गुन्हे विषयक
टिकाव-फावड्याने मारहाण,दोन जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
घराच्या मागील जागा हवा येण्यासाठी सोडण्याच्या कारणावरून दोन गटात टिकाव आणि फावड्याने मारहाण होऊन त्यात दोन जण जखमी झाले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी संजय रावसाहेब देशमुख,श्रीकांत संजय देशमुख,मयूर संजय देशमुख,प्रकाश रावसाहेब देशमुख,अक्षय मच्छीन्द्र देशमुख आदी विरुध्द फिर्यादी सतीश बाबुराव चौधरी यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहाजापूर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी व आरोपी संजय चौधरी यांच्यात जमिनीच्या बांधावरून वाद आहेत.शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास आरोपी संजय देशमुख,श्रीकांत देशमुख,मयूर देशमुख आदी तिघे जण गट क्रं.८२ मध्ये आले व त्यांनी दोघांच्या सामायिक बांधावरून वाद उकरून काढून वाद वाढवला असून मारहाण केली आहे.त्यात फिर्यादीचे वडील आणि पत्नी जखमी झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी शेतकरी सतीश चौधरी (वय-३०) हे कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असून ते कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यात कर्मचारी आहे.ते आपल्या कुटुंबासमवेत शेतातच घर करून राहतात.त्यांचा व आरोपी संजय चौधरी यांच्यात जमिनीच्या बांधावरून वाद आहेत.शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास आरोपी संजय देशमुख,श्रीकांत देशमुख,मयूर देशमुख आदी तिघे जण गट क्रं.८२ मध्ये आले व त्यांनी दोघांच्या सामायिक बांधावरून वाद उकरून काढून ते फिर्यादिस म्हणाले की,”तू,सामायिक बांधापासून घराच्या पाठीमागील पाच फूट जागा सोडून दे” त्यावर आपण सदर जागा सोडण्यास नकार दिल्याचा राग येऊन त्यांनी आपल्याला शिवीगाळ करण्यास सूरुवात केली.बांधावर तार कंपाऊंड करून त्याचा खर्च आपण सामायिक करू” मात्र त्यांनी त्यास नकार दिला असून त्यावर आम्ही ऊस लागवड करण्यास सुरुवात केली असता त्यांनी आपल्याला टिकाव,फावडे व टिकावाच्या दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान यात आपले वडील बाबुराव चौधरी व पत्नी निशा चौधरी हे दोघे सदर भांडण सोडविण्यास आले असता त्यांनी वडील आणि पत्नी मारहाण केली आहे.यात ते जखमी झाले आहे.त्या नंतर आम्ही आमच्या तर ते त्यांच्या घरी गेले मात्र काही वेळाने आपण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास निघालो असता या आरोपीनी पुन्हा चाल करून घरी येऊन मारहाण केली आहे.त्यावेळी आणि नेहाबाई चौधरी आणि भाची अक्षदा संतोष मुरकुटे यांनाही मारहाण केली आहे.व कामावर जाताना,”आपले वरपर्यंत संपर्क आहे असे म्हणून तुझी खांडोळी करून टाकतो” अशी धमकी दिली आहे.
सदर घटनेनंतर आपण फिर्याद देण्यासाठी कोपरगाव येथे जाण्यासाठी निघालो असता यातील मच्छीन्द्र देशमुख,याने चालू गाडीत माझ्या डोक्यावर बुक्का मारला आहे, व ‘तू’ लई माजला आहे,”तुझा खून करून टाकतो”असे म्हणून धमकी दिली आहे.
दरम्यान वडील आणि पत्नी यांच्या उपचारानंतर फिर्यादी सतिष चौधरी यांनी कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत त्यांना सदर घटनेची कल्पना दिली आहे.व त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.४७१/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,४४७ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.महेश कुसारे हे करीत आहेत.