जलसंपदा विभाग
गोदावरी कालव्यांचे आवर्तन लांबले,शेतकरी हैराण,संताप व्यक्त !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी कालव्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे ०६ फेब्रुवारी रोजी कालव्यांना सुटणारे आवर्तन तब्बल दहा दिवस उशिरा सुटले होते यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होत असून प्रवरा नदीस हि उन्हाळी आवर्तन सुटले असताना गोदावरी कालव्यांचे आवर्तन अद्याप सोडले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जलसंपदा विभागाचा हा भोंगळ कारभार उघड झाल्याने याचा फटका सत्ताधारी पक्षास बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- आमच्या प्रतिनिधीने नाशिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”या वेळी उन्हाळ आवर्तन हे आगामी ०५ मे ते १० मे दरम्यान सोडले जाणार असल्याची माहिती दिली आहे.जास्ती करून हि तारीख १० मे असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
गोदावरी खोरे कालवा समितीची बैठक नोव्हेंबरच्या मध्यावर अ.नगर जिल्हाधिकारी कार्यालयात लाभधारक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शिरस्त्याप्रमाणे संपन्न झाली होती.भंडारदरा,गोदावरी,मुळा प्रवरा नद्यांमधील पाण्याचं आवर्तन ठरवण्यात आलं होतं.गोदारी कालव्यांचे आवर्तन ठरविण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही विश्वासात घेतले जात नाही.अलीकडील काळात पुढाऱ्यांचे हे वर्तन चिंताजनक ठरत असून शेतकऱ्यांसाठी हि हुकूमशाही ठरत आले आहे.त्यामुळे कालव्यांना पाणी सोडण्याचे सोपस्कार तेवढे उरकले जातात मात्र त्या पासून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना किती फायदा होतो अथवा झाला याचे कोणालाही काही सोयरंसुतक राहिलेले नाही असे अलीकडील काळात दिसून येत आहे.वर्तमानात गोदावरी कालव्यांची स्थिती पाहून कोणीही हेच बोलल्याशिवाय राहणार नाही.कारण लाभक्षेत्रातील शेतकरी हा महत्वाचा घटक असताना त्यांना कोणालाही विचारेसे वाटत नाही.त्यामुळे पिके जाळून गेल्यावर पाणी देण्याचे नवीन धोरण काळ्या इंग्रजांनी अवलंबले असल्याचे वारंवार दिसून येत आहे.अशीच वर्तमान स्थिती निर्माण झाली असून विहिरींची भूजल पातळी खोल गेली असून ऊस,चारा,व भाजीपाला पिके जळून गेली आहे.तर काही अंतिम घटका मोजीत आहे.उन्हाळ आवर्तन ऊस व चारा पिके जगविण्यास त्याची मदत होण्याऐवजी त्याची होळी होण्याची जलसंपदा विभाग वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात हिच स्थिती उदभवली असून त्याबाबत शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.रब्बीचे आवर्तन हे रब्बी व उन्हाळी आवर्तनाचा मध्यावर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करूनही काही उपयोग झालेला नाही.त्यामुळे हे आवर्तन आगामी १० मे रोजी देण्याची व्यवस्था होणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही.हे आवर्तन म्हणजे,’ बैल गेला आणि झोपा केला’ अशीच स्थिती होणार असल्याचे शेतकऱ्यांत बोलले जात आहे.
दरम्यान कोपरगाव-राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती महामंडळाची जमीन एकरी २४०० रुपये वार्षिक कराराने घेतली असून त्यांना सरकारची रक्कम भरणे अवघड होणार आहे.पूर्वी हे क्षेत्र एकरी १६०० रुपये एकरी होते.त्यात भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याची माहिती आहे.’सिंचन पाणी उपलब्ध नाही’ म्हणणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना,’शेती महामंडळाचे ब्लॉकचे पाणी कोठे गेले’ अशी विचारणा शेतकऱ्यांनी या विभागास केली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने नाशिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”या वेळी उन्हाळ आवर्तन हे आगामी ०५ मे ते १० मे दरम्यान सोडले जाणार असल्याची माहिती दिली आहे.जास्ती करून हि तारीख १० मे असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.त्या यावेळी दारणा धरणावर भेट देत असताना हा संपर्क स्थापीत झाला होता.
जलसंपदा विभागाच्या नियोजनशूक्य कारभामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याची भरपाई जलसंपदा विभाग देणार का ? असा सवाल शेतकरी राजेंद्र खिलारी यांनी विचारला आहे.