जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

…या योजनेचे हयातीचे दाखले हजर करा;अन्यथा मदत होणार स्थगित !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

“संजय गांधी निराधार अनुदान योजना” ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना असून या योजनेत कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत
१० हजार ६८० लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या योजनेत दर वर्षी हयातीचे दाखले देणे गरजेचे असल्याचे सांगून तालुक्यातील ०४ हजार ७३५ लाभार्थ्यांनी आपले दाखले दिले असून उर्वरित नागरिकांनी आगामी ३० जून पर्यंत हयातीचे दाखले वेळेत द्यावे असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.

“संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी सदर हयातीचे दाखले देण्यासाठी त्या-त्या गावातील ग्राम महसुली अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व विहित मुदतीत दाखले सादर करावे.सदर हयातीचे दाखले दाखल न केल्यास सदर मदत स्थगित होऊ शकते”-महेश सावंत,तहसीलदार,कोपरगाव.

   “संजय गांधी निराधार अनुदान योजना” ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे.या योजनेत,पात्र कुटुंबातील प्रती लाभार्थी रुपये १५०० आर्थिक मदत दिली जाते.या योजनेसाठी पात्र होण्यासाठी,नाव बीपीएल कुटुंबांच्या यादीत असले पाहिजे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी किंवा त्या समान असले पाहिजे.केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

तहसीलदार महेश सावंत.

     दरम्यान ही योजना महाराष्ट्र सरकारकडून १०० % निधीद्वारे दिली जाते.यात कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत एकूण १० हजार ६८० नागरिकांना लाभ देण्यात आला आहे.मात्र या योजनेत दर वर्षी लाभार्थ्यांना आपल्या हयातीचा दाखला देणे क्रमप्राप्त आहे.मात्र बरेच नागरिकांना हा दाखला देण्यास टाळाटाळ करताना आढळून येत आहे.परिणामी ही योजनेचे पैसे संबधित लाभार्थ्यांना पाठवणे अवघड होऊन बसते.व त्यानंतर आमचे पैसे स्थगित झाल्याच्या तक्रारी नागरिक करताना आढळून येताना दिसतात.त्यामुळे आपली मदत पूर्ववत सुरू ठेवायची असल्यास उर्वरित नागरिकांनी आपले हायातीचे दाखले ताबडतोब आगामी ३० जून पर्यंत दाखल करावे असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.

    सदर हयातीचे दाखले देण्यासाठी त्या त्या गावातील ग्राममहसुली अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व विहित मुदतीत दाखले सादर करावे.सदर हयातीचे दाखले दाखल न केल्यास सदर मदत स्थगित होऊ शकते असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.त्यासाठी सदर प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार व्हि.आर.गोसावी हे हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close