जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ गुन्ह्यातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहरातील नवीन आय.टी.आय.इमारतीसमोर दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश दत्तात्रय मोरे यांचे सह अन्य साथीदारांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण यांना आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांचे समोर शहर पोलिसांनी हजर केले असता त्यांना शहरातील कायदा सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.कोपरगाव येथील न्यायालयाच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान अद्याप त्या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपी अद्याप फरार आहे.त्यांचा शोध घेऊनही पोलिसांना अद्याप ते सापडलेले नाही.या घटनेने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कोपरगाव शहर येथील पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले होते त्यानंतर ही स्थितीत काहीही फरक पडलेला नाही.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण अडीच कि.मी.असलेल्या नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीजवळ दिनाक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्यां सुमारास घडली होती.तेथे कोपरगाव नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश मोरे यांनी घेतले होते.येथे काम सुरू असताना आरोपीना संबधित ठेकेदार यांनी हरकत घेऊन “सदरचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे,तुम्ही दुसरीकडून जा” असे सांगितल्याचा राग येवून त्यांनी ठेकेदार योगेश मोरे आणि त्यांचे बंधू ,पुतण्या आदींना गज,लाकडी दांडे,दगड आदींच्या सहाय्याने शिवीगाळ करत जोरदार हल्ला चढवला होता.घटनास्थळी नजीकच्या नागरिकांनी धाव घेऊन सदरचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता तो फोल ठरला होता.दरम्यान या घटनेत फिर्यादी योगेश मोरे सह त्यांचे बंधू गणेश मोरे,पुतण्या पवन मोरे आदी तीन जण गंभीर जखमी झाले होते.या घटनेत कृष्णा आढाव हे मध्यस्थी करताना जखमी झाले होते.

   या प्रकरणी आरोपी अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण,मजीद रशीद पठाण व अन्य चार ते पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५५९/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),(२)११५(२),३५२,१८९(२),१९१(२),(३)१९०,सह फौजदारी दुरुस्ती कायदा कमल ७ प्रमाणे आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.यातील दोन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर अटक करून शहर पोलीस अधिकारी यांनी कोपरगाव अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांचेसमोर हजर केले होते.याबाबत सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी सरकारी पक्षाचे वतीने जोरदार बाजू मांडली होती.तर आरोपींच्या वतीने ऍड.एम.एम.सय्यद यांनी बाजू मांडली होती.त्यांच्या न्यायालयीन कोठडीची आज मुदत संपली होती त्यामुळे त्यांना आज न्यायालयासमोर जामिन मंजुरीसाठी हजर केले होते.त्यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांनी आरोपींना शहरातील कायदा सुव्यवस्थेची नाजूक स्थिती पाहून त्यांचा जमीन अर्ज सपशेल फेटाळला आहे.याबाबत शहरात समाधान व्यक्त होत आहे.
 
   दरम्यान अद्याप त्या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपी अद्याप फरार आहे.त्यांचा शोध घेऊनही पोलिसांना अद्याप ते सापडलेले नाही.या घटनेने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कोपरगाव शहर येथील पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले होते त्यानंतर ही स्थितीत काहीही फरक पडलेला नाही.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यातील आरोपींना पोलिस नेमके कधी पकडणार असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close