जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

…या तालुक्यात अवकाळी पाऊस,नुकसान भरपाई द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागातील संवत्सर कोकमठाण परिसरात शुक्रवार दि.१० मे रोजी दुपारनंतर ३.३० वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले असून याबाबत तालुक्यातून पंचनामे करण्याची मागणी नागरिकांनी केली सून यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  

  कोपरगाव तालुक्याच्या संवत्सरसह पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे संवत्सर,कोकमठाण या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी व्यापारी गाळे उडून मोठे नुकसान झाले आहे.

  राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.एका बाजूला उष्णता आहे तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे.दरम्यान, हा अवकाळीचा जोर राज्यात आणखी राज्यातील विविध भागात पुढील आठवडाभर म्हणजे १८ मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तर दुसरी कडे या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे भरपाई मिळावी अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि परिसरातील ग्रामस्थानीं केली आहे.

   कोपरगाव तालुक्याच्या संवत्सरसह पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे संवत्सर,कोकमठाण या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी व्यापारी गाळे उडून मोठे नुकसान झाले आहे.तर काही ठिकाणी मोठ मोठे वृक्ष विजेच्या तारांवर पडल्यामुळे वीज प्रवाह देखील खंडित झाला होता.मागील एक महिन्यापासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना झालेल्या पावसामुळे तात्पुरता थंडावा मिळाला असला तरी काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे.

    दरम्यान या बाबत आ.आशुतोष काळे यांनी सविस्तर माहिती घेवून झालेल्या नुकसानीचा आढावा घेत तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच नुकसानग्रस्त नागरीकांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यास संगितले आहे.संवत्सरला वीजप्रवाह खंडीत झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असता नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी आ.काळे यांच्या सहकार्यातून नागरिकांसाठी पाण्याचा टँकर देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close