरही राज्यकर्त्यांकडून प्रश्नचिन्ह उभारण्यात आले आहे.निकाल हा त्रुटींनी भरलेला असतो,तो संपूर्ण न्याय अशा स्वरूपात कधीही नसतो.त्यामुळे न्यायदानाचे तत्त्व हे खरेतर निकालदानाचे तत्त्व म्हणायला हवे,म्हणून लोकशाहीत न्यायालय केवळ निकाल देते, न्याय नाही.राजकीय व्यवस्था,सत्तेकडून झालेले गुन्हे लोकशाहीसाठी चिंताजनक असतात.लोकशाहीच्या चौरसाचे विधिमंडळ,नोकरशहा,प्रशासन आणि नागरिक हे महत्त्वाचे कोन असतात.राजकीय गुन्हेगारीकरण हे डावीकडून उजवीकडे या प्रमाणात जादापासून कमीकडे होत जाते,तर त्याचे अनिष्ट परिणाम हे याच क्रमात वाढत जातात.या सत्याचे बंधन सगळ्यांसाठी सारखेच असते.धर्मामध्ये असे सत्य वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळे असू शकते.म्हणूनच वाट चुकलेला धर्म आणि रस्ता चुकलेली लोकशाही या दोन्ही बाबी शोषणाचे कारण ठरतात.
 
सन -२०१९ मध्ये लोकसभेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपैकी ४३ टक्के सदस्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे ‘एडीआर’च्या (द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म) अहवालाने स्पष्ट केले आहे.या अहवालानुसार एडीआरने निवडणूक आयोगाला पत्र लिहून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा तपशील प्रसिद्ध करण्यासाठी असमर्थता दाखवणार्‍या राजकीय पक्षांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.राजकारणातील गुन्हेगारीविषयी सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या अभ्यासकांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे.देशातील लोकशाहीच्या बाजूने आवाज उठवणार्‍या पत्रकारांनाही राजकीय हिंसेला सामोरे जावे लागते ही बाब आता नवी राहिलेले नाही.हिंसा हे गुन्हेगारीचे सर्वात भयावह स्वरूप असते.राजकीय अधिकारातून झालेल्या हिंसा या पोलिसांची गुन्हेगारांशी झालेली चकमक आणि लष्कराकडून झालेली युद्धे म्हणता येतील,मात्र लोकप्रतिनिधी आणि सत्ताधार्‍यांनी थेट केलेली हिंसा जास्त चिंताजनक असते असेही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी शेवटी म्हंटले आहे.व पूर्वी हत्या झालेल्या विचारवंतांना न्याय कधी असा सवाल विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close