जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या संस्थेमार्फत वृक्ष लागवड संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


कोपरगाव शहरात क्रेडाई या बिल्डर्स संघटनेच्या वतीने महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त नरोडे नगर,श्रीराम पार्क आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

  

“झाडे वातावरणातील कार्बन डायॉक्साईड कमी करून जास्तीत जास्त ऑक्सिजन असलेली ताजी हवा देतात.सध्याच्या परिस्थितीत,शहरी वातावरणात जिथे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे तिथे झाडे अत्यंत महत्त्वाची बनली आहेत.अशा वेळी कोपरगाव येथील क्रेडाई या संस्थेच्या वतीने वृक्ष लागवड होत आहे ही समाधानाची बाब आहे”- सुहास जगताप,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

 

    शहरी भागात सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे.याव्यतिरिक्त,हरितगृह वायू उत्सर्जन वेगाने हवेच्या गुणवत्तेला हानी पोहोचवत आहे. अधिक झाडे लावल्याने त्यांचे परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते.झाडे वातावरणातील कार्बन डायॉक्साईड कमी करून जास्तीत जास्त ऑक्सिजन असलेली ताजी हवा देतात.सध्याच्या परिस्थितीत,शहरी वातावरणात जिथे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे तिथे झाडे अत्यंत महत्त्वाची बनली आहेत.झाडे बाहेरचे तापमान कमी करून हवेच्या चांगल्या गुणवत्तेतही योगदान देतात.पृथ्वीची नैसर्गिक शुद्धीकरण प्रणाली म्हणून,आपण श्वास घेत असलेली हवा स्वच्छ करण्यात झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.अशाप्रकारे,चांगल्या हवेच्या गुणवत्तेचा आनंद घेण्यासाठी आपण जंगलतोड कमी केली पाहिजे आणि पुनरुत्पादनाचे जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत.या हेतूने कोपरगाव शहरातील क्रेडाई या संस्थेच्या वतीने महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने नरोडे नगर व श्रीराम पार्क आदी ठिकाणी कोपरगव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप  यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

   सदर प्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक,संघटनेचे सदस्य रविकिरण डाके,दत्तात्रय नरोडे,उपाध्यक्ष विलास खोंड,नगर रचना सहाय्यक किरण जोशी,सचिव चंद्रकांत कौले आदी मान्यवर उपस्थित होते.

  सदर प्रसंगी प्रास्तविक प्रसाद नाईक यांनी केले तर रविकिरण डाके यांनी आपले वृक्ष लागवडी बाबत अनुभव कथन तर सूत्रसंचालन राजेश ठोळे यांनी तर उपस्थितांचे आभार चंद्रकांत कौले यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close