दळणवळण
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग समृध्दी महामार्गाला समांतर शिर्डीला जोडा…यांची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
वर्तमानात पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे संरेखन बदलण्याबाबत नाशिक जिल्ह्यातील मंत्री उलटसुलट बोलत असून शिर्डी मार्गाला विरोध करत असल्याने ही खेदाची बाब असून हा मार्ग निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी ५०-६० गावांना औद्योगिक दृष्ट्या वरदान ठरणारा असून तो जवळके-बहादरपुर मार्गे समृध्दी महामार्गाला समांतर करावा अशी मागणी कोपरगाव (उबाठा) शिवसेनेचे तालुका प्रमुख गंगाधर रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

“समृध्दी मार्गाला समांतर असलेला जवळके – बहादरपुर मार्ग मुंबई,नाशिक,ठाणे,गुजरात आदी भागातील साई भक्तांना शिर्डीला जाण्यास आणि शिर्डी येथील साईभक्तांना पुण्यास आणि पर्यायाने पुणे,कोकण भागात जाण्यास सोपा आणि वेळ आणि पैसा वाचविणारा ठरणार आहे.शिवाय उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील उच्च शिक्षित तरुण पुणे येथे नोकरी,उद्योगास मोठ्या संख्येने आहे.शेतकऱ्यांना शेतमाल पुण्यास नेण्यास हा मार्ग वरदान ठरणार आहे’-तानाजी शिंदे,ज्येष्ठ कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती.
पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प गेली अनेक वर्षे विविध कारणांना रखडला आहे.या प्रकल्पाच्या प्रस्ताविक मार्गाला आधी जीएमआरटी प्रकल्पाने विरोध केला होता.काही महिन्यांपूर्वी या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गाचा प्रस्ताविक मार्ग कायम ठेवावा त्यात बदल करू नये अशी मागणी कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांना केली असताना आता नव्याने मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले छगन भुजबळ यांनी याबाबत शिर्डीसाठी विरोध केला आहे.गेल्या काही वर्षांपासून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे.या आधी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या रेल्वेचा डीपीआर तयार केला होता.या डीपीआरला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरी मिळालेली नव्हती.या प्रकल्पासाठी नाशिकच्या देवस्थानाची जागा मिळत नव्हती नंतर जीएमआरटी या महाकाय दुर्बिणीच्या प्रकल्पाने जागा देण्यास विरोध केल्याने हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच बारगळा होता मात्र त्याला पुन्हा मंजूरी दिल्याची बातमी आहे.

“शिर्डी आणि सिन्नर मधील या दुष्काळी भागात विमानतळ व्हावे यासाठी जवळके येथील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या जनमंगल ग्रामविकास संस्थेने काकडी जागा सुचवली होती.त्यासाठी काकडी येथील शेतकऱ्यांना मानसिकरीत्या तयार केले होते.परिणामी आज त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ वीणा तक्रार मार्गी लागले आहे.या भागातून रेल्वे गेल्यास या दुष्काळी भागास गती मिळणार आहे”- बाबासाहेब गव्हाणे,ज्येष्ठ कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.
खोडदच्या जीएमआरटी प्रकल्पाने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या डीपीआरला आक्षेप घेतल्याने रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाचा डीपीआर रद्द करुन नव्याने आखणी करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनास दिले होते.त्यानुसार या सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात बदल करुन अहिल्यानगर,शिर्डी मार्गे नाशिक असा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते.त्यामुळे त्यास मंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच विरोध केला आहे.तो पूर्णपणे अतार्किक असून शिर्डी हे देशविदेशात प्रसिद्ध देवस्थान असून हा नवीन डी.पी.आर.हा दुष्काळी निळवंडे लाभक्षेत्रातील गावांना न्याय देणारा असून याभागात औद्योगिक विस्ताराला मोठी संधी आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर औद्योगिक वसाहत पांगरी पर्यंत पर्यायाने वावी पर्यंत आली आहे.वावी पासून दुष्काळी भाग शिर्डी पर्यंत सुरु होतो.या भागात विमानतळ व्हावे यासाठी जवळके येथील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या जनमंगल ग्रामविकास संस्थेने काकडी जागा सुचवली होती.त्यासाठी काकडी येथील शेतकऱ्यांना मानसिकरीत्या तयार केले होते.परिणामी आज त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ वीणा तक्रार मार्गी लागले आहे.त्या ठिकाणी आता नाईट लँडिंग सुरू झाले आहे.काकडी या ठिकाणी उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आशानगर ही औद्योगिक नगर स्थापण्याची घोषणा केली होती.मात्र पुढे त्यांचे दोन वर्षात सरकार गडगडल्याने तो प्रकल्प अर्धवट राहिला आहे.आता भाजप सरकारला या ठिकाणी अशी औद्योगिक नगरी उभारण्याची मोठी संधी आहे.हा सर्व भाग दुष्काळी असल्याने भूसंपादन अल्प मोबदल्यात होण्यास मदत होणार आहे.उलट संगमनेर आणि परिसर बागायती असल्याने त्याचे भूसंपादन महागडे ठरणार आहे.त्यामुळे या प्रकरणी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुढाकार घेऊन रेल्वे मंत्री आश्विन नाईक यांचेकडे शिष्टमंडळ घेऊन जावून हा मार्ग जवळके-बहादरपुर मार्गे दापुर या ठिकाणी समृध्दी महामार्गाला समांतर नेऊन नाशिक-पुणे या मार्गाला जोडावा अशी मागणी गंगाधर रहाणे यांनी केली आहे.
वर्तमानात शिर्डीला जाण्यासाठी मुंबई,ठाणे,कल्याण,गुजरात येथील साई भक्तास मनमाड वरून किंवा दौंड मार्गे मोठा वेळ आणि पैसा खर्चून जावे लागते आहे.हा मार्ग मुंबई,नाशिक,ठाणे,गुजरात आदी भागातील साई भक्तांना शिर्डीला जाण्यास आणि शिर्डी येथील साई भक्तांना पुण्यास आणि पर्यायाने पुणे,कोकण भागात जाण्यास सोपा आणि वेळ आणि पैसा वाचविणारा ठरणार आहे.शिवाय उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील उच्च शिक्षित तरुण पुणे येथे नोकरी,उद्योगास मोठ्या संख्येने आहे.शिवाय उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल पुण्यास नेण्यास हा मार्ग वरदान ठरणार आहे.हा मार्ग दुष्काळी भागातून जाणारा असल्याने या भागासाठी तो क्रांतिकारक निर्णय ठरणार आहे.मात्र याबाबत सातत्याने सापत्नपणाची वागणूक देणाऱ्या उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कोणाही साखर सम्राट नेत्याने अद्याप तोंड उघडले नाही हे विशेष !