जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगाव तालुक्यात…या ठिकाणी विरभद्र यात्रा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

गोधेगांव ( वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यातील जुन्या मुंबई-नागपूर महामार्गालगत असलेल्या गोधेगाव येथील ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र महाराजांची यात्रा सालाबादप्रमाणे आज दि.१० ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

स्वायंभूव मन्वंतरात दक्ष प्रजापतीने यज्ञ केला.यज्ञासाठी समस्तांना निमंत्रण दिले.मात्र आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञसमारंभात गेली.तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.त्यामुळे शिवाचा राग अनावर झाला.त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली.शिवाने वीरभद्राला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली.रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला यज्ञकुंडात फेकून दिले.शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले आहे.

वीरभद्र या पात्राची कथा पद्मपुराण आणि महाभारतात मिळते.स्वायंभूव मन्वंतरात दक्ष प्रजापतीने यज्ञ केला.यज्ञासाठी समस्तांना निमंत्रण दिले.मात्र आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञसमारंभात गेली.तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला.त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली.शिवाने वीरभद्राला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली.रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला यज्ञकुंडात फेकून दिले.शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले.हि दैवते गावोगाव असून श्री क्षेत्र गोधेगाव येथेही विरभद्राचे स्थान आहे.त्याची यात्रा संपन्न होत आहे.
या निमित्त गावातील युवक गोदावरीचे पवित्र जल आणून वीरभद्र महाराजांच्या मुर्तीस अभ्यंग स्नान घालून संपूर्ण गावातून गंगाजलाची वाजत मिरवणूक काढतात.संध्याकाळी ५ वाजता मंदिराचे पुजारी शामराव काकडे यांच्या हस्ते बारागाडया ओढण्याचा प्रसिद्ध कार्यक्रम होतो.तर रात्री ६ वाजता गावातील लहान थोर भाविक मंदिरात नैवेद्य घेऊन पुजा करून मुर्तीस अर्पण करतात व सर्वजण मंदिराच्या पुजाऱ्यासह एकत्र महाप्रसाद प्राशन करतात.रात्री १२ वाजेपर्यंत मंदिराचे पुजारी भाविकांसमोर डफाच्या तालावर ओव्या गातात.या वेळी यात्रेनिमित्त मनोरंजनासाठी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविकांनी या यात्रा उत्साहास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा समिती
ने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close