न्यायिक वृत्त
सरकारी कामात अडथळा गुन्हा,धुमाळ निर्दोष

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर येथील रहिवासी असलेले जेष्ठ कार्यकर्ते उमाकांत धुमाळ यांनी नागरिकांना ऐन उन्हाळ्यात २२ दिवसानंतरही पिण्याचे पाणी येत नाही म्हणून कोपरगाव नगरपरिषदेच्या विरुद्ध आंदोलन केले होते.
त्या विरुद्ध तत्कालीन अधिकाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणला या कलमानव्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्या प्रकरणी नुकतीच सुनावणी संपन्न होऊन त्यातून कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून धुमाळ यांना निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती आरोपीचे वकील अड्.जयंत जोशी यांनी दिली आहे.

दि.२० जून २०१६ रोजी कोपरगाव नगरपरिषदेने जाहीर करूनही ऐन उन्हाळ्यात कर्मवीरनगर येथील नागरिकांना पाणी दिले नव्हते.त्यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी आंदोलन केले होते.त्यातून उमाकांत धुमाळ याचे विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून त्या आरोपातून जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.त्याचे कर्मवीरनगर येथील नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर सन-२०१६ मधील उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती.नागरिकांना तब्बल २२ दिवसांनी पाणी मिळत नव्हते.कर्मवीरनगर हे उपनगर त्यास अपवाद नव्हते.या उपनगराचा हद्दीबाहेरील उपनगर म्हणून दुहेरी पाणी पट्टी आकारूनही पाणी मिळणे दुरापास्त झाले होते.येथील महिला आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत होती.शहरातील अन्य भागात किमान एकवीस दिवसांनी पाणी मिळत होते.मात्र कर्मवीरनगर भागातील जनता त्या पासून वंचित रहात होती.या विरुद्ध त्या भागातील रहिवासी व जेष्ठ कार्यकर्ते उमाकांत धुमाळ यांनी आवाज उठवला होता.व पालिकेवर मोर्चा नेला होता.मात्र त्याची दखल पालिकेने घेतलीं नव्हती.

दरम्यान दि.२० जून २०१६ रोजी नगर परिषदेने जाहीर करूनही पाणी दिले नव्हते.त्यामुळे तेथील नागरिकांनी पाणी सोडण्यास आलेला पालिकेचा ‘व्हॉल्वमन’ यास जाब विचारला होता.व त्याने,”आपल्याला पाणी देता येणार नाही व तसे पाणी सोडण्याचा आपल्याला आदेश नाही”असे उर्मट उत्तर दिले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मोठा गोंधळ केला होता.व त्या घटनास्थळी मोठा गदारोळ झाला होता.त्या वरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात उमेश धुमाळ यांचे विरुद्ध फिर्यादी पाणी कर्मचाऱ्याने,”आपली व्हॉल्व सोडण्याची चावी आरोपी धुमाळ यांनी पळवली” असा आरोप करून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून भा.द.वि.कलम ३५३,३३२,५०४,५०६ ३४ अनव्ये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या गुन्ह्याचा खटला कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गत सात वर्ष चालला होता.त्यात आरोपी उमाकांत धुमाळ यांचे विरुद्ध न्यायालयाने फिर्यादी ढमालेसह सुमारे पाच साक्षिदार तपासले होते.न्यायालयाने फिर्यादी आरोपी या दोन्ही गटांची बाजू ऐकून घेऊन आरोपी उमाकांत धुमाळ यांना आज दि.०५ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्या.संभाजी पाटील यांनी निर्दोष मुक्त केले आहे.आरोपीच्या वतीने अड्.जयंत जोशी यांनी काम पाहिले त्यांना अड्.व्यंकटेश ख्रिस्ते या दोघांनी मोफत विधी सहाय्य केले होते.उमाकांत धुमाळ यांना निर्दोष मुक्त केल्या बद्दल न्यायालयाचे व उमाकांत धुमाळ यांचे कोपरगाव शहर व तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.