जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

‘कामधेनू’ ची किमंत…!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
  
    कोपरगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यात एकूण झालेल्या ०२ लाख ०८ हजार ०५० मतदानात विद्यमान अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांना ०१ लाख ६१ हजार १४७ तर मोठ्या पवार गटाचे उमेदवार संदीप वर्पे ३६ हजार ५२३ यांना इतकी मते मिळाली असून आ.आशुतोष काळे यांना ०१ लाख २४ हजार ६२४ मतांची विक्रमी आघाडी मिळाली असली तरी त्यांच्याबरोबर माजी आ.स्नेहलता कोल्हे गटासह महसूल मंत्री यांचे मेहुणे राजेश परजणे,महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,विजय वहाडणे,शिंदे शिवसेना आदी चार गटांची पंगा घेऊन व असलपसंख्याक मतांनी साथ दिलेली नसतानाही सेनेला घेऊन आपली एकाकी लढत देत अनामत रक्कम वाचवत मोठे मताधिक्य मिळवले असून त्यांना मिळालेल्या अन्य चिन्ह साधर्म्यामूळे मतांची बेरीज धरता ४० हजाराहून अधिक होत असल्याने त्यांच्या या मतांच्या आकडेवारीचे सामान्य नागरिकांत कौतुक होत आहे.

  

आजवर काळे आणि कोल्हे यांचेसमोर उभ्या असलेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते असा या मतदार संघाचा इतिहास असताना त्यांनी मात्र त्यावर मात केली आहे.शिवाय चिन्ह साधर्म्य असलेल्या उमेदवाराने त्यांना चांगलाच दणका दिला असून शिवाजी कवडे या उमेदवारास ०३ हजार ६४० अशी मोठी मते मिळाली असल्याने त्यांचा मोठा तोटा झाला असल्याची सर्वत्र चर्चा आहे.त्यामुळे त्यांचे एकूण मतांची संख्या चाळीस हजाराहून अधिक असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आगामी कालखंडात त्यांना तालुक्यातील समस्यांना भिडण्याची व जनतेचा आवाज उठविण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

 

  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला.लाडकी बहीण आणि इतर सरकारी योजनांच्या बळावर महायुती सरकारने मोठा विजय प्राप्त केला आहे.लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे त्यांना अधिक जागा जिंकता आल्या,असा आरोप महायुतीमधील नेत्यांनी केला होता.त्यामुळे महायुतीकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’,अशा घोषणा देण्यात आल्या.विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा मविआला फार लाभ झाला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे.राज्यात ३८ विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांचे प्राबल्य आहे.३८ पैकी २२ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे,तर मविआला केवळ १३ जागा मिळाल्या आहेत.याला कोपरगाव विधानसभा मतदार संघ ही अपवाद नाही.या ठिकाणी विद्यमान आ.काळे महायुतीकडून उभे होते.तर त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आ.कोल्हे यांनी आपली संपूर्ण शक्ती त्यांच्या पाठीमागे उभी केली असल्याचे दिसून आले आहे.एवढेच नाही तर त्यांच्या सोबतीला महसूल मंत्री विखे यांचे मेहुणे व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,’महानंदा’चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,भाजपचे निष्ठावान माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आदींनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती.तुलनेने शरद पवार गटाचे जनसामन्यातील उमेदवार संदीप वर्पे यांचे मागे एक शरद पवार सोडले तर शिवसेना ठाकरे गट ही एकमेव संघटना केवळ उभी होती.त्यांना ज्या मंतांची मोठी अपेक्षा होती त्या मुस्लिम मतदारांनी त्यांचेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे.’लाडकी बहिण असलेल्या मुस्लिम महिलांनी त्यांचे कडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे हे विशेष ! त्याला कोपरगाव विधानसभा मतदार संघ अपवाद नव्हता या ठिकाणी मुस्लीम मतदारांच्या विभाजनाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे.

 
त्यातच राज्यभर गाजलेले काळे,कोल्हे ही राजकीय घराणी एकत्र आल्याने ही लढत आणखी किचकट बनली होती असे लक्षात आले आहे.याचे त्यामुळे संदीप वर्पे या बुद्धिवादी तरुणास संधी मिळूनही त्यांना तसे रत्नपारखी न भेटल्याने त्यांची अवस्था मेंढराच्या गळ्यातील हिऱ्यासारखी झाली असल्यास नवल नाही.परिणामी थोरल्या पवार यांनी त्यांना उमेदवारी देऊनही त्यांची अवस्था,’दैव देते आणि कर्म नेते ‘ अशी झाली आहे.तरीही त्यांची एकाकी लढत नगरसह राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

   एकूण झालेल्या मतदानात उमेदवारास आपली अनामत वाचवायची असल्यास उमेदवारास एकूण झालेल्या मतांच्या ०६ टक्के मते मिळवणे आवश्यक आहे.त्यामुळे संदीप वर्पे यांना आपली अनामत वाचण्यास ३४ हजार ६७५ मते आवश्यक होती तर त्यांना मिळालेली मते होती ३६ हजार ५२३ म्हणजे एकूण मतांच्या १७.५५ टक्के मते त्यांना मिळाली आहे.आजवर काळे आणि कोल्हे यांचेसमोर उभ्या असलेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते असा या मतदार संघाचा इतिहास असताना त्यांनी मात्र त्यावर मात केली आहे.शिवाय चिन्ह साधर्म्य असलेल्या उमेदवाराने त्यांना चांगलाच दणका दिला असून शिवाजी कवडे या उमेदवारास ०३ हजार ६४० अशी मोठी मते मिळाली असल्याने त्यांचा मोठा तोटा झाला असल्याची सर्वत्र चर्चा आहे.त्यामुळे त्यांचे एकूण मतांची संख्या चाळीस हजाराहून अधिक असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे त्यांना आगामी काळात पक्षात मोठी किंमत येऊ शकत असल्याचे मतदार संघात आणि जिल्ह्यात बोलले जाऊ लागले आहे.त्यामुळे मतदारांची भविष्यातील अवस्था,’ कामधेनू (किंमती मत) देऊन शिंगरू घेण्यासारखी झाली नाही म्हणजे कमावली.त्यामुळे त्यांची आठवण येथील मतदारांना भविष्यात नक्कीच येईल यात शंका नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close