जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

सामाजिक भान राखत मुलीचा विवाह,सर्वत्र कौतुक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

शेतकरी संघतेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांची सुकन्या साक्षी व डॉ.डी.एस.काटे यांचे चि.गणेश काटे यांचा विवाह सोहळा नुकताच छ.संभाजी नगर येथे सायंकाळच्या सुमारास आयकॉन लॉन्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला असून या विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक व आप्तस्वकीय उपस्थित होते मात्र या लग्न सोहळ्यात सामाजिक भान राखत अड्.काळे व डॉ.काटे यांनी दिव्यांग व्यक्तीस पत्रावळी बनविण्याचे सयंत्र मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित केले असून आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला १.५० लाख,आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे मुले सांभाळणाऱ्या दोन संस्थेस प्रत्येकी ०१ लाख,मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार,तर  रुपयांचा धनादेश प्रदान केला असल्याने या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विवाह प्रसंगी उजवी कडून अड्.अजित काळे त्यांच्या धर्मपत्नी मुलगा,व कन्या साक्षी तर उजवीकडून डॉ.डी.एस.काटे त्यांच्या धर्मपत्नी चिरंजीव गणेश दिसत आहे.

   

अड्.अजित काळे यांनी न्यायालयीन मार्गाने निळवंडे कालवा कृती समितीस मोफत विधी सहाय्य करून नगर नाशिक या जिल्ह्यातील दुष्काळी १९० गावांना पाणी उपलब्ध करून दिले असून नुकतेच राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणून सदर योजनेप्रमाणे ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मु्द्दल व त्यावरील व्याजासह १.५ लाख रुपये मर्यादेपर्यंतचे ०५.५६ लाख शेतकऱ्यांचे कर्ज ०६ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याकडे पाठ फिरवली होती सरकारला ते कर्ज देण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यासह विवाह प्रसंगी केलेल्या सामाजिक कार्याने त्यास आणखी झळाळी प्राप्त झाली आहे.

“विवाह” हे एक पुरुष व स्त्री अशा दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन व संबंध आहे.हिंदू धर्मीयांत हा संस्कार विवाह तर अन्य धर्मीयात करार मानला जातो.सदर विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग समजला जातो.विवाह एक धार्मिक संबंध आहे.प्राचीन युनान,रोम,भारत इत्यादी सर्व सुसंस्कृत देशात विवाहाला धार्मिक बंधन तसेच कर्तव्य समजले जाते.वैदिक युगात यज्ञ करणे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य होते,परंतु यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण नाही होत नाही असे समजले जात होते.म्हणून विवाह सगळ्यांना धार्मिक दृष्टीने आवश्यक होता.पत्नी शब्दाचा अर्थच यज्ञात बरोबरीने बसणारी स्त्री आहे.श्रीरामाचा अश्वमेध यज्ञ पत्नीविना पूर्ण झाला नाही,म्हणून त्याला सीतेची प्रतिमा स्थापित करावी लागली होती.पितरांच्या आत्म्याचा उद्धार पुत्राच्या पिंडदानाने आणि तर्पणानेच होते,या धार्मिक विश्वासाने पण विवाहाला हिंदू धर्मामध्ये विवाह हे धार्मिक कर्तव्य सांगितले आहे व त्याला समाजमान्यता असल्याचे दिसून येते.हा विवाह अनेक जण मोठ्या डामडौलात करताना दिसतात.तर काहींना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही.आपल्या मुलांमुलींच्या लग्नाच्या चिंतेने अनेक शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवल्याचे आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचत असतो.मात्र विवाह हि परंपरा अलीकडील काळात पैशाचा उन्माद करताना दिसत असून त्यांना सामाजिक भान राहत असल्याचे दिसत नाही.त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात अनेक आत्महत्या होताना दिसत आहे.मात्र याचे सामाजिक भान फार थोड्या व्यक्तीना असल्याचे दिसत आहे.असेच एक व्यक्तिमत्व म्हणून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व निळवंडे कालवा कृती समितीचे विधीज्ञ अजित काळे यांचे नाव गौरवाने घ्यावे लागेल.त्यांची सुकन्या अड्.साक्षी काळे हिचा विवाह नुकताच छ.संभाजीनगर बीड बाह्यवळण रस्ता येथे ‘आयकॉन लॉन्स’ येथे डॉ.काटे डी.एस.यांचे चिरंजीव गणेश काटे यांचेशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यामुळे त्यांनी इतर विवाहाप्रमाणे यास सामाजिक भान असल्याचे दाखवून दिले आहे.विशेष म्हणजे सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश व सिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांची उपस्थिती लाभली होती.


