शैक्षणिक
कायद्याचे पालन केल्यास देशात सुशासन निर्माण होईल-यांचे प्रतिपादन

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन केल्यास देशात सुशासन निर्माण होईल असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे वाहतुकीचे विविध नियम ही समाजाला शिस्त लावण्यासाठी असतात,महाविद्यालयातील तरुणांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करत ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे”-भगवान मथुरे,पोलिस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस.
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयामध्ये विद्यार्थांना वाहतुकीचे नियम आणि त्याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र पोलिस स्थापना सप्ताह आयोजित केला होता त्यावेळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ.वसुदेव साळुंके रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.नवनाथ दळवी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”देशातील युवाशक्ती ही मोठी विधायक ताकद असते त्यांनी जर ठरवले तर ते आपल्या आई-वडिलांना गौरवास्पद व भूषणावह कामगिरी करू शकतात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे वाहतुकीचे विविध नियम ही समाजाला शिस्त लावण्यासाठी असतात,महाविद्यालयातील तरुणांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही ते याप्रसंगी म्हणाले.
सदर प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी महाविद्यालयातील तरुण हे समाजाच्या शिस्तीचा एक महत्त्वाचा दुवा आहे असे प्रतिपादन केले आहे तर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.धनश्री गायकवाड महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महिला बालविकास अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल भगवान मथुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वसुदेव साळुंके यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रवींद्र जाधव व उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ.नामदेव ढोकळे यांनी मान आहे.