जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सोशल मीडियाच्या गैरवापर,तरुणाचा खून,तीन आरोपी अटक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
  
   राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे येथील रहिवासी असलेल्या व पुणे येथे नोकरी करत असलेल्या तरुणाने इन्स्टाग्रामवर मेहुण्यास मेसेस करून बहिणीचे वाटोळे करण्याचा आरोप करून व त्याचा राग मनात धरून साईनाथ गोरक्षनाथ काकड (वय-२४) यास पुण्यातून गाडीत टाकून आणून त्यास गंभीर मारहाण करून काहीतरी विषारी औषध देऊन मारून टाकले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.यात प्रमुख आरोपी म्हणून रुपाली संजय लोंढे,अनिल संजय लोंढे,दोघे रा.रेलवाडी,कोकमठाण,दिनेश विठ्ठल आसने,रा.ब्राम्हणगाव,राहुल अशोक चांदर रा.खीर्डी गणेश आदीवर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दखल केल्याने राहाता आणि कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

  

सोशल मीडियाचे असंख्य फायदे आहेत.ते परस्परसंवादाची सोय आणि विविध प्लॅटफॉर्मवर माहितीची देवाणघेवाण करण्यास मदत करते.तथापि,त्याचे अनेक तोटे देखील आहेत ज्यात गोपनीयतेची चिंता,लक्ष विचलित करणे,सायबरबुलिंग,चुकीची माहिती एखाद्याची बदनामी होऊ शकते.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यात साईनाथ काकड या तरुणाचा बळी गेला आहे.

     सदरचे सविस्तर वृत्त असे की,”सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.मित्र आणि कुटुंबाशी संपर्क साधण्यापासून ते व्यवसायांना प्रोत्साहन देण्यापर्यंत,फेसबुक,इंस्टाग्राम,व्हॉटसअप,ट्विटर आणि लिंक्डइन सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रचंड मूल्य देतात.सोशल मीडियाचे असंख्य फायदे आहेत.ते जागतिक नेटवर्किंग,विस्तृत व्यवसाय आणि विपणन संधी,परस्परसंवादाची सोय आणि विविध प्लॅटफॉर्मवर माहितीची देवाणघेवाण करण्यास मदत करते.तथापि,त्याचे अनेक तोटे देखील आहेत ज्यात गोपनीयतेची चिंता,लक्ष विचलित करणे,सायबरबुलिंग,चुकीची माहिती एखाद्याची बदनामी होऊ शकते.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जाऊ शकतो,ज्यामुळे गोंधळ आणि संभाव्य हानी होऊ शकते.व्यक्ती सोशल मीडियाचा वापर इतरांना त्रास देण्यासाठी,धमकावण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी करू शकतात,ज्यामुळे मानसिक आरोग्य समस्या किंवा भांडणे उद्भवू शकतात आणि अगदी खूनासारखे दुःखद परिणाम देखील होऊ शकतात.अशीच घटना नुकतीच उघडकीस आली असून यात राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे मूळ रहिवासी असलेल्या व पुण्यात नोकरीस असलेल्या साईनाथ काकड या तरुणास आपला जीव गमवावा लागला आहे.यातील तपास अद्याप पूर्ण व्हायचा आहे.त्यानंतर यातील सत्य बाहेर येणार आहे.

    यातील आरोपी रुपाली संजय लोंढे,अनिल संजय लोंढे,दोघे रा.रेलवाडी,कोकमठाण,दिनेश विठ्ठल आसने,रा.ब्राम्हणगाव,राहुल अशोक चांदर रा.खीर्डी गणेश आदी चार जण मयत तरुण साईनाथ काकड यास त्याच्या फ्लॅट मधून आपल्या गाडीच्या सहाय्याने उचलून घेऊन काल दि.१० एप्रिल रोजी दुपारी १.३० ते रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कोकमठाण येथील आरोपी महिला रुपाली संजय लोंढे यांचे घरी आले होते व त्याला म्हणाले की,”तू,आमचे बहिणीचे नवऱ्याला इंस्टाग्रामवर मेसेज का केले ? तू आमचे बहिणीचे वाटोळे केले आहे.असे  म्हणून मयत तरुणास त्याचे पुण्यातील फ्लॅट मधून बाहेर ओढत आणून त्यांचे कडील गाडीत टाकून कोकमठाण येथे आरोपी रूपाली लोंढे हिचे घरी घेऊन आले होते.व त्याला गंभीर मारहाण करून काहीतरी विषारी औषध देऊन त्याचा खून केला आहे.

  

दरम्यान यातील आरोपी अनिल लोंढे,दिनेश आसने,राहुल चांदर,आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.यातील प्रमुख आरोपी महिला रुपाली लोंढे हि फरार असून तीला अद्याप अटक केलेली नाही.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी मयत तरुणाचा पोहेगाव रोड,डोऱ्हाळे येथील भाऊ महेश गोरक्षनाथ काकड (वय-२६) यांनी कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा क्रं.-२५१/२०२५भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १०३,(१)१४०(१),१८९(२),१९१(२)प्रमाणे वरील चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून यात एक १७ वर्षीय अल्पवयीन बालकाचा गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती आहे.त्याला बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान यातील आरोपी अनिल लोंढे,दिनेश आसने,राहुल चांदर,आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.यातील प्रमुख आरोपी महिला रुपाली लोंढे हि फरार असून तीला अद्याप अटक केलेली नाही.मयत तरुणाचे वडिलांनी आपल्या मयत मुलास आरोपींच्या घरी पाहिले असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

    दरम्यान यातील अटक तीन आरोपींना शहर पोलिसांनी नुकतेच कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ऍड.प्रदीप रणधीर यांनी काम पाहिले आहे त्यांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचा दावा करून मयतास कोणत्या कारणावरून उचलून आणले,त्या गुन्ह्यात वापरलेले वाहन अद्याप शोधायचे आहे.आरोपी महिला रुपाली लोंढे हिला अटक करायची आहे असा दावा करून ०७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.तर आरोपींच्या वतीने ऍड.जयंत जोशी यांनी काम पाहिले आहे.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दि.१६ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मथुरे हे करीत असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close