जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकागुन्हे विषयक

कोपरगावात विक्रमी पंधरा जणांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ बऱ्या प्रमाणात नियंत्रणात आली असून गत सहा महिन्यात ०२ हजार ०६७ जणांना कोरोना विषाणूंचा डंख झाला असून तर आज अखेर ३७ जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून आज सकाळी ११.०० च्या सुमारास समता विघ्नेश्वर चौकानजीक केलेल्या कारवाईत पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली असली तरी बेशिस्त नागरिकांमुळे हि साथ कधीही डोके वर काढू शकते.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे आजही पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे

आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ०८५ इतकी झाली आहे.त्यात ४२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७७ टक्के आहे.आतापर्यंत ११ हजार ८०६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४७ हजार २२४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.६६ असा आढळला आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वव्यापी संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली असली तरी बेशिस्त नागरिकांमुळे हि साथ कधीही डोके वर काढू शकते.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे आजही पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत आरोपी शंकर धोंडीबा आव्हाड वय-५४,दिनेश शंकर बोरसे,वय-२०,रा.दोघे चांदेकसारे,नवनाथ तुकाराम सैदार,वय-३५,रा.कोळपेवाडी,सुरज कालिदास धिवर वय-२८,रा.कोकमठाण,रामदास बबनराव गिडगे,रा.कोळपेवाडी,वाल्मिक सदाशिव गोरे.वय-३१,मुर्शतपुर,संतोष मिननाथ जपे,वय-०४,राहुल नानासाहेब डाके,वय-२१ रा.गजाननगर,सूचित बाबासाहेब धस,वय-२१,कोळपेवाडी,पवन सोमनाथ चव्हाण वय-२१.रा.कोळपेवाडी,वैभव संजय साळवे,वय-२१,कोळपेवाडी,प्रसाद विश्वास वाघ,वय-१८,आंबिकानगर,शशिकांत विश्वास गायकवाड,वय-२०,रा.खोपडी,शुभम मंजाहरी नवले वय-२३, रा.खोपडी,अनिल बाबुराव मढ,वय-४२,रा.निमगाव मढ,ता.येवला.आदीं पंधरा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गाडी चालवताना फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंदात्मक कायदा १८९७ अन्वये दिलेले आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आले आहे.आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकारी गणेश पांडुरंग थोरात पो.कॉ.वय-३०,यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७७९/२०२० भा.द.वि.कलम १८८ (२),२६९,२७०, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close