जाहिरात-9423439946
सिंचन

गोदावरी कालव्यांना..या तारखेला आवर्तन सुटणार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे ठरले होते.त्याप्रमाणे जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांच्या समवेत दृकश्राव्य झालेल्या बैठकीत गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला १३ एप्रिलपासून एकाचवेळी दोनही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असून कालवा दुरुस्ती करण्याचा विषय या बैठकीत घेतला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे कालव्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.गोदावरी कालव्यांचे मजबुतीकरण अथवा नव्याने बांधकाम करणे गरजेचे असून त्यासाठी ६०० कोटी रुपये निधीपैकी १३.०५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे”-आ.आशुतोष काळे

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूस कोणत्याही प्रकारचे बंधारे न बांधणेबाबत जलसंपदा विभागाने काढलेला आदेश शिथिल करणेबाबत व कोपरगाव तालुक्यात बंधारे बांधण्यास परवानगी मिळणेबाबत विचारविनिमय करणेबाबत दृकश्राव्य माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत आ.काळे यांनी गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सिंचनासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली.सदर मागणीचा विचार करून १३ एप्रिलपासून डाव्या व उजव्या कालव्याला एकाचवेळी दोनही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.दोनही उन्हाळी आवर्तन एकाचवेळी सोडण्यात येणार असल्यामुळे १५ जूनपर्यंत डावा व उजवा कालवा वाहणार असून त्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेती सिंचनाबरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.या बैठकीत आ.काळे यांनी पुन्हा एकदा मंजूर बंधाऱ्याच्या विषयाला हात घालून मंजूर बंधाऱ्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत आग्रह धरला तसेच मतदार संघामध्ये बंधारा कम पूल बांधण्याची मागणी केली.यामध्ये वडगाव कानळद,मंजूर,माहेगाव देशमुख,हिंगणी,डाऊच खुर्द,सडे,शिंगवे व पुणतांबा याठिकाणी बंधारा कम पूल बांधल्यास पावसाळ्यात पाणी साठविले जाऊन त्या पाण्याचा उन्हाळ्यात सिंचनासाठी उपयोग होऊ शकतो व त्याचबरोबर पूल बांधल्यास दळणवळणाचा मोठा प्रश्न देखील मार्गी लागून त्याचा मोठा फायदा नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे कालव्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.गोदावरी कालव्यांचे मजबुतीकरण अथवा नव्याने बांधकाम करणे गरजेचे असून त्यासाठी ६०० कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केलेली आहे.त्यापैकी ७८ कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आलेले आहेत.त्या प्रस्तावांपैकी या बैठकीत डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यातील १३ कोटी ०५ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.व पुढील निधी देखील तातडीने उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांनी दिली असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close