दळणवळण
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंजचे नाव बदला-…या नेत्याची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचा महत्वाकांक्षी असलेल्या समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या असून या समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यातील अंतर जवळपास ३० किलोमीटरचे आहे.त्यामुळे या शिर्डी इंटरचेंजला शिर्डी सह शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज असे नाव देण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनीही नुकतीच केली आहे.
“समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या असून या समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यातील अंतर जवळपास ३० किलोमीटरचे आहे.त्यामुळे या शिर्डी इंटरचेंजला शिर्डी सह शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज असे नाव देण्यात यावे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदारसंघ.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी-कोपरगाव पर्यंतचे काम पूर्ण झालेले आहे. या नागपूर ते शिर्डी-कोपरगाव पर्यतच्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार दि.११ डिसेंबर वर्धा जिल्ह्यात होत आहे.कोपरगाव तालुक्यातील इंटरचेंजला जगप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र शिर्डीचे इंटरचेंजला नाव देण्यात आलेले आहे.मात्र या समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या असून या समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यातील अंतर जवळपास ३० किलोमीटरचे आहे.त्यामुळे या शिर्डी इंटरचेंजला शिर्डी सह शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज असे नाव देण्यात यावे असे आ.काळे यांनी म्हटले आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,शंकरराव चव्हाण,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,महेश लोंढे,सुनील लोहकणे आदी मान्यवर उपस्थित होते.