   सदर प्रसंगी केंद्रिय मंत्री भागवत कराड,राज्याचे मंत्री अतुल सावे,मंत्री संदीपान घुमरे,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,अर्जुन खोतकर,गुलाबराव देवकर,अनिल पटेल,माजी खा.चंद्रकांत खैरे,भाऊसाहेब वाकचौरे,आ.संजय शिरसाठ,आ.रमेश बोरणारे,उच्च न्यायालयाचे सर्व न्यायमूर्ती,वकील संघाचे सर्व सदस्य,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर,साई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,वैजापूरचे। नगराध्यक्ष दिनेश परदेशी,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे,शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,सचिव कैलास गव्हाणे,नानासाहेब गाढवे,कौसर सय्यद,बाबासाहेब गव्हाणे,तानानी शिंदे आदी प्रमुख मान्यवरांसह नगर,नाशिक,छ.संभाजीनगर,जळगाव,धुळे,जालना आदी जिल्ह्यातून आप्तस्वकीयांची मोठी उपस्थिती लाभली होती.


   दरम्यान अड्.अजित काळे यांनी न्यायालयीन मार्गाने निळवंडे कालवा कृती समितीस मोफत विधी सहाय्य करून नगर नाशिक या जिल्ह्यातील दुष्काळी १९० गावांना पाणी उपलब्ध करून दिले असून नुकतेच राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणून सदर योजनेप्रमाणे ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मु्द्दल व त्यावरील व्याजासह १.५ लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र कर्जाची व्याप्ती पाहून अचानक पोर्टल बंद करून त्यातून काढता पाय घेतला होता मात्र या प्रकरणी शेतकरी संघटनेने ऍड.अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात याचिका करून त्या विरोधात दाद मागितली होती.अखेर या प्रकरणी न्यायालयाने आदेश देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश दिल्याने सरकार बँक फुटवर गेले असून ५.५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ०६ हजार कोटींची कर्जमाफी द्यावी लागली आहे.यात अड्.काळे यांचे मोठे योगदान आहे.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सेवा निवृत्त कामगारांना आपला हक्काचा भविष्य निर्वाह निधी त्यांनी उच्च न्यायालयातून मिळवून दिला होता.याखेरीज त्यांचे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी त्यांचे वेळोवेळी लढे सुरुच असल्याचे दिसून येते.त्यांचे पिताश्री बबनराव काळे हे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निष्ठावान सहकारी व शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते.त्यामुळे अड्.काळे यांचे सामाजिक योगदान मोठे आहे यात कुठलीही शंका नाही.तरीही त्यांनी त्यात आणखी कळस चढवला असल्याचे दिसून येते.

  सदर प्रसंगी अड्.काळे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सांभाळणाऱ्या दोन संस्थाना प्रत्येकी ०१ लाख रुपयांचा धनादेश,मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५१ हजार  जमा केले आहे.तसेच मुलाचे पिता डॉ.काटे यांनी भोकरदन तालुक्यातील करजगाव गावचे दिव्यांग तरुण चौरंगीनाथ लोखंडे यांना दोन्ही हात नसल्याची जाणीव ठेवून स्वयंरोजगार मिळावा यासाठी पत्रावळी बनिवण्याची मशीन भेट दिली आहे.यातून लोखंडे यास स्वयंरोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.आपण जीवन जगत असताना स्वतःसाठी सर्व काही करतो परंतु दिन दुबळ्या माणसात परमेश्वर वसत असल्याचे संत गाडगेबाबांसह अनेक संतांनी सांगून ठेवले आहे.राज्यातील संतांच्या उक्तीकृतीचे अनुकरण करून काळे व काटे या दोन्ही परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे विवाहस्थळी असणाऱ्या अनेकांनी त्यांच्या या सामाजिक सेवेचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close